ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतमालाची ने-आण सुलभ व्हावी तसेच कापणी, जळगाव प्रतिनिधी | ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतमालाची ने-आण सुलभ व्हावी तसेच कापणी, मळणी, आंतरमशागत आदी शेतीकामे सुलभपणे पार पडावीत, यासाठी शेतरस्त्यांचे मजबुतीकरण आवश्यक असल्याने ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी २७ फेब्रुवारी २०२६ रोजी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते . या प्रशिक्षणात शासन निर्णयातील विविध तरतुदींचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख विभाग, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, कार्यकारी अभियंता, प्रधानमंत्री ग्रामसडक…
Author: Editorial Desk
जळगाव जिल्ह्यात शिक्षण विभागाचा अजब कारभार समोर आला असून रावेर मधील बारावीच्या परीक्षा जळगाव । जळगाव जिल्ह्यात शिक्षण विभागाचा अजब कारभार समोर आला असून रावेर मधील बारावीच्या परीक्षा केंद्रावर भरारी पथकाकडून 11 विद्यार्थ्यांवर कॉपीची कारवाई करण्यात येऊनही शिक्षण विभागाकडून मात्र कॉफीची कारवाई निरंक दाखवण्यात आली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे शिक्षण वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकाराबाबत संबंधित केंद्र संचालकांकडे खुलासा मागवण्यात आला असून खुलासानंतर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रावेर येथील सरदार जी. जी. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय या परीक्षा केंद्रावर भरारी पथकाने अचानक…
जयश्री राहुल पाटील यांनी प्रभागातील नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवण्याच्या उद्देशाने कामांचा शुभारंभ जळगाव शहरातील प्रभाग क्र. ९ च्या नवनिर्वाचित नगरसेविका जयश्री राहुल पाटील यांनी प्रभागातील नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवण्याच्या उद्देशाने कामांचा शुभारंभ सुरु केला आहे. आज त्यांनी देवराम नगर परिसरातील मुख्य गटारीची पाहणी करून तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. प्रभागातील अनेक गटारी तुंबल्या असल्यामुळे नागरिकांना घरात आणि रस्त्यावर पाणी साचण्याची समस्या निर्माण झाली होती. नगरसेविकेच्या निर्देशानुसार मनपा आरोग्य विभागाने ताबडतोब जेसीबीद्वारे गटारी साफ करण्याचे काम सुरू केले. जयश्री पाटील यांनी या दौऱ्यात नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या ऐकल्या आणि आगामी दिवसांत प्रभागातील सर्व तुंबलेल्या गटारी लवकरात लवकर स्वच्छ करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी सांगितले की,…
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी पाड्यावर होळीच्या उत्सवाला प्रारंभ झाला आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी पाड्यावर होळीच्या उत्सवाला प्रारंभ झाला आहे. भोंगऱ्या बाजाराची धूम सुरु झाली आहे. खान्देशात मोठ्या प्रमाणावर हा उत्सव साजरा होतो. सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या आदिवासी पाड्यांमध्ये होळीच्या उत्सवाची रंगत चढू लागली असून पारंपरिक भोंगऱ्या बाजाराचा स्वर पुन्हा एकदा दऱ्याखोऱ्यांत घुमू लागला आहे. खान्देशातील आदिवासी समाजासाठी विशेष महत्त्व असलेला हा उत्सव उत्साह, परंपरा आणि सामाजिक ऐक्य यांचे प्रतीक मानला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात भोंगऱ्या बाजाराची सुरुवात झाली असून परिसरात आनंदाचे वातावरण आहे. सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या गावांमध्ये होळी म्हणजे केवळ रंगांचा सण नसून सांस्कृतिक परंपरांचा महोत्सव असतो. आदिवासी…
सिंधुताई कोल्हे यांच्याकडे महिला बालकल्याण,डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्या हाती स्थायी समितीचा कारभारी जळगाव शहर महानगरपालिकेच्या सत्तेच्या चाव्या मानल्या जाणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या ‘स्थायी समिती’ आणि ‘महिला व बालकल्याण समिती’ सभापती पदासाठी गुरुवारी (दि. २६ फेब्रुवारी) अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली. दोन्ही समित्यांच्या सभापती पदासाठी प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने, ही निवड आता केवळ औपचारिकता उरली असून दोन्ही उमेदवार बिनविरोध निवडून येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या स्थायी समिती सभापती पदासाठी भारतीय जनता पक्षातर्फे डॉ. चंद्रशेखर शिवाजी पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. तर दुसरीकडे, महिला व बालकल्याण समिती सभापती म्हणून शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका सिंधुताई विजय…
महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री, जिल्हाधिकारी जळगाव,दीपनगरचे महानिर्मिती मुख्य अभियंता यांच्याकडे दि.,२६ फेब्रुवारी २०२६ रोजी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले यावल प्रतिनिधी : भुसावळ तालुक्यातील दिपनगर औष्णिक वीज केंद्रातील ६६० मेगावॅट मधील स्फोटाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी भुसावळ येथील सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता नितीन सुरेश ब्राह्मणे यांनी संबंधितांकडे लेखी केली आहे. महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री, जिल्हाधिकारी जळगाव,दीपनगरचे महानिर्मिती मुख्य अभियंता यांच्याकडे दि.,२६ फेब्रुवारी २०२६ रोजी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,मागील ६-७ दिवसांपूर्वी दीपनगर येथील नवीन ६६० मेगावॅट प्रकल्पात भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे.हा प्रकल्प महाराष्ट्राच्या ऊर्जा सुरक्षेसाठी अत्यंत महत्वाचा असून या प्रकल्पावर जनतेचा हजारो कोटी रुपयांचा निधी…
जळगाव दिवाणी न्यायालयाने महापालिका आयुक्तांना कडक शब्दांत फटकारले आहे. जळगाव प्रतिनिधी – शिवाजी नगर भागातील हुडको घरकुल योजनेसाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला तब्बल २५ वर्षांनंतरही न दिल्याने, जळगाव दिवाणी न्यायालयाने महापालिका आयुक्तांना कडक शब्दांत फटकारले आहे. ‘तुम्हाला अटक करून दिवाणी कारागृहात का पाठविण्यात येऊ नये?’ अशी विचारणा करणारी ‘कारणे दाखवा’ नोटीस न्यायालयाने बजावली असून, या प्रकरणाने महापालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची पार्श्वभूमी १९९९ सालापासूनची आहे. महापालिकेने शिवाजी नगरातील हुडको योजनेसाठी श्रीराम गोपालदास खटोड (रा. जयनगर, जळगाव) यांच्या मालकीची दोन एकर जागा संपादित केली होती. मात्र, या जागेचा मोबदला देण्यास प्रशासनाकडून सातत्याने दिरंगाई करण्यात आली. जमीन मालकाने याविरोधात…
भारत गॅस गोडाऊनमध्ये अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून ५८ भरलेले गॅस सिलिंडर चोरी केल्याची घटना २६ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. वरणगाव प्रतिनिधी : शहराजवळील बोहर्डी शिवारातील लालमाती परिसरात असलेल्या भारत गॅस गोडाऊनमध्ये अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून ५८ भरलेले गॅस सिलिंडर चोरी केल्याची घटना २६ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. चोरीस गेलेल्या सिलिंडरांची एकूण किंमत सुमारे ७४ हजार १२४ रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी गॅस एजन्सीचे संचालक नरेंद्र उत्तमराव आहिरे (वय 51, रा. शांतिनगर, भुसावळ) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची रोहंत गॅस एजन्सी ही भारत गॅस कंपनीची वितरक असून मुख्य कार्यालय मकरंद नगर, वरणगाव येथे आहे.संबंधित गोडाऊनमध्ये जळगाव…
दररोज तीन लाख भाविक येणार ; प्रशासनाकडून जय्यत तयारी भुसावळ पाडळसे शिवार (ता. यावल) येथे १० ते १६ मार्च या कालावधीत पंडित प्रदीप मिश्रा यांची शिवमहापुराण कथा होणार असून दररोज सुमारे तीन लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सुरक्षा, वाहतूक आणि मूलभूत सुविधांसाठी सविस्तर कृती आराखडा तयार केला आहे. शुक्रवारी भुसावळ प्रांत कार्यालयातील तापी सभागृहात अपर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी रेल्वे, पोलीस, ग्रामपंचायत, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, अन्न व औषध प्रशासन, अग्निशमन, आपत्ती व्यवस्थापन आदी विभागांना समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तापी नदी सध्या काठोकाठ भरलेली असल्याने नदीकाठावर विशेष…
फेब्रुवारीच्या अखेरीस महाराष्ट्रातील हवामानात बदल पाहायला मिळत आहे. जळगाव । फेब्रुवारीच्या अखेरीस महाराष्ट्रातील हवामानात बदल पाहायला मिळत आहे. एकीकडे थंडी ओसरून उन्हाचा चटका वाढू लागला असताना त्यातच राज्यावर अवकाळी पावसाचे सावट आहे. मागच्या दोन दिवसात काही ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं नुकसान झाले. दरम्यान, आज देखील राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटी होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटी होण्याची शक्यता वर्तविली असून त्याच पार्श्वभूमीवर पावसाचा येलो अलर्ट जारी केला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, विदर्भात कमाल तापमानाचा पारा ३७ अंशांवर गेल्याने उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. अशातच मराठवाडा, मध्य…

