Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»मंत्री गिरीश महाजनांना महिला पोलिसांनी विचारला थेट जाब !

ताज्या बातम्या

मंत्री गिरीश महाजनांना महिला पोलिसांनी विचारला थेट जाब !

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraJanuary 26, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

बाबासाहेबांचा नामोल्लेख टाळला

मंत्री गिरीश महाजनांना महिला पोलिसांनी विचारला थेट जाब !

नाशिक येथे ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात मोठा वाद निर्माण झाला. राज्याचे जलसंपदा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नामोल्लेख न केल्याने संतप्त झालेल्या एका महिला पोलिस अधिकाऱ्याने थेट व्यासपीठाजवळच त्यांना जाब विचारला. या घटनेमुळे कार्यक्रमस्थळी एकच खळबळ उडाली असून, संबंधित व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आज शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. भारताने २६ जानेवारी १९५० रोजी संविधान स्वीकारले असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्याचे शिल्पकार मानले जातात. त्यामुळे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात त्यांच्या योगदानाचा उल्लेख होणे अपेक्षित असतानाही महाजन यांनी संपूर्ण भाषणात बाबासाहेबांचे नाव न घेतल्याने वादाला तोंड फुटले.

वन विभागात कार्यरत असलेल्या महिला पोलिस अधिकारी माधवी जाधव यांनी मंत्री महाजन यांना, “बाबासाहेबांचे नाव भाषणात का घेतले नाही?” असा थेट सवाल केला. या अनपेक्षित प्रकारामुळे पालकमंत्री महाजन काही काळ भांबावले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी माधवी जाधव यांना ताब्यात घेऊन शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, “मला निलंबित केले तरी चालेल, पण मी बाबासाहेबांच्या नामोल्लेखासाठी विचारलेला जाब मागे घेणार नाही,” अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली.

यानंतर पत्रकारांशी बोलताना माधवी जाधव म्हणाल्या की, संविधानामुळेच आज आपण सर्वजण या पदांवर आहोत. ज्यांनी संविधान घडवले त्या बाबासाहेबांचे नाव जाणीवपूर्वक टाळले गेले, ही फार मोठी चूक आहे. संविधानाशी थेट संबंध नसलेल्या व्यक्तींची नावे भाषणात घेतली जातात, मग प्रजासत्ताक दिनाचा खरा मानकरी असलेल्या बाबासाहेबांचे नाव का नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या संपूर्ण घटनेमुळे नाशिकमधील शासकीय प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाला वादाचे गालबोट लागले असून, सामाजिक व राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add