
दोन आठवड्यात तिसरी घटना उघडकीस
यावल : येथील विरार नगरातील रहिवासी शेख साबीर शेख प्यारे साहब कुटुंबा समवेत बाहेरगावी गेले असता त्यांच्या बंद घराचे कुलूपे तोडून अज्ञात चोरट्यांनी साडेपाच लाख रुपयाच्या रोकड सह ३८ हजार रुपये किमतीचे साडेसहा ग्रॅम वजनाचे सोने घरातील कपाटातून चोरून नेले. ही घटना दिनांक १६ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी चे रात्री दहा वाजेचे दरम्यान घडली. मागील १५ दिवसात याच परिसरातील चोरी ही तिसरी घटना असून याबाबतची फिर्याद शेख साबीर यांनी दिल्यावरून येथील पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेले वृत्त असे की, येथील बुरुज चौकात बऱ्हाणपूर जिलेबीवाला म्हणून व्यवसाय करणारे शेख साबीर शेख प्यारेसाहब हे शहराच्या विस्तारित वसाहतीमधील विरार नगरात कुटुंबीयांसोबत राहतात १६ फेब्रुवारी रोजी दुपारी कुटुंबीय समवेत ते बराणपुर येथे आई-वडिलांच्या भेटीसाठी जाताना घराचे दरवाजासह लोखंडी ग्रीलला कृपे लावून बऱ्हाणपूर येथे गेले.
दरम्यान १७ फेब्रुवारी रोजी रात्री दहा वाजता शेख साबीर कुटुंबीय समवेत बऱ्हाणपूर येथून यावल येथे घरी आले असता त्यांना घराच्या दरवाजासह ग्रीलचे कुलूप तोडलेले दिसले. तसेच घरातील लोखंडी कपाटाचे कुलपे तोडून सामान असता व्यस्त पडलेले होते. त्यांचे कपाटातील साडेपाच लाख रुपयाची रोकड त्यात पाचशे रुपये व दोनशे रुपयांच्या नोटा तसेच पत्नीचे काय ३८ हजार रुपये किमतीचे साडेसहा ग्राम वजनाचे सोन्याचे कानातील रिंगा असा पाच लाख ८८ हजार रुपये किमतीचा माल चोरीस गेला असल्याचे दिसून आले.
याबाबतची फिर्याद शेख साबीर यांनी येथील पोलीस ठाण्यात दिल्यावरून अज्ञात चोरट्या आणि विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक अजय कुमार वाढवे, फौजदार अनिल महाजन व पो. काॅ. सागर कोळी पुढील तपास सुरू आहे.


