Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»कालिंका माता चौकात भरधाव डंपरने एका वृद्धाला चिरडले ! जमावाने दगडफेक करत डंपरची केली तोडफोड

जळगाव

कालिंका माता चौकात भरधाव डंपरने एका वृद्धाला चिरडले ! जमावाने दगडफेक करत डंपरची केली तोडफोड

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraFebruary 15, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

संतप्त जमावाने डंपरवर दगडफेक करत तोडफोड केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना मोठा बंदोबस्त तैनात

जळगाव – भरधाव डंपरने एका वृद्धाला चिरडल्याची हृदयद्रावक घटना कालिंका माता चौक परिसरात शुक्रवारी १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता घडली आहे. या भीषण अपघातात ५७ वर्षीय प्रभाकर पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला असून संतप्त जमावाने डंपरवर दगडफेक करत तोडफोड केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना मोठा बंदोबस्त तैनात करावा लागला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार असे की, प्रभाकर रघुनाथ पाटील (वय ५७ रा. जुने जळगाव) हे बाजार करून भाजीपाला घेऊन घरी परतत होते. यावेळी कालिंका माता चौकातून जाणाऱ्या एका भरधाव डंपरने त्यांना जोरदार धडक दिली. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, डंपरचे चाक थेट त्यांच्या चेहऱ्यावरून गेल्याने त्यांचा जागीच अंत झाला. विशेष म्हणजे, अपघात घडला तेव्हा डंपर चालक मोबाईलवर बोलण्यात व्यस्त होता, ज्यामुळे त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा भीषण अपघात घडला.अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरताच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. गेल्या वर्षी याच ठिकाणी एका चिमुकल्याचा डंपरखाली चिरडून मृत्यू झाला होता, त्या आठवणी ताज्या झाल्याने नागरिकांचा संयम सुटला.

संतप्त जमावाने अपघातग्रस्त डंपरच्या काचा फोडून त्याचे नुकसान केले. वाढता तणाव पाहता दंगा नियंत्रण पथक आणि शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती हाताळली.कालिंका माता चौक हा अपघातप्रवण क्षेत्र बनला असून येथे तातडीने अद्ययावत सिग्नल व्यवस्था कार्यान्वित करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. तसेच या चौकात २४ तास वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, जेणेकरून अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण राहील, अशी आग्रही मागणी सामाजिक कार्यकर्ते ललित नारखेडे व स्थानिक नागरिकांनी केली आहे. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलीस पुढील तपास करत आहेत . कालिंका माता मंदीर परिसरात वाहतुकीची वर्दळ असते हायवे बाय पास होवुनही वाहतुक जास्त व रस्ता बरोबर नसल्याने अश्या घटना घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे .

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यांची निवड लांबली; राजकीय मतभेदांमुळे प्रक्रिया पुढे ढकलली

March 17, 2026

युद्धामुळे सणासुदीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ ; सर्वसामान्यांच्या बजेटवर परिणाम

March 17, 2026

धरणगाव तालुक्यातील पाळधीत काम सुरू असतानाच पर्यटन प्रकल्पाचा स्लॅब कोसळला; ७ कामगार जखमी

March 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add