शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीची घोषणा मागच्या काही दिवसापासून सुरु असलेल्या शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीची घोषणा झाली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आज मुंबईतील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेत अधिकृतपणे युतीची घोषणा केली. तब्बल २० वर्षांनंतर दोन्ही ठाकरे कुटुंब आणि दोन संघटना एकत्र आल्याने दोन्ही पक्षाच्या नेत्यांपासून ते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.युतीच्या घोषणेपूर्वी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन अभिवादन केले. त्यानंतर पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी आपल्या भावना आणि युतीमागची भूमिका स्पष्ट केली. उद्धव ठाकरे काय म्हणाले? यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात संयुक्त…
Author: Nilesh Ajmera
दोन ठाकरे पक्षांची युती झाल्याच्या वृत्ताने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली महाराष्ट्राच्या राजकारणात दोन ठाकरे बंधू म्हणजेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांची युती झाल्याच्या वृत्ताने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या ऐतिहासिक निर्णयाचे पडसाद जळगावात उमटले असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) वतीने जळगाव शहरात मोठ्या प्रमाणावर जल्लोष साजरा करण्यात आला.जळगावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोर मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने एकत्र आले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्र फोटोंचे बॅनर हातात घेऊन ‘युती’च्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत मनसे सैनिकांनी आपला आनंद व्यक्त केला.उत्साह मोठा, पण ठाकरे गटाची पाठ? या जल्लोषात मनसे जिल्हाध्यक्ष…
गुन्हेगारी क्षेत्रात मोठी खळबळ झाल्याने गुन्हेगारांचे बारा वाजणार… भुसावळ प्रतिनिधी – दि. २२ डिसेंबर २०२५ भुसावळ उपविभागाच्या पोलिस उपअधीक्षकपदी नागपूर शहरातील सहाय्यक पोलिस आयुक्त केदार प्रकाश बारबोले यांची नियुक्ती करण्यात आली.राज्य शासनाच्या गृह विभागाने याबाबतचे आदेश काढल्याने आता भुसावळ विभागातील गुन्हेगारांचे कायदेशीर रित्या बारा वाजणार असल्याने मोठी खळबळ उडाली. कार्यासन अधिकारी मृणाल कृष्णा सावंत यांनी बदलीचे निर्देश दिले आहेत.केदार बारबोले यांनी यापूर्वी २०२४ मध्ये जळगाव जिल्ह्यात प्रोबेशनरी अधिकारी म्हणून काम केले असल्याने त्यांना जळगाव जिल्ह्याची चांगली माहिती आहे. शांत स्वभावाचे आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.त्यांच्या नियुक्तीमुळे भुसावळ विभागात कायदा सुव्यवस्थेला,जातीय सलोख्याला अधिक बळकटी मिळेल,असा विश्वास भुसावळ शहरासह परिसरात व्यक्त होत…
प्रामाणिकपणा, अथक परिश्रम व विनम्रता हे तीन गुण विद्यार्थ्यांनी अंगीकारल्यास यश हमखास जळगाव प्रतिनिधी : प्रामाणिकपणा, अथक परिश्रम व विनम्रता हे तीन गुण विद्यार्थ्यांनी अंगीकारले तर त्यांना जीवनात यश हमखास मिळू शकेल त्याकरीता नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांना उत्कृष्ठ नागरिक बनविण्यास सहाय्यक ठरेल असे प्रतिपादन राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषदेचे संचालक प्रा. गणेशन कन्नबीरन यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट विद्यापीठात दीक्षांत समारंभात केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट विद्यापीठाचा ३४ वा दीक्षांत समारंभ मंगळवार दि. २३डिसेंबर रोजी उत्साहात संपन्न झाला. या समारंभात दीक्षांत भाषण करतांना प्रा. गणेशन कन्नबीरन बोलत होते. यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस.टी.…
अभियांत्रिकी पद्धतीने शेती करा – डॉ. इंद्रमणी मिश्रा जळगाव प्रतिनिधी – ज्याप्रमाणे तंत्रज्ञान प्रगत होत आहे त्याप्रमाणेच मनुष्यालासुद्धा तंत्रज्ञानासोबत चालले पाहिजे. ड्रोन, एआयसह आधुनिक तंत्रज्ञान हे शेतीत येत आहे त्याचा चपलख वापर केला पाहिजे. आर्थिक दृष्ट्या परवडेल अशी अभियांत्रिकी शेती केली पाहिजे. त्यासाठी ड्रोन पायलट प्रशिक्षण वर्गावर भर दिला जात आहे, यातून ड्रोन फवारणीसह अन्य सेवांमध्ये रोजगार वाढेल. त्यासाठी विविध संस्था, औद्योगक क्षेत्र, शिक्षण क्षेत्र आणि सरकार यांच्या सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. कृत्रीम बुद्धीमत्तेचा वापर करुन निविष्ठामधील खर्च कसा कमी करता येईल, उत्कृष्ट रोपांची निर्मिती, यासाठी शेतीमधील आयटी तज्ज्ञ गावोगावी घडले पाहिजे यातून विकसीत भारत घडू शकतो असे मत डॉ. वसंतराव…
