Author: Nilesh Ajmera

जळगाव दिवाणी न्यायालयाने महापालिका आयुक्तांना कडक शब्दांत फटकारले आहे. जळगाव प्रतिनिधी – शिवाजी नगर भागातील हुडको घरकुल योजनेसाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला तब्बल २५ वर्षांनंतरही न दिल्याने, जळगाव दिवाणी न्यायालयाने महापालिका आयुक्तांना कडक शब्दांत फटकारले आहे. ‘तुम्हाला अटक करून दिवाणी कारागृहात का पाठविण्यात येऊ नये?’ अशी विचारणा करणारी ‘कारणे दाखवा’ नोटीस न्यायालयाने बजावली असून, या प्रकरणाने महापालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची पार्श्वभूमी १९९९ सालापासूनची आहे. महापालिकेने शिवाजी नगरातील हुडको योजनेसाठी श्रीराम गोपालदास खटोड (रा. जयनगर, जळगाव) यांच्या मालकीची दोन एकर जागा संपादित केली होती. मात्र, या जागेचा मोबदला देण्यास प्रशासनाकडून सातत्याने दिरंगाई करण्यात आली. जमीन मालकाने याविरोधात…

Read More

भारत गॅस गोडाऊनमध्ये अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून ५८ भरलेले गॅस सिलिंडर चोरी केल्याची घटना २६ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. वरणगाव प्रतिनिधी : शहराजवळील बोहर्डी शिवारातील लालमाती परिसरात असलेल्या भारत गॅस गोडाऊनमध्ये अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून ५८ भरलेले गॅस सिलिंडर चोरी केल्याची घटना २६ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. चोरीस गेलेल्या सिलिंडरांची एकूण किंमत सुमारे ७४ हजार १२४ रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी गॅस एजन्सीचे संचालक नरेंद्र उत्तमराव आहिरे (वय 51, रा. शांतिनगर, भुसावळ) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची रोहंत गॅस एजन्सी ही भारत गॅस कंपनीची वितरक असून मुख्य कार्यालय मकरंद नगर, वरणगाव येथे आहे.संबंधित गोडाऊनमध्ये जळगाव…

Read More

दररोज तीन लाख भाविक येणार ; प्रशासनाकडून जय्यत तयारी भुसावळ पाडळसे शिवार (ता. यावल) येथे १० ते १६ मार्च या कालावधीत पंडित प्रदीप मिश्रा यांची शिवमहापुराण कथा होणार असून दररोज सुमारे तीन लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सुरक्षा, वाहतूक आणि मूलभूत सुविधांसाठी सविस्तर कृती आराखडा तयार केला आहे. शुक्रवारी भुसावळ प्रांत कार्यालयातील तापी सभागृहात अपर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी रेल्वे, पोलीस, ग्रामपंचायत, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, अन्न व औषध प्रशासन, अग्निशमन, आपत्ती व्यवस्थापन आदी विभागांना समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तापी नदी सध्या काठोकाठ भरलेली असल्याने नदीकाठावर विशेष…

Read More

फेब्रुवारीच्या अखेरीस महाराष्ट्रातील हवामानात बदल पाहायला मिळत आहे. जळगाव । फेब्रुवारीच्या अखेरीस महाराष्ट्रातील हवामानात बदल पाहायला मिळत आहे. एकीकडे थंडी ओसरून उन्हाचा चटका वाढू लागला असताना त्यातच राज्यावर अवकाळी पावसाचे सावट आहे. मागच्या दोन दिवसात काही ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं नुकसान झाले. दरम्यान, आज देखील राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटी होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटी होण्याची शक्यता वर्तविली असून त्याच पार्श्वभूमीवर पावसाचा येलो अलर्ट जारी केला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, विदर्भात कमाल तापमानाचा पारा ३७ अंशांवर गेल्याने उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. अशातच मराठवाडा, मध्य…

Read More

जळगाव शहरातील रहिवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. जळगाव । जळगाव शहरातील रहिवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच पाण्याची मागणी वाढली असून याच पार्श्वभूमीवर शहरात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ज्या प्रभागांमध्ये अमृत पाणी पुरवठा योजनेची कामे पूर्ण झाली आहेत, तिथे आता एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले आहे.जळगाव शहरात अमृत पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून, अनेक प्रभागांमध्ये नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर महापौरांनी आयुक्तांना पत्र दिले. बहुतांश प्रभागांत नवीन जलवाहिन्यांद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला आहे. उन्हाळ्यामुळे पाण्याची मागणी वाढली असून, नागरिक सध्याच्या दोन दिवसाआड पाणी पुरवठ्यातील अंतर कमी करण्याची मागणी करीत आहेत. त्यामुळे ज्या भागात…

