Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»दोन सख्या बहिणी ठरल्या रणरागिणी : दिवसा-ढवळ्या दोन तरुणींच्या अपहरणाचा प्रयत्न

जळगाव

दोन सख्या बहिणी ठरल्या रणरागिणी : दिवसा-ढवळ्या दोन तरुणींच्या अपहरणाचा प्रयत्न

Editorial DeskBy Editorial DeskFebruary 25, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

महिला अत्याचाराच्या घटना राज्यात कुठे ना कुठे होत आहेत.

महिला अत्याचाराच्या घटना राज्यात कुठे ना कुठे होत आहेत. त्यात बीडमध्ये दिवसा-ढवळ्या दोन तरुणींच्या अपहरणाची बातमी समोर आली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही सख्ख्या बहिणी होत्या. बीडच्या माजलगावमध्ये ही घटना घडली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मात्र या दोन बहिणी मधील लहान बहिणीने दाखवलेलं धाडस आणि प्रसंगावधान कौतूक करण्यासारखेच आहे. त्यामुळे अपहरणाचा डाव उधळला गेला. दोन्ही तरुणी या सुरक्षित आपल्या घरी ही परतल्या.

बीड जिल्ह्यात गुन्हेगारीची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. माजलगाव शहरात दिवसाढवळ्या दोन सख्ख्या बहिणींच्या अपहरणाचा थरार उघडकीस आला आहे. सुंदरराव सोळंके महाविद्यालयासमोर तीन आरोपी उभे होते. त्यांचा या दोन बहिणींच्या अपहरणाचा डाव होता. दोन्ही मुली ज्या वेळी त्यांच्या समोर आल्या त्यावेळी या तिघांनी ही त्यांच्यावर झडप टाकली. त्यांना जबरदस्तीने कारमध्ये कोंबण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी लहान बहिणीने डोकं लावलं. तिने त्यांना प्रतिकार केला.

शिवाय जोरजोरात आरडाओरड केला. त्यामुळे तिथे एकच गोंधळाची स्थिती निर्माण झाली. मुलींना कारमध्ये टाकायचे आणि पळ काढायचा असा त्यांचा डाव होता. पण त्यांच्या मनासारखे काही झाले नाही. लहान बहिणीने जबर प्रतिकार आणि आरडाओरडा केला. तो ऐकून तिथं नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले. त्यांना हा प्रकार काही तरी भयंकर असल्याचं जाणवलं. नागरिक मदतीला धावले आणि अपहरणकर्त्यांचा डाव उधळला.

त्यानंतर संतप्त नागरिकांनी आरोपींना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी तिघांना अटक करून त्यांचे वाहन ही जप्त केले आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे माजलगावमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. दरम्यान कौटुंबिक कलहातून हा कट रचला गेला होता हे तपासात समोर आले आहे. याबाबत बीडचे पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांनी माहिती दिली आहे. तर सामाजिक कार्यकर्ता सायली पवार यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी उपाय योजना होणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; मोटारसायकल चोर अटकेत, दोन दुचाकी जप्त

July 28, 2026

फेसर्डी गावाच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर; मनसे शेतकरी सेनेची जिल्हा परिषदेत धडक

July 28, 2026

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add