
कुणी केला सरकारला जळजळीत संतप्त सवाल?
मुंबईतील ड्रग्स प्रकरणासह नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतर, लैंगिक छळावरून अमित ठाकरे यांनी सरकारला खडे बोल सुनावले. अमित ठाकरे यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. त्यांनी मोठा संताप व्यक्त केला. तर आपण जर सत्तेत असतो तर अशा लोकांना अगोदर फासावर चढवले असते असा संताप त्यांनी व्यक्त केला. त्यांनी पोलिसांना २४ तासांसाठी मोकळी दिल्यास सर्व गुन्हेगार नीट होतील असे भाष्य केले. आज पुण्यात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
राज ठाकरेंनी सगळीकडे संपर्क अध्यक्ष नेमले आहेत. आम्ही सगळ्यांना वन टू वन भेटणार आहोत. सगळ्यांकडून जाणून घेणार आहोत आम्ही कुठ कमी पडतोय. संघटनेत काही बदल झाले पाहिजेत. सगळा सविस्तर अहवाल तयार करून राज ठाकरे यांना देणार आहोत.25 आणि 26 एप्रिल रोजी ग्रामीण भागात जाणार आहोत. इतर संघटनेच्या कार्यकर्त्यांना देखील भेटणार आहोत, असे अमित ठाकरे म्हणाले.
हे सगळं दुर्देवी आहे. राज्यात आणि शहरात ड्रग्स येतात कुठून, असा सवाल त्यांनी विचारला. सगळ्या शहरात ड्रग्स सापडत आहेत, विकले जात आहेत. हे थांबवण्याची ताकद सरकार मध्ये नाहीये का , असा जळजळीत सवाल त्यांनी विचारला. पोलिसांना फ्री HAND द्या. आपल्या शहरांना कुठे आणून ठेवलं आहे. ड्रग्स मोठ्या प्रमाणात येतात हे भीषण आहे. याचे आकडे सरकारकडे नाहीयेत का. अशी अनेक आरोपी आहेत जे ड्रग्स विकतात. शाळेच्या बाजूला ड्रग्स विकले जात आहेत. कठोर कारवाई झाली पाहिजे. सगळ्यात घाणेरडी शिक्षा द्या. राज्यात ड्रग्स येतात त्यावर सरकारने काम करावे, असे अमित ठाकरे म्हणाले.
आम्ही रस्त्यावर उतरून काय करू. प्रशासनाने ही गोष्ट हातात घेतली पाहिजे. आम्ही तर रस्त्यावर उतरूच. कारवाई झाली पाहिजे. आपण PORCHE कार प्रकरण विसरलो. सरकारला विचारलं पाहिजे की ड्रग्स येतात कुठून? एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स येतात कुठून? हे प्रश्न विचारले पाहिजे. 100 टक्के सगळ्या कंपनींचे ऑडिट झाले पाहिजे. तुम्हाला माहिती पाहिजे तुमच्या कंपन्यांत कोण काम करता. ऑडिट झालं पाहिजेच, अशी मागणी त्यांनी लावून धरली.
मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती. एक उदाहरण सेट करा. तुम्ही पोलिसांना 24 तास फ्री हँड द्या. मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना फ्री हँड द्यावा. महाराष्ट्र राज ठाकरेंच्या हातात द्या महाराष्ट्र राज ठाकरेच साफ करू शकतात. आणि त्यांनी सांगावं की आरोपींना माझ्यासमोर उभे करा. आता पोलिसांना फ्री हँड आहे का? असा सवाल अमित ठाकरे यांनी विचारला.