Read More

महाराष्ट्र राज्य शासनाचे कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी ही बातमी आहे. जळगाव । तुम्हीही महाराष्ट्र राज्य शासनाचे कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी ही बातमी आहे. शासनाने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी कॅज्युअल रजेच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. नव्या बदलांमुळे आता कर्मचाऱ्यांना रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्या रजेसोबत सहज जोडता येणार आहेत. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना सलग सुट्ट्यांचे नियोजन अधिक सुलभ होणार आहे. महाराष्ट्र शासन वित्त विभाग यांनी जारी केलेल्या नव्या आदेशानुसार, राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या कॅज्युअल रजेच्या आधी (प्रिफिक्स), नंतर (सफिक्स) किंवा रजेच्या कालावधीत येणारे रविवार तसेच सार्वजनिक सुट्ट्या जोडण्याची परवानगी देण्यात आली आहे.यापूर्वी 2 मार्च 1981 रोजी देण्यात आलेली ही सवलत तात्पुरत्या स्वरूपात होती; मात्र…

Read More

वाड्या-वस्त्यांवरील शेतकरीवर्ग मोठ्या प्रमाणात उन्हाळी गरवी कांद्याची लागवड करतात. पुरंदर तालुक्यातील वीर, परिंचे, माहूर, मांढर, हरगुडे, यादववाडी, पांगारे, हरणी, लपतळवाडी, तोंडल, तसेच विविध वाड्या-वस्त्यांवरील शेतकरीवर्ग मोठ्या प्रमाणात उन्हाळी गरवी कांद्याची लागवड करतात. पुरंदर तालुक्यातील या गावांना कांद्याचे आगार म्हटले जाते. या बहुतांशी गावांमध्ये मोठे बागायतदार तसेच छोटे शेतकरी हे हळवे आणि गरी कांद्याची लागवड करत असतात व त्यातून त्यांना चार पैसे अधिकचे मिळतात. परंतु, या वर्षी कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात गडगडल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. गेल्या वर्षी गरवी कांद्याला बऱ्यापैकी भाव मिळाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी या वर्षी कांदालागवड मोठ्या प्रमाणात केली होती. बाजारभाव पडल्यामुळे ग््रााहकांचा फायदा होणार असला, तरी शेतकरी…

Read More

महिला अत्याचाराच्या घटना राज्यात कुठे ना कुठे होत आहेत. महिला अत्याचाराच्या घटना राज्यात कुठे ना कुठे होत आहेत. त्यात बीडमध्ये दिवसा-ढवळ्या दोन तरुणींच्या अपहरणाची बातमी समोर आली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही सख्ख्या बहिणी होत्या. बीडच्या माजलगावमध्ये ही घटना घडली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मात्र या दोन बहिणी मधील लहान बहिणीने दाखवलेलं धाडस आणि प्रसंगावधान कौतूक करण्यासारखेच आहे. त्यामुळे अपहरणाचा डाव उधळला गेला. दोन्ही तरुणी या सुरक्षित आपल्या घरी ही परतल्या. बीड जिल्ह्यात गुन्हेगारीची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. माजलगाव शहरात दिवसाढवळ्या दोन सख्ख्या बहिणींच्या अपहरणाचा थरार उघडकीस आला आहे. सुंदरराव सोळंके महाविद्यालयासमोर तीन आरोपी उभे होते. त्यांचा या…

Read More

६७ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कामगिरी जळगाव : बऱ्हाणपूरच्या मसाला व्यापाऱ्याची गाडी अडवून ८ लाख रुपये लुटणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात रावेर पोलिसांना मोठे यश आले आहे. रावेर गुन्हे शोध पथकाने शिताफीने तपास करत ७ संशयितांना बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याकडून साडेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. मात्र, या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार आणि रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार ‘हसन फावड्या’ पोलिसांना हुलकावणी देऊन पसार झाला आहे. नेमकी घटना काय? बऱ्हाणपूर येथील मसाला व्यापारी दीपक सुरेश धर्मानी यांनी ६ फेब्रुवारी २०२६ रोजी त्यांचे कर्मचारी गौरव वाघ आणि तौफिक तेली यांना वसुलीसाठी सावदा, फैजपूर आणि रावेर परिसरात पाठवले होते. वसुली आटोपून रात्री ९ वाजेच्या…

Read More

97 लक्ष रकमेच्या मुळ अंदाजपत्रकास बुधवार 25 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद ठराव समितीच्या सभेत सादर करण्यात आले. जळगाव : जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नाचे, सन 2025-26 चे सुधारीत 46 कोटी 93 लक्ष व सन 2026-27 चे 50 कोटी 97 लक्ष रकमेच्या मुळ अंदाजपत्रकास बुधवार 25 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद ठराव समितीच्या सभेत सादर करण्यात आले. त्यास ठराव समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी मान्यता दिली. जिल्हा परिषदेच्या ठराव समितीच्या बैठकीचे आयोजन बुधवार 25 फेब्रुवारी रोजी शाहू महाराज सभागृहात 11 वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.या वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी,जिल्हा…

Read More