विधिज्ञ अॅड. समीर शेख यांच्यावर पाच ते सहा जणांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. चाळीसगाव नेटवर्क – शहरातील न्यायालय परिसरात दुपारी घडलेल्या धक्कादायक घटनेत प्रसिद्ध विधिज्ञ अॅड. समीर शेख यांच्यावर पाच ते सहा जणांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात अॅड. शेख जखमी झाले असून त्यांच्यावर बापजी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्रकरण हे प्लॉट व्यवहाराशी संबंधित असून सुमारे ३ लाख रुपये टोकन रक्कम देण्यात आली होती. तर, पुढील खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्याच्या मागणीवरून वाद निर्माण झाला. या वादाचे रूपांतर थेट न्यायालय परिसरातच ५ ते ६ जणांनी अॅड. समिर शेख यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या घटनेनंतर न्यायालय…
Author: Editorial Desk
भुसावळहून जळगाव, धरणगाव, अमळनेर, शिंदखेडा, दोंडाईचा आणि नंदुरबारमार्गे मुंबईकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. भुसावळ प्रतिनिधी : पश्चिम रेल्वेने प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन भुसावळ–दादर मार्गावरील विशेष गाड्यांच्या कालावधी पुन्हा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. भुसावळहून जळगाव, धरणगाव, अमळनेर, शिंदखेडा, दोंडाईचा आणि नंदुरबारमार्गे मुंबईकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. आठवड्यातून एक दिवस धावणाऱ्या साप्ताहिक विशेष गाडी दादर–भुसावळ (०९०४९) आणि भुसावळ–दादर (०९०५०) यांचा कालावधी २७ मार्च पर्यंत वाढवण्यात आला आहे. आठवड्यातून तीन दिवस सोमवार, बुधवार आणि शनिवारी धावणाऱ्या त्रिसाप्ताहिक विशेष गाडी दादर–भुसावळ (०९०५१) आणि भुसावळ–दादर (०९०५२) यांचा कालावधी २८ मार्च पर्यंत वाढवण्यात आला आहे.
मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून कारवाईचा बडगा उगारला जळगाव शहरात अतिक्रमणधारकांवर मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून कारवाईचा बडगा उगारला असून शहरातील अनेक ठिकाणचे अतिक्रमण हटविले जात आहे. याच दरम्यान आज शुक्रवारी (२० फेब्रुवारी) मनपा अतिक्रमण निर्मूलन पथकाने जळगाव शहरात अत्याधुनिक नवीन जिल्हा न्यायालय उभारणीसाठी निश्चित करण्यात आलेल्या शाहू नगर येथील ट्राफिक गार्डन परिसरातील सुमारे सात एकर जागेवरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली. या दरम्यान, आठ गाड्या व इतर वस्तू जप्त करण्यात आले. जिल्हा न्यायालयाची सध्याची जागा अपुरी पडल्यामुळे प्रशासनाने नवीन इमारतीसाठी या परिसराची निवड केली होती. या जागेवर अनेक खाद्यपदार्थ विक्रेते, हातगाडी चालक आणि गॅरेज व्यवसायिकांनी अतिक्रमण करून व्यवसाय सुरू केला होता, ज्यामुळे…
जळगावात शेतक-यांकडून अवैध वसुली; जिल्ह्यात खळबळ जळगाव । जळगाव जिल्ह्यात केळी पीक विम्याच्या नावाखाली एक मोठे रॅकेट सक्रिय झाले आहे. काही दिवसापूर्वी जिल्ह्यात केळी पीक विम्याच्या नावाखाली हजारो हेक्टरवर बोगस विमा उतरवल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली. यानंतर आता विमा प्रतिनिधींकडून विमा मंजूर करून देण्याच्या नावाखाली प्रति हेक्टरी ५ हजार रुपयांची शेतक-यांकडून अवैध वसुली केली जात असल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे. एका दैनिकांत छापून आलेल्या वृत्तानुसार हा प्रकार जिल्ह्यातील ६० ते ७० महसूल मंडळांमधील ३०० हून अधिक गावांमध्ये सुरू असल्याचे शेतकऱ्यांकडून नमूद करण्यात आले आहे. एका गावातून सरासरी ३० ते ५० शेतकऱ्यांकडून ५ हजार रुपये वसूल केले जात असल्यामुळे एका गावातून…
केळी दरात मोठी वाढ, आता प्रति क्विंटला मिळतोय ‘इतका’ भाव? जळगाव । मागच्या काही महिन्यापासून केळीला भाव नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते. मात्र आता केळीच्या दरात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. महाशिवरात्रीनंतर रमजान ईद व आगामी चैत्र नवरात्रोत्सवाचे पर्व जवळ आल्याने बाजारपेठेत फळांच्या मागणी वाढली असून त्यात खान्देशी केळी सध्या ग्राहकांची पहिली पसंती ठरत आहे. यामुळे केळी दरात क्विंटलमागे ७०० ते ८०० रुपयापर्यंतची वाढ झाली आहे. यामुळे केळी उत्पादकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. सध्या रमजान ईद महिना सुरु झाला असून याच पार्श्वभूमीवर बाजारपेठेत फळांना मोठी मागणी वाढली आहे. त्यातही महागडी व स्वादात कमी पडणारी सफरचंद, खरबूज, टरबूज व…
