Author: Nilesh Ajmera

मुलगा झाला नाही म्हणून पोटच्या ३ दिवसांच्या मुलीची बापाने केली हत्या ! जामनेर प्रतिनिधी : मुलाच्या हव्यासापोटी माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना जामनेर तालुक्यातील मोराड येथे घडली आहे. चौथीदेखील मुलगीच झाली या रागातून एका निर्दयी बापाने आपल्या अवघ्या तीन दिवसांच्या चिमुरडीच्या डोक्यात लाकडी पाट मारून तिची निघृण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. कृष्णा लालचंद राठोड (वय २६, रा. मोराड) असे या निर्दयी पित्याचे नाव आहे. याला आधीच ३ मुली आहेत. चौथ्या वेळी मुलगा होईल, अशी त्याला आशा होती. मात्र, १३ नोव्हेंबर रोजी त्याच्या पत्नीने पुन्हा एका मुलीला जन्म दिला. मुलगा झाला नाही,…

Read More

मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय मंत्रीमंडळाने नगराध्यक्षा संदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत थेट निवडून आलेली व्यक्ती नगरसेवक म्हणूनही विजयी झालेली असेल तर तिची दोन्ही पदे कायम राहतील. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अशा व्यक्तीला अध्यक्ष किंवा सदस्य म्हणून मत देण्याचा अधिकार असेल. यासाठी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढला जाईल. एखादी व्यक्ती थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेली असेल व त्याचवेळी एखाद्या वॉर्डातून ती नगरसेवक म्हणूनही विजयी झाली असेल आणि नगराध्यक्ष म्हणून तिच्यावर अविश्वास प्रस्ताव मंजूर झाला तरी ती नगरसेवक म्हणून कायम राहील.

Read More

पोलिसांचा दणका : १३ लाख ७१ हजारांचा दंड वसूल जळगाव प्रतिनिधी : जिल्ह्यातील वाढते रस्ते अपघात आणि गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार संपूर्ण जिल्ह्यात बुधवारी, २४ डिसेंबर रोजी धडक ‘विशेष वाहन चेकिंग मोहीम’ राबवण्यात आली. मोहिमेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ११०० हून अधिक वाहनधारकांना पोलिसांनी दणका दिला आहे. एकाच दिवसात तब्बल १३ लाख ७१ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. मोहिमेदरम्यान पोलिसांनी प्रामुख्याने विना नंबर प्लेट फिरणारी आणि फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या ४६३ वाहनांवर कारवाई करून ४ लाख ४५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, जिल्ह्यात १०७ अल्पवयीन मुले वाहन चालवताना आढळली. त्यांच्या पालकांकडून पोलिसांनी…

Read More

मतदारांमध्ये जनजागृती वाढवण्यासाठी मनपा प्रशासनाची रील मेकिंग स्पर्धा जळगाव प्रतिनिधी : शहरातील मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि तरुणाईचा सक्रिय सहभाग वाढवण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने “विकासासाठी मतदान नक्की करा” हा संदेश घराघरात पोहोचवण्याच्या उद्देशाने रील मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदानाचे महत्त्व प्रभावीपणे मांडणाऱ्या या उपक्रमाला तरुणांकडून चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या स्पर्धेत मतदान जनजागृतीवर आधारित उत्कृष्ट रिल्स तयार करणाऱ्या स्पर्धकांना रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रथम पारितोषिक म्हणून ३ हजार रुपये रोख, तर द्वितीय पारितोषिक म्हणून २ हजार रुपये रोख देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी काही नियमावली जाहीर करण्यात आली असून…

Read More

चार साधू ताब्यात लुटीचा प्रकार उघड अमळनेर प्रतिनिधी : साधूंच्या वेशात शहरात दाखल होऊन दुकानदारांना विविध सुगंध व औषधांचा वास देत गुंगी आणून पैसे व वस्तू लुटणाऱ्या चार जणांच्या टोळीचा तरुणांच्या सतर्कतेमुळे पर्दाफाश झाला. नागरिकांनी या ढोंगी साधूंना चांगलाच चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले, त्यानंतर पोलीस ठाण्यातही त्यांना ‘महाप्रसाद’ देण्यात आल्याची चर्चा शहरात रंगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि. २५ रोजी अमळनेर शहरात चार ते पाच साधूंच्या वेशातील टोळी दाखल झाली होती. धुळे रोडवरील तुळजाई हॉस्पिटल परिसरात समर्थ ट्रेडिंगचे मालक जितेंद्र पाटील यांच्याजवळ हे साधू गेले. त्यांनी टिळा लावून कशातरी सुगंधाच्या किंवा गुंगी आणणाऱ्या औषधाच्या नावाखाली दुकानदाराला वश करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर…

