Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»पोलिस भरतीदरम्यान धावतानाच तरुणाचा मृत्यू !

ताज्या बातम्या

पोलिस भरतीदरम्यान धावतानाच तरुणाचा मृत्यू !

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraFebruary 12, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे

बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पोलिस दलात भरती होऊन खाकी वर्दी परिधान करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका तरुणाचा बीड येथे सुरू असलेल्या पोलिस भरती प्रक्रियेदरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 1600 मीटर धावण्याच्या मैदानी चाचणीदरम्यान दीपक भास्कर वावळ (रा. परळी, जि. बीड) हा तरुण अचानक कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, बीडमध्ये सध्या पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू असून आज मैदानी शारीरिक चाचण्यांचे आयोजन करण्यात आले होते. उमेदवारांची 1600 मीटर धावण्याची फेरी सुरू असताना दीपक वावळ याला अचानक अस्वस्थ वाटू लागले. काही क्षणांतच त्याला चक्कर येऊन तो मैदानावर कोसळला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी आणि वैद्यकीय पथकाने तातडीने त्याला बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याची प्रकृती गंभीर झाली होती. वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दीपक वावळ हा परळी तालुक्यातील रहिवासी असून पोलिस बनण्याच्या स्वप्नाने तो भरती प्रक्रियेसाठी बीड येथे आला होता. आपल्या मुलाने पोलिस दलात भरती व्हावे, या आशेवर असलेल्या वावळ कुटुंबावर या घटनेने दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरातही या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पोलिस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेत कोणत्याही अमिषांना बळी पडू नये, तसेच स्टेरॉईडसारख्या घातक औषधांचा वापर करू नये, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

वापर आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.पोलिस भरती प्रक्रियेत धावणे, गोळाफेक आणि इतर मैदानी शारीरिक चाचण्यांचा समावेश असतो. या पार्श्वभूमीवर उमेदवारांनी आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यांची निवड लांबली; राजकीय मतभेदांमुळे प्रक्रिया पुढे ढकलली

March 17, 2026

युद्धामुळे सणासुदीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ ; सर्वसामान्यांच्या बजेटवर परिणाम

March 17, 2026

धरणगाव तालुक्यातील पाळधीत काम सुरू असतानाच पर्यटन प्रकल्पाचा स्लॅब कोसळला; ७ कामगार जखमी

March 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add