चोपड्यातील अट्टल चोरट्याच्या अंकलेश्वरमधून आवळल्या मुसक्या जळगाव जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून सातत्यानं घरफोडी, वाहनचोरीच्या घटना समोर येत आहे. याच दरम्यान, अमळनेर शहरात विविध दुकाने फोडणाऱ्या अट्टल चोरट्याला पोलिसांनी अंकलेश्वर येथून अटक केली आहे. प्रशांत जगन वालडे (मूळ रा. गोरगावले ता. चोपडा व हल्ली मुक्काम अंकलेश्वर गुजरात) असं अटक केलेल्या चोरट्याचे नाव असून पोलिस त्याची कसून चौकशी करीत आहे. शहरातील मध्यवस्तीत बाजारपेठेत नुकतीच चार ते पाच दुकाने पत्रा कापून, शेड कापून फोडण्यात आली होती. त्यातील वस्तू महागडा ऐवज व रोख रक्कम चोरीस गेल्याने शहरात खळबळ माजली होती. या चोरट्यांना लवकरात लवकर जेरबंद करण्याची मागणी दुकानदारांकडून होत होती. पोलिस निरीक्षक दत्तात्रय…
वाहतूक कोंडीतून जळगावकरांना दिलासा मिळण्याची आशा तरसोद ते पाळधी बायपासमुळे जळगाव शहरातील अवजडसह हलक्या वाहनांची वाहतूक कोंडी काहीशी कमी झाली असली तरी छत्रपती संभाजीनगरकडून येणाऱ्या अवजड वाहनांमुळे शहरात वाहतूक कोंडी दिसून येते. यामुळे शहरातूनच जाणारी अवजड व लांब पल्ल्याची वाहतूक ही नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. अशातच शहरातील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी शहराभोवती रिंग रोड उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला आहे. या संदर्भात खासदार स्मिता वाघ यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन प्रस्तावाला तातडीने मंजुरी तसेच आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. रिंग रोड उभारल्यास शहरातील वाहतूक…
राजकीय पक्षांनी आपला मोर्चा महापालिका निवडणुकीकडे वळवला राज्यात सध्या महानगरापालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून या निवडणुकीसाठी काँग्रेसने ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.त रमेश चेन्निथला, हर्षवर्धन सपका, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, सचिन पायलट, अमित देशमुख, अझरूद्दीन, राज बब्बर अशा दिग्गज नेत्यांची नावे आहेत. राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका संपून निकाल लागल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांनी आपला मोर्चा महापालिका निवडणुकीकडे वळवला आहे. राज्यातील २९ महानगरापालिकांच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कबंर कसली आहे. काँग्रेस पक्षाने देखील जय्यत तयारी केली आहे. आढावा बैठका आणि रणनितीवर सविस्तर चर्चा केल्यानंतर आता ४० स्टार प्रचारकांची यादी काँग्रेसने जाहीर केली आहे. यादीमध्ये यांच्या नावाचा समावेश? काँग्रेसच्या महापालिका…
अक्षरलेखन सुंदर अक्षर कृती सत्राचे आयोजन जळगांव शहरातील श्रीराम माध्यमिक विद्यालयात २० डिसेंबर रोजी रोटरी क्लब तर्फे 7 7 7 प्रोजेक्ट अंतर्गत विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी अक्षरलेखन व सुंदर हस्ताक्षर सुधारण्यासाठी कॅलिग्राफी अक्षरलेखन कृती सत्राचे आयोजन करण्यात आलेलं होतं. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयातील मुख्याध्यापक दिवाकर जोशी होते तर प्रमुख अतिथी रोटरी क्लबचे समन्वयक सुबोध सराफ हे होते. याप्रसंगी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांनी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व रोटली क्लबचे समन्वयक सुबोधजी सराफ यांनी विद्यार्थ्यांना कॅलिग्राफी अक्षरलेखन कसं करावं व सुंदर हस्ताक्षर कसे काढावे याविषयी कृती सत्र घेतले व…
पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा आगारातून ५० प्रवाशी आणि शालेय विद्यार्थ्यांना घेऊन वडगावच्या दिशेने निघालेल्या एसटी बसला भीषण अपघात होता होता वाचला आहे. विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रॅक्टरने कट मारल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल खड्यात घसरली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून एक मोठा अनर्थ टळला आहे. सोमवारी २२ डिसेंबर रोजी सायंकाळी ५:३० वाजता बस क्रमांक (MH 14 BT 2611) पाचोरा स्थानकातून निघाली होती. मोंढाळे ते निंभोरी गावांच्या दरम्यान, माजी सरपंच मीनाक्षी दिवटे यांच्या शेताजवळ ही घटना घडली. समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरने बसला जोरात कट मारला. रस्ता अरुंद असल्याने आणि पाचोरा ते सातगाव (डोंगरी) रस्त्याचे काम सुरू…

