राज्यातील लाडक्या बहिणींना दिलासा; दोन महिन्यांचे ३ हजार रुपये एकाचवेळी मिळणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. फेब्रुवारी व मार्च महिन्याचा रखडलेला हप्ता राज्य सरकारकडून एकाचवेळी देण्याचे संकेत मिळाले असून हा निधी एप्रिल महिन्यात १५ तारखेपूर्वी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र याचवेळी ई-केवायसी न केलेल्या महिलांना या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते. महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. राज्यातील लाखो महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच सादर…
Author: Nilesh Ajmera
गॅस दरवाढीने चालक हैराण ; रिक्षा भाडेवाढीने प्रवाशांना फटका जळगाव । इस्रायल-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या गॅसचा तुटवडा आणि गॅसच्या दरवाढीने सर्वसामान्य होरपळून निघत आहे. एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे रिक्षा चालकांना देखील फटका बसला आहे. गॅसचा पुरवठा सुरळीत असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात गॅस एजन्सी आणि पंपांवर नागरिकांच्या लांबलचक रांगा लागलेल्या आहेत. अनेक ठिकाणी नागरिकांना पहाटेपासून सिलेंडरसाठी थांबावे लागत असून ऑनलाईन बुकिंगही सुरळीत होत नसल्याने सर्वसामान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. जळगाव शहरातही याचा मोठा परिणाम दिसून येत आहे. इच्छा देवी चौक परिसरातील एलपीजी गॅस पंपावर रिक्षांमध्ये गॅस भरण्यासाठी चालकांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. शहरात एकूण तीन एलपीजी गॅस…
पाचोरा तालुक्यातील वरसाडे तांडा क्रमांक ३ येथे एका तरुणाच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला जळगाव । पाचोरा तालुक्यातील वरसाडे तांडा क्रमांक ३ येथे एका तरुणाच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मोबाईलमध्ये असलेल्या अश्लील व्हिडिओच्या कारणावरून पती-पत्नीने संगनमताने तरुणाचा खून केला असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. विजय भिमा राठोड असं मयत तरुणाचे नाव आहे. तर संजय परशुराम जाधव व सोनाली संजय जाधव असं अटक केलेल्या पती,पत्नीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. नेमकी काय आहेत घटना? मिळालेल्या माहितीनुसार, मयत विजय राठोड याने आरोपी सोनाली जाधव हिचे काही अश्लील व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित केल्याची माहिती तिच्या पती संजय…
केंद्र सरकारचा रेशनबाबत महत्त्वाचा निर्णय; राज्यांना दिल्या सूचना? जळगाव । तुम्हीही रेशन कार्ड धारक असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने मोफत धान्य वितरण योजनेसंदर्भातील महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यात जून २०२६ पर्यंत ३ महिन्याचे वितरित होणारे तांदूळ आणि गहू केंद्रीय साठ्यातून आगाऊ उचलून नागरिकांपर्यंत तातडीने पोहोचवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या संदर्भात राज्यांच्या अन्न सचिवांना पत्र पाठवून माहिती देण्यात आली आहे. केंद्राच्या पत्रानुसार, आगामी गहू खरेदी हंगाम सुरू होणार असल्यामुळे गोदामांवर ताण येऊ नये यासाठी राज्यांनी नियोजित वाटपातील धान्य लवकर उचलावे. साठवणूक क्षमता आणि वाहतूक व्यवस्थेवरील दबाव लक्षात घेऊन लाभार्थ्यांपर्यंत धान्य त्वरित पोहोचवण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे सरकारी…
जुगार अड्ड्यावर चाळीसगाव ग्रामीण पोलीसांनी धाड टाकून कारवाई केली. चाळीसगाव प्रतिनिधी : तालुक्यातील तरवाडे येथे स्मशानभूमी जवळ सुरू असलेल्या झन्ना मन्ना नावाच्या जुगार अड्ड्यावर चाळीसगाव ग्रामीण पोलीसांनी धाड टाकून कारवाई केली. यावेळी ५ जणांना ताब्यात घेतले गेले, तर दोन जण पळून गेले.पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या जुगारींकडून जुगाराची साधने, १४,८९० रुपये रोकड, ३८,००० रुपये किंमतीचे मोबाईल आणि १,१०,००० रुपये किंमतीच्या तीन दुचाकी असा एकूण १,६२,८९० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही माहिती सहाय्यक निरीक्षक नितीन पाटील यांना मिळाली आणि त्यांनी कारवाईचे आदेश दिले. एएसआय युवराज नाईक , हवालदार ओंकार सुतार , संदीप पाटील , पोकोन , विजय पाटील , श्रीराम कांगणे यांनी गुरुवारी (१२…
