Author: Nilesh Ajmera

नगरपालिका निवडणुकांच्या निकालांनंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलू लागली आहेत. जळगाव : नगरपालिका निवडणुकांच्या निकालांनंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलू लागली आहेत. विरोधकांचा वाढता आत्मविश्वास आणि संभाव्य धोके लक्षात घेत भाजप आणि शिंदेसेनेने महापालिका निवडणुकीसाठी सावध पवित्रा घेत मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महापालिका निवडणूक राजकारणाला वेगळीच दिशा मिळाली असून महायुतीतील अंतर्गत समीकरणेही चर्चेत आली आहेत. अर्थात भाजप आणि शिंदेसेनेने युतीची घोषणा केली आहे. दरम्यान, बैठकीत महापालिका निवडणूक युतीत लढण्यावर सकारात्मक चर्चा झाली. आमची महायुती निच्छित होईल. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाशी चर्चा करून जागावाटपाची घोषणा केली जाईल. भाजपचे पदाधिकारी राष्ट्रवादीशी चर्चा करतील. ही बैठक पूर्वनियोजित होती, अशी माहिती पालकमंत्री…

Read More

स्वबळावर लढण्याची तयारी,109 जणांच्या मुलाखती जळगाव : महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात युतीची चर्चा होत असली तरी राज्यातील सत्ताधारी तिसऱ्या मित्र पक्षाने अर्थात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून स्वबळाची तयारी केली जात आहे. बुधवारी 24 डिसेंबर रोजी पक्ष कार्यालयात मुलाखतींसाठी ईच्छुकांची मोठी भाऊगर्दी दिसून आली. राज्यात नुकतेच नगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निकालात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला तिसऱ्या क्रमांकाचे यश मिळाले. त्यामुळे राष्ट्रवादीचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे महापालिका निवडणुकांमध्ये देखील राष्ट्रवादी ताकद अजमावण्याच्या तयारीत आहे. राज्यासह जिल्ह्यात भाजपा आणि शिवसेनेच्या युतीच्या चर्चा होत आहे. या युतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला स्थान नसल्याचे दिसत असल्याने पक्षाने महापालिकेच्या जागा ह्या…

Read More

आत नोव्हेंबर महिना संपून डिसेंबरदेखील संपत आला आहे. राज्य सरकारची महत्वकांक्षी असलेली लाडकी बहीण योजनेद्वारे पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात आहे. ऑक्टोबर २०२५ महिन्याचे हप्त्याचे १५०० रुपये नोव्हेंबर महिन्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आले होते. मात्र नोव्हेंबर महिना संपून डिसेंबरदेखील संपत आला आहे. तरी तरीही अजून लाडक्या बहि‍णींना पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यात महिलांना नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता एकत्र येणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, आता त्यात जानेवारीचा हप्तादेखील मिळणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.जर हप्ता पुढच्या महिन्यात दिला तर महिलांना ३ महिन्याचे हप्ते एकत्र दिले जाऊ शकतात. महिलांच्या खात्यात…

Read More

जामीन अर्ज जिल्हा न्यायालयातर्फे नामंजूर करण्यात आले जळगाव शहरालगतच्या ममुराबाद रस्त्यावरील फार्म हाऊसवर सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय बोगस कॉल सेंटर प्रकरणात माजी महापौर ललित कोल्हे सध्या नाशिक कारागृहात आहे. होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीआधी कोल्हे जामीनावर बाहेर येण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र या बोगस कॉल सेंटरप्रकरणी जळगाव पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. याच पार्श्वभूमीवर ललित कोल्हेंसह सूत्रधार अकबर व हॅण्डलर आदिल या तिघांचे जामीन अर्ज कोर्टाने बुधवारी फेटाळले. काय आहे प्रकरण?२८ सप्टेंबर २०२५ रोजी पोलिसांनी जळगाव शहरालगतच्या ममुराबाद रस्त्यावरील एल. के. फार्म हाऊसवर छापा टाकला होता. तिथे सुरू असलेल्या कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिका, कॅनडा आणि इंग्लंडमधील नागरिकांची आर्थिक फसवणूक…

Read More

निवडणुकीसाठी लागणाऱ्या दाखल्यांसाठी इच्छुकांची महापालिकेत मोठी गर्दी महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज विक्री आणि स्वीकारण्याची प्रक्रियेला सुरुवात झाली असून अर्ज दाखल करण्याची मुदत जवळ येत असल्याने निवडणुकीसाठी लागणाऱ्या दाखल्यांसाठी इच्छुक उमेदवारांची जळगाव महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीत मोठी गर्दी होत आहे. विशेषतः महापालिकेची थकबाकी नसल्याचा दाखला, शौचालय वापराचा दाखला तसेच शासकीय ठेकेदार नसल्याचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी उमेदवारांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे. दरम्यान महानगरपालिका निवडणुकीसाठी दुसऱ्या दिवशी ६१८ जणांनी नामनिर्देशन अर्ज विकत घेतले, मात्र एकही अर्ज दाखल झाला नाही. पहिल्या दिवशी ७७७ अर्जाची विक्री झाली होती. दोन्ही दिवस मिळून १३९५ अर्ज विक्री झाले आहेत. दुसरीकडे निवडणुकीसाठी महत्त्वाचे असलेले ‘कर थकबाकी नसल्याचे ना-हरकत प्रमाणपत्र’ मिळवण्यासाठी…

