दक्षा फाउंडेशन आयोजीत स्वयंरोजगार मेळाव्यात नव्वद महिला व तरूणांनी घेतला लाभ जळगाव : दक्षा फाउंडेशन व जिल्हा उद्योग केंद्र जळगाव यांच्यामार्फत दिनांक 21 डिसेंबर रोजी महिलांसाठी व तरुणांसाठी महा रोजगार स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जळगाव शहराचे लाडके आमदार राजुमामा भोळे, जिल्हा उद्योग केंद्र खादी ग्रामोद्योगाचे विसपुते, वाडेकर, दिनेश पाटील, कन्सल्टंट समाधान पाटील तसेच दक्षा फाउंडेशनच्या अध्यक्ष मीनाक्षी सपकाळे, आशिष सपकाळे आदी उपस्थित होते. स्वयंरोजगार मेळाव्यात युवकांना मार्गदर्शन करताना आमदार राजुमामा भोळे म्हणाले की पुढाऱ्यांच्या मागे पुढे फिरू नका, ते तुम्हाला फक्त मागे फिरवतील तुमचे काम करणार नाही. स्वतःच्या पायावर उभे रहा छोटामोठा रोजगार निर्माण करा, आई वडीलांना आदर्श माना आणि…
Author: Nilesh Ajmera
जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज… गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्याच्या तापमानात अचानक घसरण झाली असून पार ९ अंशावर आला आहे. दरम्यान, आगामी तीन दिवस जिल्ह्यात थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. गेल्या सप्ताहात जिल्हा परिसरात थंडीच्या लाटेने आपला प्रभाव दाखवल्यानंतर, काही दिवसांपासून वातावरणात मोठा बदल झाला होता. जिल्ह्यात दिवसा २७ ते २९ अंशादरम्यान उन तर सायंकाळनंतर रात्रीचे कमाल तापमान तापमान १९ अंशांवरून थेट ९ ते ६ अंशावर ३१ अंशांवर गेले होते, त्यामुळे थंडीचे प्रमाणात वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. दोन दिवसापूर्वी जळगाव शहरात तापमानाचा पारा किमान १४ अंशावर होता. त्यात पुन्हा घसरण होवून तापमान ९…
इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या निकालानंतर आता सगळ्याच राजकीय पक्षांचे मिशन महापालिका सुरू झाले आहे. अर्थात आज दि. २३ डिसेंबर पासून अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे. दरम्यान, महाविकास आघाडीतील शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धवसेना यांनी स्वबळाचा नारा देत, इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दुसरीकडे सत्ताधारी महायुतीतील घटक पक्षांमध्ये एकत्र लढायचे की स्वतंत्र यावरून चर्चेचे गुन्हाळ सुरूच असून, अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. उमेदवारी अर्ज ऑफलाइन की ऑनलाईन? महापालिका निवडणुकीत पारंपरिकरीत्या ऑफलाइन पद्धतीनेच उमेदवारी दाखल करण्याची मागणी विविध पक्षांनी केली होती. विविध राजकीय पक्षांची मागणी लक्षात घेऊन महापालिका निवडणुकीत पारंपरिकरीत्या ऑफलाइन पद्धतीनेच उमेदवारी दाखल करण्याची परवानगी देण्यात…
नशिराबादच्या आजीबाईंचा ऐतिहासिक विजय, जळगाव : नशिराबाद नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ चुरशीची ठरली; परंतु याहूनही अधिक चर्चा वयाच्या ७७ व्या वर्षी राजकारणात पदार्पण करून विजय मिळवणाऱ्या आजीबाई जनाबाई रंधे यांची होत आहे. विशेषतः ज्या वयात अनेकजण निवृत्त आयुष्याचा विचार करतात, त्या वयात जनाबाई रंधे यांनी नगरपंचायत निवडणुकीत विजय मिळवत इतिहास घडवला आहे. नशिराबाद नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग क्रमांक ७ ‘अ’ मधून भाजपकडून निवडणूक लढवलेल्या जनाबाई रंधे यांनी कडक उन्हात, पायात चप्पलही उ घालता प्रचार केला. ना हातात काठी, ना शरीराची तक्रार. खरं तर तरुणांनाही लाजवेल असा त्यांचा उत्साह पाहून मतदार प्रभावित झाले. घरोघरी जाऊन त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधला आणि विकासाची ग्वाही…
धुक्यामुळे रेल्वेच्या गतीला ब्रेक! उत्तर भारतात कडाक्याची थंडी आणि दाट धुक्यामुळे रेल्वेगाड्यांच्या वेगाला ब्रेक लागला असून दिल्ली आणि उत्तर प्रदेशातून भुसावळ मार्गे धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. यामुळे प्रवाशांचेही वेळापत्रक गडबडले असून त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दिल्लीकडून येणाऱ्या बहुतांश गाड्या सोमवारी (दि. २२) २ ते १३ तास उशीराने धावत असल्याने प्रवाशांचे हाल होता आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी आहे. धुक्यामुळे रेल्वे गाड्याचा वेग मंदावला आहे. दिल्ली, पंजाब पंजाब आणि उत्तर प्रदेशात दृश्यमानता ५० मीटरपेक्षा कमी झाल्याने रेल्वेच्या वेगावर मर्यादा आल्या आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून लोको पायलटला गाड्या संथ गतीने चालवाव्या लागता आहे. त्यामुळे…