रावेर येथील कथेत खाटू श्याम बाबा जन्मोत्सव साजरा रावेर प्रतिनिधी : येथील रोकडा हनुमान व्यायाम शाळा आयोजित सुरु असलेल्या खाटू नरेश श्री श्याम बाबांची महाकथा सत्संग अमृत महोत्सवाच्या चतुर्थ दिनी भगवान श्री खाटू श्याम बाबा यांच्या जन्मोत्सव साजरा करण्यात आले.कार्तिक शुक्ल एकादशी च्या दिवशी भगवान श्री खाटू श्याम बाबा यांचे प्रागटय भीम पुत्र घटो तकच्च व माता मोरवी यांच्या घरी हिडिंबा वनात झाले होते. आणि लहानपणापासून भगवान श्री कृष्णा च्या शरणी जाऊन आशीर्वाद प्राप्त करून घोर तप करण्याचे वरदान प्राप्त करून बाल्यावस्थेत राक्षस कुळात जन्मलेले बरबरीक नावाने ओळखले जाणारे खाटू श्याम बाबा यांचे बालपण नित्य ईश्वर भक्तीत तल्लीन होते असे रावेर येथील…
यावल तालुक्यातील साकळी मंडळात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर यावल प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या 18 फेब्रुवारी 2025 च्या शासन निर्णयानुसार,गतिमान प्रशासन व आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण योजनेअंतर्गत यावल तालुक्यातील साकळी मंडळात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर दिनांक 14 मार्च रोजी संपन्न झाले.या शिबीराचे उद्घाटन आमदार चंद्रकांत बळीराम सोनवणे, विजयकुमार ढगे.महसूल उपजिल्हाधिकारी,यावल तहसीलदार श्रीमती मोहनमाला नाझीरकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी विविध प्रशासकीय विभागांचे अधिकारी,स्थानिक लोकप्रतिनिधी,विविध तालुका स्तरीय शासकीय अधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.शिबीरामध्ये दिले गेलेले ठळक लाभ :जिवंत सातबारा वाटप : एकूण वारस नोंदी 112 प्रातिनिधिक स्वरुपात वाटप 07 उत्पन दाखले वाटप प्रातिनिधिक स्वरुपात 09…
वरणगाव येथे गावठी कट्ट्यासह एकाला अटक वरणगांव प्रतिनिधी : वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या आदेशानुसार स्थागुशा पथकाने कारवाई करत गावठी कट्टा व जिवंत काडतुसे जप्त करून एका आरोपीस ताब्यात घेतल्याची घटना १३ मार्च रोजी घडली आहे .पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रेमचंद सपकाळे, सलीम तडवी, उमाकांत पाटील तसेच पोलीस नाईक श्रीकृष्ण देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र चौधरी, छगन तायडे व रतन गिते यांनी वरणगाव पोलीस स्टेशन हद्दीत ही कारवाई केली. या कारवाईदरम्यान आरोपी संजय गोपाल चंदेले (वय 50, रा. ऑर्डनन्स फॅक्टरी परिसर, वरणगाव ता. भुसावळ) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून 25,000 रुपये किंमतीचा एक सिल्वर रंगाचा गावठी…
देशांमधील युद्धांमुळे देशासह महाराष्ट्रात एलपीजी गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. जळगाव । आखाती देशांमधील युद्धांमुळे देशासह महाराष्ट्रात एलपीजी गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे हॉटेल्स व्यवसाय धोक्यात आले असून अनेक ठिकाणी सिलिंडरसाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दरम्यान राज्यात गॅस टंचाईचे सावट गडद होत असताना राज्य सरकारने एलपीजी सिलिंडर वितरणासाठी नवे नियम लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गॅसचा काळाबाजार रोखणे आणि अत्यावश्यक सेवा सुरू ठेवणे या उद्देशाने ही नियमावली लागू करण्यात आली असून यानुसार विविध क्षेत्रांना प्राधान्याने गॅस पुरवठा केला जाणार आहे. सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, शाळा वसतिगृहे, अंगणवाड्या, शासकीय खानावळी…
महापौर दीपाली यांनी वाहतूक शाखेला धडक कारवाई करण्याचे निर्देश देत पत्र पाठविले आहे. जळगाव-प्रतिनिधी । जळगाव शहरातील प्रमुख व वर्दळीच्या रस्त्यांवर अनाधिकृतपणे उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापौर दीपाली मनोज काळे यांनी वाहतूक शाखेला धडक कारवाई करण्याचे निर्देश देत पत्र पाठविले आहे. शहरातील नागरिकांकडून वारंवार तक्रारी येत असल्यामुळे ही बाब गंभीर बनली असून वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. महापौर दीपाली काळे यांनी जळगाव शहर वाहतूक शाखेच्या निरीक्षकांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे की, जळगाव हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असल्याने विविध तालुके, उपनगर आणि ग्रामीण भागातील नागरिक शासकीय कामकाज, वैद्यकीय उपचार, बाजारपेठ…

