भुसावळ शहरात स्मार्ट मीटरमुळे सुमारे ३० टक्के ग्राहक त्रस्त झाले आहेत. भुसावळ प्रतिनिधी – भुसावळ शहरात स्मार्ट मीटरमुळे सुमारे ३० टक्के ग्राहक त्रस्त झाले आहेत. मीटर ऑनलाइन झाल्याने बिल न भरल्यास वीजखंडित होतेय, तर बिल भरूनही काहींची वीज गुल झाली आहे. सध्या दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू असताना विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला . विज आवश्यक आहे परंतु विजेचा लंपडाव सुरूच असल्याने संताप वाढला आहे. काल तापी नगर परिसरात अशा अनेक तक्रारी समोर आल्या.ग्राहकांच्या म्हणण्यानुसार, स्मार्ट मीटर बसवल्यानंतर ऑनलाइन पेमेंट प्रक्रियेत अडचणी येत आहेत. बिल भरले तरी सिस्टम अपडेट न होताच वीज बंद पडते. सिस्टीम वर बिल भरल्या बरोबर लाईट सुरू व्हायला पाहीजे तर बिल…
Author: Editorial Desk
प्रमुख पाहुणे डॉ संगीता बियाणी यांनी रेल्वे मधील महिला कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – भुसावळ येथील रेल्वेच्या इलेक्ट्रीक लोको शेड मध्ये होली के रंग महिलाओ के संग कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. प्रमुख पाहूणे म्हणून बियाणी एज्यूकेशन गृपच्या सेक्रेटरी डॉ.संगिता बियाणी,इलेक्ट्रिक लोको शेडचे मुख्य अभियंता चाणक्य जैन व त्यांच्या पत्नी प्रियंका जैन उपस्थित होत्या.यावेळी प्रमुख पाहुणे डॉ संगीता बियाणी यांनी रेल्वे मधील महिला कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रियंका जैन यांनी शेड मधील महिलांसाठी प्रथमच विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी त्यांनी रेल्वे कर्मचारी महिलांना मार्गदर्शन केले. प्रसंगी महिलांनी आपले कला गुण सादर केले. गुणवंत रेल्वे कर्मचारी…
फैजपूरला आजपासून भरणार खंडोबाची भव्य यात्रा : प्रशासन सज्ज, हजारोंच्या संख्येने येणार भाविक भक्त प्रा. उमाकांत पाटील फैजपूर प्रतिनिधी : खान्देशवासीयांचे आराध्य दैवत प्रतिजेजुरी खंडोबाराया यांच्या फैजपूर येथील भव्य यात्रोत्सवासप्रारंभ झाला असून परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. या यात्रेस महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, मध्यप्रदेशव इतर विविध राज्यांतून व्यापारी व भाविक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. दरवर्षी लाखो भाविक यायात्रेस उपस्थित राहत असून कर्णछेदनासारखे धार्मिक विधीही येथे मोठ्या प्रमाणावर पार पडतात. सुमारे २००वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या खंडोबा देवस्थानातील मूर्ती अत्यंत प्राचीन असून ती इंदूरचे होळकर सरकार यांचीदेणगी असल्याचे सांगितले जाते. मूर्ती न्हावी गावाकडे नेत असताना बैलगाडी अचानक थांबली व पुढे सरकलीनाही.…
अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करणार – रामकृष्ण बी.पाटील ! जळगाव – राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत काम करणाऱ्या सुमारे दोन लाख अंगणवाडी सेविका मदतनीसांना डिसेंबर पासून केंद्र सरकारच्या हिस्साचे मानधन प्रलंबित आहे.योजनाबाह्य(उदा. लाडकी बहीण योजनेची केवायसी,एकल महिला व बालक सर्वे)कामांमुळे आधीच त्रस्त झालेल्या सेविका मदतनीस आता मानधनमुळे त्रस्त झाल्या आहेत. अंगणवाडी सेविकांना तेरा हजार पाचशे आणि मदतनीसांना सात हजार पाचशे रुपये केंद्र आणि राज्य सरकार मिळून मानधन अदा केले जाते.सदरचे मानधन आयुक्त,कार्यालय बेलापूर,नवी मुंबई यांच्या मार्फत थेट बँक खात्यात वर्ग केले जाते.एकूण मानधनपैकी केंद्र सरकार सेविकांना साडे चार हजार तर मदतनीसांना दोन हजार दोनशे पन्नास रुपये मानधन देते.सदरचे मानधन…
शेती शिवारात हरभरा कापणीच्या कामाला महिला गेलेल्या असतांना त्यांच्यावर अचानक मधमाशांनी हल्ला चढवला . भुसावळ प्रतिनिधी – तालुक्यातील सुनसगाव येथील शेती शिवारात हरभरा कापणीच्या कामाला महिला गेलेल्या असतांना त्यांच्यावर अचानक मधमाशांनी हल्ला चढवला . त्यामुळे चार महिला जखमी झाल्याची घटना घडली.याबाबत माहिती अशी की १ मार्च रोजी सकाळी १० वाजता येथील शेतकरी एकनाथ गोविंदा भोळे यांच्या गोजोरा रस्त्यावर असलेल्या गावानजिक च्या शेतात चारुलता एकनाथ भोळे व सोबत गावातील महिला अनिता सतिश पाटील , रंजना रोहिदास पाटील तसेच एक आदिवासी पावरा महिला अशा चौघी महीला हरभरा पिकाची कापणी करीत असताना अचानक मधमाशांनी हल्ला केला. त्यामुळे या महिलांनी वाचवा वाचवा म्हणत गावाकडे…
