Author: Nilesh Ajmera

डॉ. महेश्वर रेड्डी यांची बदली राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथे करण्यात आली आहे. जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात पोलिस प्रशासनात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला असून, विद्यमान पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची बदली राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथे करण्यात आली आहे. त्यांच्या जागी धुळे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांची जळगावचे नवे एसपी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीकांत ढिवरे हे 2014 बॅचचे आयपीएस अधिकारी असून सध्या ते धुळे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. यापूर्वी त्यांची मुंबईहून धुळे येथे बदली झाली होती.विविध जिल्ह्यांमध्ये त्यांनी जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या असून, कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या बाबतीत त्यांची ठाम पकड…

Read More

माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथक रवाना करण्यात आले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेण्यात आले. चाळीसगाव प्रतिनिधी : शहरातील भडगाव रोडवरील स्टेट बँक ऑफ इंडिया एटीएममध्ये कार्ड बदलून ४० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीस चाळीसगाव शहर पोलिसांनी अटक केली आहे.याबाबत माहिती अशी की, दिनांक १ एप्रिल २०२६ रोजी दुपारी सुमारास विकास भावलाल राठोड (वय ४०, रा. चैतन्य तांडा, करगाव, ता. चाळीसगाव) हे एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेले असता एका अनोळखी इसमाने हातचलाखीने त्यांचे एटीएम कार्ड बदलून त्यांच्या खात्यातून ४० हजार रुपये काढले. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४५/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ कलम…

Read More

नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांनी संतप्त भूमिका घेत ठेकेदारांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. भुसावळ प्रतीनीधी – भुसावळ शहरातील पाणीपुरवठा आणि विकासकामांच्या रखडलेल्या प्रश्नांवरून भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री चेतन भंगाळे (गौर) यांनी संतप्त भूमिका घेत ठेकेदारांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हा नियोजन समिती अध्यक्षांकडे निवेदन सादर करत प्रशासनालाच जाब विचारला आहे.निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, भुसावळ शहरातील अमृत पाणीपुरवठा योजना तब्बल आठ ते दहा वर्षांपासून संथ गतीने रेंगाळत असून अद्यापही पूर्णत्वास गेलेली नाही. सुरुवातीला ९० कोटींची असलेली ही योजना आता १३५.७६ कोटींपर्यंत फुगली असतानाही कामाचा दर्जा आणि गती यावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पाईपलाईन टाकताना निकृष्ट काम झाल्याचा आरोप असून मंजूर…

Read More

नगराध्यक्षा गायत्री भंगाळे-गौर यांच्या जात प्रमाणपत्रावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. भुसावळ प्रतिनिधी : भुसावळ शहरातील राजकारण सध्या तापले असून नगराध्यक्षा गायत्री भंगाळे-गौर यांच्या जात प्रमाणपत्रावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. भाजपच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत गटनेते युवराज लोणारी यांनी भंगाळे यांच्या आरोपांचे जोरदार खंडन करत उलट त्यांच्या जात प्रमाणपत्रावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे . वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या संपर्क कार्यालयात पार पडलेल्या या पत्रकार परिषदेत नगरसेवक पिंटू कोठारी, परिक्षित बऱ्हाटे, निकी बत्रा, राजू आवटे, राहुल तायडे, बोधराज चौधरी , पुरुषोत्तम नारखेडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. युवराज लोणारी यांनी दावा केला की, नगराध्यक्षा भंगाळे-गौर या कुरमी ओबीसी प्रवर्गातील असून…

Read More

नंदू आप्पा पाटील यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जळगाव प्रतिनिधी : शिवसेना पक्षाच्या महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेत जळगाव जिल्ह्यासाठी मोठा राजकीय निर्णय घेत नंदू आप्पा पाटील यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे जिल्ह्यात शिवसेनेला नवी ऊर्जा आणि बळ मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना मुख्यनेते मा. एकनाथ संभाजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. गुलाबराव पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही महत्त्वाची जबाबदारी नंदू आप्पा पाटील यांच्यावर सोपवण्यात आली आहे. महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेचे प्रदेशाध्यक्ष मा. शिवाजी भोर यांच्या हस्ते त्यांना नुकतेच अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. नंदू आप्पा…

