जळगाव प्रतिनिधी | देशातील वाढती विकृत जिहादी मानसिकता, अवैध भू-संपादने आणि सुनियोजित कटांच्या विरोधात बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद आता आक्रमक झाली आहे. या संदर्भात जळगाव जिल्हा बजरंग दलाच्या वतीने माननीय राष्ट्रपती महोदयांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत एक सविस्तर मागणीचे निवेदन आज सादर करण्यात आले.
या निवेदनात बजरंग दलाने देशाच्या अंतर्गत सुरक्षेवर आणि सामाजिक ताण्याबाण्यावर होणाऱ्या आघातांबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. नाशिक येथील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) सारख्या नामांकित संस्थांच्या परिसरात उघडकीस आलेल्या प्रकरणांचा हवाला देत, ‘लव्ह जिहाद’चे जाळे आता सुशिक्षित आणि व्यावसायिक क्षेत्रांपर्यंत पोहोचल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. तसेच उत्तर प्रदेशातील कथित घटनांचा उल्लेख करत हिंदू तरुणींचे होणारे शारीरिक शोषण आणि सक्तीचे धर्मांतर थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे.
विहिंप आणि बजरंग दलाने आपल्या निवेदनात खालील प्रमुख मुद्द्यांकडे सरकारचे लक्ष वेधले आहे:
लँड जिहाद: रेल्वे, वन विभाग आणि लष्कराच्या सुरक्षित जमिनीवर होणारी अवैध अतिक्रमणे तात्काळ हटवावीत.
अन्न भेसळ: जाणीवपूर्वक खाद्यपदार्थ अपवित्र करून नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावणार्यांवर कारवाई व्हावी.
केंद्रीय कायदा: लव्ह जिहाद आणि सक्तीचे धर्मांतर रोखण्यासाठी स्वतंत्र आणि कठोर केंद्रीय कायदा लागू करावा.
अल्पसंख्याक हिंदूंचे संरक्षण: मुस्लिम बहुल भागातील हिंदू कुटुंबांचे शोषण थांबवून त्यांना संरक्षण द्यावे.
निवेदनाच्या शेवटी, राष्ट्रविरोधी आणि गुन्हेगारी मानसिकता असलेल्या घटकांवर प्रशासनाने कठोर नकेल कसावी, जेणेकरून देशात शांतता आणि सद्भाव टिकून राहील, असे आवाहन बजरंग दलाने केले आहे. याप्रसंगी बजरंग दलाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



