Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»कुऱ्हे पानाचे येथे बहारदार बाल सांस्कृतिक कार्यक्रमात १०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

ताज्या बातम्या

कुऱ्हे पानाचे येथे बहारदार बाल सांस्कृतिक कार्यक्रमात १०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraFebruary 17, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

कुऱ्हे पानाचे येथे “कलातरंग”मध्ये माजी जि.प. सदस्य विश्वनाथ पाटील यांनी दिला मुलांना आत्मविश्वासाचा मंत्र

भुसावळ प्रतिनिधी : कुऱ्हे पानाचे विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत कला, संस्कार व आत्मविश्वासाचा विकास करावा. “कलातरंग म्हणजे मुलांच्या मनातील रंगांचा उत्सव आहे. शिक्षणाबरोबर कलागुण जोपासल्यास व्यक्तिमत्त्व उजळते,” असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ पाटील यांनी केले आहे. ते तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील जिल्हा परिषद मुलांची-मुलींची व उर्दू शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “कलातरंग” या बाल सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते .

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य समाधान पवार होते. विश्वनाथ पाटील पुढे म्हणाले, “मी स्वतः याच जिल्हा परिषद शाळेत शिकलो आहे. जिल्हा परिषद शाळा संस्कार देणाऱ्या शाळा आहेत.” ग्रामीण भागातील मुलांना व्यासपीठ देण्यासाठी शिक्षक व पालकांचे योगदान मोलाचे असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात नाटिका, आदिवासी व वारकरी सादरीकरण, देशभक्तीपर तसेच शिवमल्हारी नृत्य प्रकारांतून तिन्ही शाळेच्या शंभरपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेवुन आपल्या कला अविष्काराने उपस्थितांची मने जिंकली.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य समाधान पवार, माजी सरपंच कविता उंबरकर, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा संगीता चौधरी, उपाध्यक्ष गणेश शिंदे, सावित्री चौधरी, ग्रामपंचायत सदस्य विलास रंदाळे, गौतम मेघे, भागवत शिंदे, रमाकांत पाटील, प्रमोद उंबरकर ,मुख्याध्यापिका शारदा मसाने (मुलींची शाळा), मुख्याध्यापिका वनिता सोनवणे (मुलांची शाळा), मुख्याध्यापक परवीन शेख (उर्दू शाळा), उपशिक्षक मेघश्याम सपकाळे, विजया परदेशी, अनिता भोई, संतोष तायडे, शालिनी चौधरी यांच्यासह विद्यार्थी, पालक, शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या .सूत्रसंचालन कु. कृष्णाली पाटील, कु. भूमिका उंबरकर, कु. डिंपल पाटील, कु. चित्राक्षी शिंदे व कु. जान्हवी पाटील यांनी केले. प्रास्ताविक उपशिक्षक मेघश्याम सपकाळे यांनी तर आभार मुख्याध्यापिका वनिता सोनवणे यांनी मानले. कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले .

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यांची निवड लांबली; राजकीय मतभेदांमुळे प्रक्रिया पुढे ढकलली

March 17, 2026

युद्धामुळे सणासुदीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ ; सर्वसामान्यांच्या बजेटवर परिणाम

March 17, 2026

धरणगाव तालुक्यातील पाळधीत काम सुरू असतानाच पर्यटन प्रकल्पाचा स्लॅब कोसळला; ७ कामगार जखमी

March 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add