चाळीसगावमध्ये शिवजयंतीत वाद; एपीआयची तडकाफडकी बदली जळगाव । चाळीसगाव शहरात शिवजयंतीनिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम व मिरवणुकीदरम्यान गाडी पार्किंगच्या कारणावरून शिवप्रेमी आणि पोलिसांमध्ये वाद झाला. या झालेल्या वादानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव शहरातील महाराणा प्रताप चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित मिरवणुकीच्या मार्गावर वाहन उभे करण्याच्या मुद्द्यावरून शिवप्रेमी आणि एपीआय भरत चौधरी यांच्यात शाब्दिक चकमक झाली. हा वाद वाढत असल्याचे लक्षात येताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र या घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी एपीआय भरत चौधरी यांची तात्काळ नियंत्रण कक्षात…
दिव्यांग योजनेतील भ्रष्टाचार,किती खरा किती खोटा ! महाराष्ट्रातील सामाजिक परिवर्तनाची भूमी महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यातून समानतेचा सामाजिक न्यायाचा आणि मानवी सन्मानाचा विचार समाज मनात खोलवर रुजला. या परंपरेतून वंचित उपेक्षित घटकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवण्याची योजनांमधून राज्याची बांधिलकी निर्माण झाली. दिव्यांग व्यक्तींच्या योजना ही त्याच बांधिलकीची फलश्रुती होय. परंतु या योजनेतील अंमलबजावणीतील घोटाळे अधून मधून डोके वर काढत आहेत. त्यामुळे प्रश्न उभा राहिला दिव्यांग कल्याण आतील भ्रष्टाचार किती खरा किती खोटा केवळ आरोपाच्या पत्रावळीवर दिव्यांग व्यक्तींसाठी शासनाकडून शिष्यवृत्ती, स्वयंरोजगारासाठी अनुदान, कृत्रिम अवयव सहाय्यक उपकरणे, प्रवास सवलती, आरक्षण, निवास योजना, आरोग्य विषयक सहाय्य…
दोन आठवड्यात तिसरी घटना उघडकीस यावल : येथील विरार नगरातील रहिवासी शेख साबीर शेख प्यारे साहब कुटुंबा समवेत बाहेरगावी गेले असता त्यांच्या बंद घराचे कुलूपे तोडून अज्ञात चोरट्यांनी साडेपाच लाख रुपयाच्या रोकड सह ३८ हजार रुपये किमतीचे साडेसहा ग्रॅम वजनाचे सोने घरातील कपाटातून चोरून नेले. ही घटना दिनांक १६ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी चे रात्री दहा वाजेचे दरम्यान घडली. मागील १५ दिवसात याच परिसरातील चोरी ही तिसरी घटना असून याबाबतची फिर्याद शेख साबीर यांनी दिल्यावरून येथील पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेले वृत्त असे की, येथील बुरुज चौकात बऱ्हाणपूर जिलेबीवाला म्हणून व्यवसाय करणारे…
अमळनेरमध्ये 19 मार्चपासून भूमी सुपोषण व संरक्षण अभियान “भूमी स्वस्थ राहिली तर समाज स्वस्थ राहील” या भावनेतून तंत्रज्ञान आणि श्रद्धेचा सुंदर मेळ साधत शेती – मातीसोबतच समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अक्षय कृषी परिवाराच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या ‘भूमी सुपोषण एवं संरक्षण अभियानाचा’ शुभारंभ 19 मार्च रोजी अमळनेर येथील मंगळग्रह मंदिर परिसरात देशाचे कृषी मंत्री तथा मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते होणार आहे. या अभियानाच्या निमित्ताने शेती, माती आणि जीवन यावर परिवर्तनात्मक संवाद होणार असून हे अभियान एक व्यापक चळवळ बनावे, यासाठी प्रशासनासोबतच सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. या…
विद्युत अभियंता चाणक्य जैन यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. भुसावळ प्रतिनिधी : येथील रेल्वेच्या विद्युत लोको शेड मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.या वेळी वरिष्ठ मंडल विद्युत अभियंता चाणक्य जैन यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. प्रसंगी चाणक्य जैन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल विचार व त्यांच्या शौर्या बद्दल विचार व्यक्त केले.त्यांनी सांगितले छत्रपती शिवाजी महाराजांनी कमी सैन्य, कमी शस्त्र असून सुद्धा युक्तीचा वापर करून स्वराज निर्माण केले त्या प्रमाणे आपल्याला सुद्धा रेल्वे ला पुढे घेऊन जायचे आहे. या वेळी ललित भारंबे,निलेश इंगळे,सुशील पगारे,राजीव कुमार सिंग,जयेश ढाकणे,राहुल राजपूत,ललित मुथा,योगेश…

