पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेतून जनसेवेचा उपक्रम; प्रतापराव पाटील यांच्या हस्ते चष्म्यांचे वाटप
पाळधी ता. धरणगाव | ‘मोतीबिंदू मुक्त जळगाव ग्रामीण’ अभियानांतर्गत ६०० पात्र लाभार्थ्यांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला असून, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लाभार्थ्यांना चष्म्यांचे वितरण करण्यात आले.
GPS ग्रुपच्या सहकार्याने राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमामुळे शेकडो नागरिकांना स्पष्ट दृष्टीची भेट मिळाली. मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर गरज असलेल्या लाभार्थ्यांना मोफत चष्मे उपलब्ध करून देत त्यांच्या दैनंदिन जीवनात मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या उपक्रमाचे लाभार्थ्यांनी स्वागत करत समाधान व्यक्त केले. समाजातील गरजू नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारा हा उपक्रम जनसेवेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानला जात असून, भविष्यातही अशाच सामाजिक उपक्रमांची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.