Read More

निमखेडी शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाने तीन जणांवर कारवाई जळगाव एमआयडीसी व निमखेडी शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाने तीन जणांवर कारवाई करत ६८ लिटर गावठी दारूसह देशी मद्याचा साठा जप्त केला. होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीची आचारसंहिता व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शहरात बेकायदेशीर मद्याचा पूर वाहण्याची शक्यता लक्षात घेता राज्य उत्पादन शुल्क विभागाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांच्या आदेशानंतर जळगाव विभागानेही कारवाईचा बडगा उचलला आहे. नववर्ष व निवडणूक काळात शहरात अवैध मद्य येऊ नये यासाठी उत्पादन शुल्क विभागाने पाच विशेष फिरती पथके तैनात केली आहेत. जळगाव शहरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक मुख्य रस्त्यावर या पथकांचा वॉच असणार आहे.…

Read More

संतांचे जीवन परोपकारी आणि कल्याणकारी असते महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज पाल.रावेर प्रतिनिधी : ब्रम्हलीन परम पूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजीं सारख्या दिव्य दैवी आत्म्यांचे स्मरण केल्याने हृदय आनंदाने भरून जाते. बापूजीनीं चैतन्य साधक परिवार ची स्थापना करून देशभरातील लाखो भक्तांना आध्यत्मिक जीवन जगण्याची कला अवगत करून उद्धार केला. पूज्य बापूजी स्वतः भौतिक वस्तू चा त्याग करून ईश्वरिय शक्ती प्राप्त करण्यासाठी आणि जनकल्याणकरिता विराट संकल्प करीत साक्षात परमेशवराचे दर्शन प्राप्त करून अज्ञानरूपी अंधःकारात भरकलेल्या मानवी जीवाला ज्ञानाच्या प्रकाशात आणले. आज त्यांच्या सानिध्यात पूज्य बाबाजी माता नर्मदेची प्रदक्षिणा करण्याचा कठीण संकल्प पूर्ण करत आहेत. यापेक्षा विशेष श्रद्धांजली असू शकत नाही. बापूजींनी…

Read More

मुक्ताईनगरात बनावट नोटाही मोठया प्रमाणात हस्तगत मुक्ताईनगर प्रतिनिधी : समाजमाध्यमांवरून “एक लाख रुपयांत दहा लाख रुपये मिळतील” असे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळी चा मुक्ताईनगर पोलिसांनी पर्दाफाश केला असून यातील संशयितांना अटक करण्यात आली आहे .या कारवाईत त्यांच्या ताब्यातून बनावट नोटांचा मोठा साठा व मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या कुन्हा दुरक्षेत्र अंतर्गत मधापुरी, लालगोटा, हलखेडा, जोंधनखेडा, चारठाणा आदी गावांतील काही गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून फेसबुक व इतर समाजमाध्यमांवरून आर्थिक प्रलोभन देणारे व्हिडीओ प्रसारित केले होते. या व्हिडीओंमध्ये एक लाख रुपयांच्या मोबदल्यात दहा लाख रुपये, सोन्याच्या विटा, नाणी, काळी हळद, रेड मर्क्युरी, नागमणी आदी देण्याचे आमिष दाखवण्यात येत होते.…

Read More

वाहनांची मोठी गर्दी झाल्याने जनतेला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. जळगांव शहरातील खाजा मिया चौक परिसरात आज संध्याकाळी सुमारे 6:30 वाजता तब्बल अर्धा तास ट्रॅफिक जाम निर्माण झाला. रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी झाल्याने जनतेला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. प्रमुख वेळेत जाम सुटण्यास विलंब झाला असून ट्रॅफिक नियंत्रणासाठी पोलीस कर्मचारी क्षणभर अनुपस्थित असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या अचानकच्या जाममुळे कार्यालयातून घरी जाणारे वाहनचालक तसेच सामान्य नागरिक त्रस्त झाले.स्थानिक नागरिकांनी ट्रॅफिक व्यवस्थापनात सुधारणा करण्याची मागणी केली आहे. शहरातील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना करावी अशी जनतेतून अपेक्षा व्यक्त केली जात आहे. खाजा मिया चौकात संध्याकाळी साडेसहा वाजता अर्धा…

Read More

भयंकर ! कर्नाटकातून एक अत्यंत काळजाचा थरकाप उडवणारी बातमी कर्नाटकातून एक अत्यंत काळजाचा थरकाप उडवणारी बातमी समोर आली आहे.. चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरियूरजवळ एक भीषण बस अपघात झाला. बेंगळुरूहून गोकर्णला जाणारी खाजगी एसी स्लीपर बस कंटेनर लॉरीशी धडकली आणि त्यात आग लागली.या अपघातामध्ये १७ जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर २२ जण जखमी झाले आहेत. खासगी बस बंगळुरूहून गोकर्णाला निघाली होती. त्याचवेळी एक कंटेनर बंगळुरूकडे निघाला होता. हिरियुर येथे कंटेनर चालकाचा ताबा सुटला अन् डिव्हायडर तोडून विरूद्ध दिशेला खासगी बसला जोरात धडक दिली. ही धडक इतकी भयानक होती की बसचा चक्काचूर झाला अन् आग लागली. खासगी स्लीपर बसमध्ये आगीचा तांडव उडाला. कंटेनर…

Read More