29 महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आज २३ डिसेंबपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे इच्छुकांची खऱ्या अर्थाने धावपळ सुरु होणार असून राजकीय वातावरण तापले आहे. जळगावसह राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याप्रमाणे आज 23 डिसेंबरपासून 29 डिसेंबरपर्यंत कार्यालयीन वेळेत उमेदवारी अर्ज दाखल येणार आहेत. 30 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यंतच उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 31 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्जाची छाननी करून अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. 2 जानेवारी रोजी 11 ते 3 या वेळेत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. 3 जानेवारीला उमेदवारांना निवडणूक…
चिरमाडे पेट्रोल पंपासमोर भरधाव कारने मालवाहू वाहनाला जोरदार धडक नशिराबाद रस्त्यावरील चिरमाडे पेट्रोल पंपासमोर भरधाव कारने मालवाहू वाहनाला जोरदार धडक दिली. यानंतर कार रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन फेकली गेली. याच वेळी एअर बॅग उघडल्याने चालक व त्याच्या बाजूला बसलेला प्रवासी थोडक्यात बचावला. या अपघातात कारमधील दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जीएमसीत दाखल करण्यात आले आहे.तर मालवाहू वाहन रस्त्यावरील दुभाजकावर चढले. या घटनेबाबत असे की, भुसावळकडून जळगावकडे मारुती बलेनो चारचाकी (क्रमांक एमएच-१९, सीव्ही ६३८७) येत होती. तर महेंद्र पिकअप मालवाहू वाहन जळगावकडून अमरावतीकडे खजूर घेऊन जात होते. चिरमाडे पेट्रोल पंपासमोर भरधाव कारने मालवाहू वाहनाला जोरदार धडक दिली. यात…
मुक्ताईनगरमध्ये कोथळी गावाजवळ घडली घटना मुक्ताईनगर प्रतिनिधी : एसटी बस थांबवली नाही या क्षुल्लक कारणावरून मुक्ताईनगर आगाराच्या बस चालकाला अडवून त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. इतकेच नव्हे तर, गुंडगिरी करत आरोपींनी चालकाला पाय धरून आणि नाक घासून माफी मागण्यास भाग पाडले. या धक्कादायक घटनेमुळे एस. टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. फिर्यादी जीवन सुभाष सुरवाडे (वय ३५, रा. कुन्हा, ता. भुसावळ) हे मुक्ताईनगर आगारात बस चालक म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी, १९ डिसेंबर रोजी ते फैजपूर ते मुक्ताईनगर या मार्गावर प्रवाशांना घेऊन बस (सावदा-उदळी-चिंचोली-चांगदेव मार्गे) जात होते. संध्याकाळी ७:३० वाजेच्या सुमारास वढवे फाटा ते हरताळा फाटा दरम्यान आरोपींनी बसला…
मुक्ताईनगरमध्ये आमदार चंद्रकांत पाटलांची कन्या विजयी जळगाव : जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या मुक्ताईनगर नगर परिषदेचा निकाल अखेर हाती आला आहे. मुक्ताईनगरमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांना मोठी धक्का बसला असून, नगराध्यक्षा पदासाठी रिंगणात उतरलेल्या आमदार चंद्रकांत पाटलांची कन्या संजना पाटील यांचा 2561 मतांनी विजय झाला आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्यासह सासरे एकनाथ खडसे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मुक्ताईनगर नगर परिषदेच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. आमदार चंद्रकांत पाटील यांची कन्या संजना पाटील यांचा विजय झाल्यानंतर कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. दरम्यान, मुक्ताईनगरच्या जनतेने खरी गुंडागिरी ही मतदानाच्या माध्यमातून नष्ट केली आहे. आमदार एकनाथ…
मुलीला पळवून नेल्याच्या रागातून जाळपोळ पारोळा तालुक्यातील कन्हेरे गावात मुलीला पळवून नेल्याच्या रागातून संतप्त झालेल्या नातेवाईकांनी तरुणाच्या घराला आग लावून जाळपोळ केल्याची धक्कादायक घटना घडली. या आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य, दुचाकी तसेच महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली असून सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कन्हेरे येथील भिकन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, त्यांचा मुलगा अमोल पाटील हा १६ डिसेंबर रोजी गावातील एका मुलीला पळवून घेऊन गेल्याचे निष्पन्न झाले आहे. दोघेही घरी परत न आल्याने मुलीच्या नातेवाईकांनी पाटील कुटुंबीयांना धमक्या दिल्या होत्या. मुलगी घरी न आल्याचा राग मनात धरून…

