
महाराष्ट्रातील सर्वसामान्यांसाठी गुडन्यूज ! १ एप्रिलपासून वीज दरात कपात, नवीन दर काय?
जळगाव । महाराष्ट्रातील वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच राज्यभरातील वीज दरांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १ एप्रिलपासून नवीन दर लागू होणार आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि वीज वितरण कंपन्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
महावितरण, बेस्ट, अदानी आणि टाटा पॉवर या प्रमुख वीज वितरण कंपन्यांनी घरगुती वीज दर कमी करण्याचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाकडे सादर केला होता. आयोगाने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर १ एप्रिलपासून राज्यभरात नवीन वीज दर लागू करण्यात येणार आहेत. विशेषतः कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांना याचा अधिक फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे.
१ एप्रिलपासून वीज बिल किती आकारले जाणार?
२०२६-२७ या आर्थिक वर्षात ० ते १०० युनीटसाठी ४.३ रुपये द्यावे लागणार आहेत. २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी याच युनीटसाठी ४.७६ रुपये द्यावे लागत होते. म्हणजेच वीज दरात ९.७ टक्के कपात करण्यात आली आहे.
२०२६-२७ या आर्थिक वर्षात १०१ ते ३०० युनीटसाठी ७.१ रुपये द्यावे लागणार आहेत. २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी याच युनीटसाठी ७.९६ रुपये द्यावे लागत होते. म्हणजेच वीज दरात १०.८ टक्के कपात केली आहे.
२०२६-२७ या आर्थिक वर्षात ३०१ ते ५०० युनीटसाठी ११.६४ रुपये द्यावे लागणार आहेत. २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी याच युनीटसाठी १३.५५ रुपये द्यावे लागत होते. म्हणजेच वीज दरात १४ टक्के कपात करण्यात आली आहे.तर, २०२६-२७ या आर्थिक वर्षात ५०० पेक्षा युनीटसाठी १२.६४ रुपये द्यावे लागणार आहेत. २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी याच युनीटसाठी १४.५५ रुपये द्यावे लागत होते. म्हणजेच वीज दरात १३.१ टक्के कपात करण्यात आली आहे.