शनिपेठ परिसरात भाजीपाला विक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची अखेर दखल घेण्यात आली. जळगाव । शहरातील शनिपेठ परिसरात भाजीपाला विक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची अखेर दखल घेण्यात आली. नागरिकांनी सोशल मीडियावर आवाज उठवल्यानंतर स्थानिक नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी तत्काळ पुढाकार घेत मनपा प्रशासनाशी थेट संपर्क साधला. तक्रारीची दखल घेत शनिवारीच अतिक्रमण विभागाने कारवाई करत शनिपेठेतील दोन्ही गल्ल्यांमधील अतिक्रमण हटवले. जळगाव शहरातील शनिपेठ परिसरात बळीराम मंदिर आणि शनिमंदिर समोरील गल्लीत दररोज भाजीपाला विक्रेते रस्त्यावर लोटगाडी लावून किंवा रस्त्यावर बसून भाजीपाला विक्री करतात. भाजीपाला विक्रेत्यांमुळे जवळपास ७० टक्के रस्ता ब्लॉक होतो आणि वाहनचालकांना ये-जा करण्यास रस्ता राहत नाही. शनिवारी तर कहरच असतो, काही मुजोर…
गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. जळगाव । गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. १ मार्च २०२६ रोजी सरकारने एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ केली. तथापि, ही वाढ व्यावसायिक गॅस सिलिंडर (१९ किलो) वर लागू होते. त्यामुळे व्यावसायिकांच्या खिशाला चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे. घरगुती स्वयंपाकाच्या गॅसची (१४ किलो) किंमत अद्यापही बदललेली नाही. संपूर्ण देशभरात कमर्शियल एलपीजी गॅसच्या किंमती बदलल्या आहेत. या किंमतीत २८ रुपयांनी वाढ झाली आहे. आता तुम्हाला १९ किलो वजनाचा एलपीजी गॅस सिलेंडर १७६८.५० रुपयांना मिळणार आहे. याआधी हा दर १७४०.५० रुपये होता. त्यामुळे रेस्टॉरंट, हॉटेल आणि लहान व्यवासायिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान,…
बसस्थानकातच महिलांनी दिला बेदम चोप पारोळा : सध्या सर्वत्र लग्नसराई सुरू झाली असून प्रत्येक बसस्थानकात प्रवाशांची गर्दी वाढली असून याचा फायदा काही भुरटे चोर घेत असल्याच्या घटना वाढल्या आहेत. याप्रमाणे पारोळा येथील बसस्थानकात मंगलपोत चोरणाऱ्या एका महिलेस महिलांनी रंगेहात पकडल्यानंतर तिला बेदम चोप दिला. परंतु वेळेतच पोलीस दाखल झाल्याने महिला बचावली. सध्या लग्नसराई सुरू असून दि २५ रोजी लग्नाची मोठी तारीख असल्याने पारोळा शहरातील बसस्थानकात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यानिमित्ताने दोन ते तीन महिला चोरट्या महिला बसस्थानकात दाखल झाल्या होत्या. अनेक गाड्या भटकल्यानंतर त्यांनी फलाट क्रमांक सातवर उभी असलेली पारोळा-चाळीसगाव बसमध्ये प्रवाशांनी चढण्यासाठी एकच गर्दी केल्याचे पाहून गर्दीत ललिता…
चोरीच्या खोट्या आरोपामुळे मानसिक त्रास सहन करावा लागल्याने शिंदाड येथील २२ वर्षीय युवकाने पुण्यात रेल्वेखाली आत्महत्या शिंदाड ता. पाचोरा : चोरीच्या खोट्या आरोपामुळे मानसिक त्रास सहन करावा लागल्याने शिंदाड येथील २२ वर्षीय युवकाने पुण्यात रेल्वेखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. याबाबत प्राप्त माहिती अशी की, शिंदाड येथील अतुल लक्ष्मण अहिरे (वय २२) हा युवक पुणे जिल्ह्यातील वाघोली परिसरात असलेल्या प्राणा बँकवेट हॉटेलमध्ये नोकरी करत होता. तो मागील काही महिन्यांपासून तेथे कामावर होता. दरम्यान, हॉटेलमध्ये चोरी झाल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात येऊन गुन्हा काबुल करण्यास हॉटेल संचालकांनी…
एका तरुणाने गरोदर प्रेयसीला पाणीपुरीतून विष टाकून दिल्याची संतापजनक घटना घडली पाणीपुरी हा सगळ्यांचा आवडता पदार्थ आहे. मात्र याच आवडीचा फायदा घेऊन एका तरुणाने गरोदर प्रेयसीला पाणीपुरीतून विष टाकून दिल्याची संतापजनक घटना घडली आहे. सुदैवाने जीवित हानी झालेली नाही. याप्रकरणी संबंधित तरुणीने पोलीस ठाण्यात प्रियकराविरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेत आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना झारखंडमधील गढवा जिल्ह्यातील रामकांडा पोलीस स्टेशन परिसरात घडली आहे. करण (बदलेलं नाव ) आणि सिमरन (बदलेलं नाव ) हे दोघेही गेल्या ६ वर्षांपासून प्रेमसंबंधात होते. करणने सिमरनला लग्न करण्याचं आमिष देऊन तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवले. दरम्यान त्यांना एक मूल…

