जळगाव प्रतिनिधी | शहरातील रायसोनी नगर भागात एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. केसीई इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये बी.टेकच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या हेमंत प्रदीप जाधव (वय २०) या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवार, १८ मे रोजी दुपारच्या सुमारास घडली. आत्महत्येपूर्वी हेमंतने लिहिलेली एक भावुक सुसाईड नोट पोलिसांनी जप्त केली असून, त्यात त्याने स्वतःच्या मृत्यूला कोणालाही जबाबदार न धरता, आपले अवयव गरजूंना दान करण्याची अंतिम इच्छा व्यक्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हेमंतचे वडील एका खासगी कंपनीत कार्यरत असून आई एस.टी. महामंडळात वाहक (कंडक्टर) आहे. सोमवारी आई-वडील दोघेही नेहमीप्रमाणे आपल्या ड्युटीवर गेले होते. दुपारी घरी कोणीही…
Author: Nilesh Ajmera
जळगाव प्रतिनिधी | महावितरण कार्यालयात तक्रार देण्यासाठी गेलेल्या तरुणाची जुन्या वादातून निर्घृण हत्या करून नऊ महिन्यांपासून फरार असलेल्या मुख्य संशयित आरोपीला जळगाव पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अत्यंत शिताफीने अटक केली आहे. आमीन हैदर तडवी (वय २१, रा. हरिविठ्ठलनगर, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या गुन्ह्यात यापूर्वीच पोलिसांनी पाच आरोपींना गजाआड केले आहे, मात्र आमीन हा गुन्हा घडल्यापासून पोलिसांना चकवा देऊन फरार होता. जुना वाद आणि थरारक हत्याकांड :मिळालेल्या माहितीनुसार, रामेश्वर कॉलनीतील रहिवासी विशाल मोची (वय २६, उर्फ विक्की रमेश मोची) हा तरुण १७ ऑगस्ट २०२५ रोजी त्याच्या मित्रांसह खंडित वीजपुरवठ्याची तक्रार देण्यासाठी दीक्षितवाडीतील महावितरण कार्यालयात गेला होता.…
जळगाव प्रतिनिधी | सध्या जागतिक पातळीवर अमेरिका-इराण युद्धामुळे देशात मोठ्या प्रमाणावर इंधन टंचाई भासत आहे. या पार्श्वभूमीवर, इंधनाचा काटकसरीने वापर करण्यासाठी आणि शहरातील पर्यावरण रक्षणासाठी जळगाव शहर महानगरपालिकेत आता प्रत्येक महिन्याच्या दर बुधवारी ‘नो-व्हेहीकल डे’ पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात जळगाव शहराच्या महापौर दिपमाला मनोज काळे यांनी महानगरपालिका आयुक्त यांना लेखी पत्राद्वारे तातडीने आदेश दिले आहेत. पंतप्रधानांनी इंधनाअभावी शासकीय वाहनांचा वापर काटकसरीने करण्याच्या सूचना दिल्या आहेत, ज्यानुसार अनेक मान्यवरांनी आपल्या सुरक्षा ताफ्यातील वाहने कमी करून इलेक्ट्रॉनिक वाहनांचा वापर सुरू केला आहे. हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आणि शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी मनपा प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. *असे असेल ‘नो-व्हेईकल…
जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहर आणि परिसर भागात सार्वजनिक ठिकाणी, वाहनांमध्ये तसेच वाईन शॉपच्या बाहेर उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांविरोधात जळगाव पोलिसांनी मोठी धडक मोहीम राबवली आहे. या धडक कारवाईत तब्बल ६२ तळीरामांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षकांनी रस्त्यावर उतरून ही धडक मोहीम राबविल्याने जळगाव शहरात कायदा व सुव्यवस्थेचा वचक निर्माण झाला आहे. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, जळगाव महानगर जिल्ह्याच्या वतीने पोलिसांचे जाहीर आभार मानण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहरातील सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांवर आणि गर्दीच्या भागात गटागटाने बसून मद्यपान करणाऱ्यांचे प्रमाण वाढले होते. विशेषतः गिरणा टाकीसारख्या गजबजलेल्या भागात भाजीपाला व इतर खरेदीसाठी…
जळगाव प्रतिनिधी | धावत्या ट्रेनमध्ये एक ३० वर्षीय अज्ञात पुरुष इसम बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्यानंतर, त्याला उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केल्याची घटना जळगाव रेल्वे स्थानकावर घडली आहे. मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नसून, रेल्वे पोलिसांनी नागरिकांना ओळख पटवण्याचे आवाहन केले आहे. रेल्वे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार १८ मे रोजी ट्रेन नंबर ११०३१ अमृत भारत एक्सप्रेसच्या पाठीमागून सहाव्या जनरल डब्यात एक तरुण बेशुद्ध अवस्थेत असल्याची माहिती जळगाव रेल्वे स्टेशनचे ऑन ड्युटी स्टेशन मास्टर मोरे यांनी संध्याकाळी ६ वाजता रेल्वे पोलिसांना दिली. ती ट्रेन रात्री ७ वाजता जळगाव रेल्वे स्थानकावर आली असता, रेल्वे पोलिसांनी तात्काळ त्या बेशुद्ध इसमाला प्लॅटफॉर्मवर…
अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयाला माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी अचानक भेट देत विविध विभागांची पाहणी केली. यावेळी रुग्णालयातील अपुऱ्या सुविधा, रखडलेले बांधकाम व अस्वच्छतेबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सुधारणा करण्याचे आदेश दिले. उपजिल्हा रुग्णालयासाठी सुरू असलेल्या बांधकामाची गती अत्यंत संथ असल्याचे पाहून आमदार पाटील यांनी बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना चांगलेच धारेवर धरले. कोणत्याही परिस्थितीत पुढील दोन महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. बांधकामामुळे गेल्या वर्षभरापासून बंद असलेले स्वच्छतागृह तातडीने सुरू करण्यासह तुटलेले दरवाजे आणि इतर दुरुस्तीची कामे त्वरित पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. रुग्णालयातील काही बेडशीट अस्वच्छ आढळून आल्याने…
जळगाव प्रतिनिधी । आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे एका विशेष समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीला पोलीस प्रशासन, महानगरपालिका, आरोग्य, महावितरण, अग्निशमन, पशुसंवर्धन आणि परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. आगामी सण शांततापूर्ण आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडावा, यासाठी विविध विभागांच्या तयारीचा आढावा घेत आवश्यक सूचना यावेळी देण्यात आल्या. सणाच्या काळात जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. शहर व जिल्ह्यात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, यामध्ये एसआरपीएफ जवान आणि होमगार्ड…
जळगाव प्रतिनिधी । जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गौण खजिनाची (वाळू) विनापरवाना चोरी आणि वाहतूक करणाऱ्या एका वाळू तस्करावर पोलिसांनी धाडसी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ४ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला रंगेहात अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कानळदा ते आमोदा रस्त्यावरील ‘शेतकरी हॉटेल’जवळ १६ मे रोजी मध्यरात्री १०:३० वाजेच्या सुमारास सार्वजनिक रस्त्यावर वाळू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत प्रकाश ठाकूर (वय ३८) हे आपल्या पथकासह गस्तीवर असताना, त्यांना एका संशयास्पद वाहनाची हालचाल दिसून आली. पोलिसांनी तात्काळ टाटा कंपनीची पांढऱ्या रंगाची…
जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील स्वातंत्र्य चौक ते नंदिनीबाई बेंडाळे शाळा या प्रमुख मार्गावरील दुभाजक सुशोभीकरण आणि देखभाल कामात ‘भंगाळे गोल्ड’ व्यवस्थापनाकडून महानगरपालिकेच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते ॲड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांनी मनपा प्रशासनाकडे लेखी तक्रार केली असून, संबंधित करार तातडीने रद्द करण्याची आणि दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली आहे. जळगाव शहर महानगरपालिकेतर्फे शहरातील प्रमुख रस्त्यांवरील दुभाजकांच्या सुशोभीकरणासाठी सामाजिक संस्था व व्यावसायिकांना परवानगी दिली जाते. मनपाच्या नियमानुसार, या दुभाजकांवर लावण्यात येणाऱ्या जाहिरात फलकांवर ४० टक्के जागा महानगरपालिकेच्या नावासाठी आणि ६० टक्के जागा स्वतःच्या जाहिरातीसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. तसेच दोन…
जळगाव प्रतिनिधी । महावितरणच्या अत्यंत बेजबाबदार आणि भोंगळ कारभारामुळे जळगाव येथील उमाळा एमआयडीसीमधील (MIDC) सुमारे २५ ते ३० कंपन्या आज बंद होण्याच्या उंबरठ्यावर उभ्या ठाकल्या आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही वीज समस्या सोडवली जात नसल्याने संतप्त झालेल्या उद्योजकांनी आज अखेर जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन आपल्या तीव्र व्यथा मांडल्या. या गंभीर समस्येची दखल घेत मंत्री गुलाबराव पाटील यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची कडक शब्दांत कानउघाडणी करत त्यांना चांगलेच धारेवर धरले. उमाळा एमआयडीसीत गेल्या अनेक दिवसांपासून विजेचा मोठा लपंडाव सुरू असून, यामुळे उद्योगांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. येथील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने हाय व्होल्टेजचा ट्रान्सफॉर्मर बसविण्याची सूचना मंत्री महोदयांनी…