Read More

किन्ही गावाजवळ हृदयद्रावक घटना; एक मजूर गंभीर जखमी वरणगाव प्रतिनिधी : वरणगाव शहरातील सिध्देश्वर नगर परिसरात राहणाऱ्या एका मजूर कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. खडी-कच आणण्यासाठी जात असताना किन्ही गावाजवळ ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला उलथल्याने बाप आणि चिमुकल्या मुलाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या भीषण अपघातात आणखी एक मजूर गंभीर जखमी झाला असून, घटनेनंतर नातेवाइकांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सिध्देश्वर नगर येथील रहिवासी आणि मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे संजय श्रावण साबळे (वय ४८) हे सकाळच्या सुमारास अक्षय संतोष मोरे (वय २७) यांच्यासह ट्रॅक्टरने खडी-कच घेण्यासाठी तालुक्यातील किन्ही गावाकडे निघाले होते. यावेळी संजय साबळे यांनी आपला सात वर्षांचा मुलगा…

Read More

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर मृत्यू झाल्याची घटना एरंडोल : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर सावखेडा–मराठखेडा (ता. पारोळा) गावाजवळ मध्यरात्री अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेत जवळपास एक ते दीड वर्षे वयाच्या मादी बिबट्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना सकाळी सुमारे ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली असून सावखेडा–मराठखेडा परिसरासह एरंडोल तालुक्यातील जळू, पातरखेडा, भालगाव, नांदगाव आदी गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच सावखेडा–मराठखेड्याचे पोलीस पाटील संतोष पुंडलिक पाटील यांनी तात्काळ एरंडोल वनपरिक्षेत्र कार्यालयाला दूरध्वनीद्वारे कळविले. त्यानंतर सहाय्यक वनसंरक्षक अमोल पंडित, वनपाल देविदास जाधव, वनपाल सतीश ठेलार यांच्यासह वनविभागाचे पथक सकाळी सुमारे ८ वाजेच्या सुमारास घटनास्थळी दाखल…

Read More

केवळ १४ जणांची नसबंदी; वर्षभरात पाच हजारांवर महिलांनी घेतला पुढाकार जळगाव : एक किंवा दोन अपत्य झाल्यानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली जात असते. यात कुटुंब नियोजनासाठी महिला किंवा पुरुष यापैकी कोणीही शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. मात्र, असे असले तरी कुटूंब नियोजनाची शस्त्रक्रिया करणाऱ्यांमध्ये महिलाच पुढे असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात या वर्षभरात पाच हजार १९८ महिलांनी व केवळ १४ पुरुषांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केलेली आहे. कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत लहान कुटूंब अर्थात एक किंवा दोन अपत्य झाल्यानंतर कुटूंब नियोजनाची शस्त्रक्रीया केली जात असते. कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी महिला व पुरुष या दोघांची सारखीच जबाबदारी असते. मात्र, काही गैरसजामुळे पुरुष या…

Read More

निर्देशनानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नवी दिल्ली (भारत सरकार) यांच्या निर्देशनानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील एमआयडीसी भागातील विविध प्रकारच्या औद्योगिक क्षेत्रात आगी व रासायनिक आपत्तींच्या नियंत्रणासाठी तसेच जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी नुकतेच विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत एमआयडीसीमधील सर्व सुरक्षा अधिकारी, जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांचे अग्निशमन विभाग, तसेच जिल्हा औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, नाशिक यांनी सहभाग घेतला. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), पुणे यांच्या माध्यमातून टेबल टॉप मीटिंग, मॉकड्रील व रासायनिक आपत्ती विषयक सखोल प्रशिक्षण यावेळी देण्यात आले. कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात सकाळी ११.०० ते १.०० या…

Read More

धमकी मिळाल्याची माहिती मिळताच एकच खळबळ उडाली जळगाव विमानतळावर बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्याची माहिती मिळताच एकच खळबळ उडाली. या धमकीनंतर संबंधित सर्व सुरक्षा यंत्रणांची पळापळ झाली. स्थानिक पोलिसांसह बॉम्ब शोध व नाशक पथकाने अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने संपूर्ण परिसराची बारकाईने तपासणी केली.पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यासह अपर जिल्हा दंडाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, मुख्य वैद्यकीय अधिकारी; औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे निरीक्षक तसेच भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत कार्यरत सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी तातडीने सर्व नियमित कामे सोडून विमानतळावर हजर झाले. विमानतळ परिसरात सुरक्षा वाढविण्यात आली असून, प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. संशयित वस्तू शोधण्यासाठी विशेष पथकाने सखोल तपासणी केली,…

Read More