Read More

पोलीस अधीक्षक कार्यवाही करणार का.. ? भुसावळ प्रतिनिधी – मंत्री महोदयाच्या पत्नीने जात पडताळणी साठी बनावट कागदपत्रे सादर केल्या प्रकरणी नगराध्यक्षां गायत्री भंगाळे यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार केल्याने पुढील कार्यवाही काय होणार.? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. भुसावळच्या नगराध्यक्ष सौ. गायत्री भंगाळे यांनी मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांच्यासह काही सहकाऱ्यांविरोधात जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे.जात पडताळणी प्रक्रियेत अडथळा आणण्यासाठी खोटे आणि बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.तक्रारीनुसार आपल्या जात पडताळणी प्रकरणात आपला दावा सिद्ध होऊ नये, यासाठी विरोधकांनी उत्तर प्रदेशातील फत्तेपूर बजेरिया, महोबा येथून काही कागदपत्रे गोळा करून समितीसमोर सादर केली.…

Read More

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि भाजप खासदार बांसुरी स्वराज यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. जळगाव । दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आलीय. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि भाजप खासदार बांसुरी स्वराज यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर भाजपच्या महिला खासदारांनी संसदेच्या आवारात जोरदार घोषणाबाजी केली. भाजप खासदारांनी आंदोलन करून विरोधकांवर टीका केली. परंतु संसदेच्या आवारात आंदोल केल्याप्रकरणी पोलिसांनी आज शनिवारी खासदार केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, खासदार बन्सुरी स्वराज यांना ताब्यात घेतलं आहे.नेमकी घटना काय? शुक्रवारी लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मांडण्यात आले होते, मात्र बहुमताअभावी हे विधेयक नामंजूर झाले. विधेयक पडल्याचे स्पष्ट होताच भाजपच्या महिला खासदारांनी आक्रमक…

Read More

वाहन चोरीच्या घटना काही कमी होताना दिसत नसून यामुळे वाहनधारक धास्तावले आहे. जळगाव । जळगाव शहरात वाहन चोरीच्या घटना काही कमी होताना दिसत नसून यामुळे वाहनधारक धास्तावले आहे. याच दरम्यान, जिल्हापेठ पोलिसांनी एका रिक्षा चोरट्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील रिक्षा चोरीचा अवघ्या काही दिवसांत छडा लावत पोलिसांनी चोरीची रिक्षा आणि स्पेअर पार्ट्स जप्त केले आहेत.कल्पेश ज्ञानेश्वर इंगळे (वय ३२, रा. रामेश्वर कॉलनी, मेहरूण, मूळ रा. शिरपूर, जि. धुळे) असं अटक केलेल्या संशयित चोराचे नाव आहे. जळगाव शहरातील सिव्हिल हॉस्पिटल परिसरातून १२ एप्रिल रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास एक रिक्षा चोरीला गेली होती. याप्रकरणी १३ एप्रिल रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात…

Read More

रुग्णवाहीकाच नसल्याने रुग्णांचे हाल जिल्हा परीषद रुग्णवाहिका दुरुस्तीचे बिल देत नसल्याने रुग्णवाहिका किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध हौऊ शकले नाही. किनगाव ता. यावल : किनगाव येथील प्राथमीक आरोग्य केंन्द्रात एम. १९ एम. ९२९१ क्रमांकाची १०२ रुग्णवाहिका २६ फेब्रुवारी २०२६ पासून दुरुस्तीसाठी जळगाव येथे पाठवण्यात आली आहे. ती ६ मार्च २०२६ रोजी दुरुस्तही झाली असून दुरुस्तीचे बिल २१ हजार ३२७ रुपये हे दि. ६ मार्चलाच जिल्हा परिषदे कडे पाठवण्यात आले. मात्र जिल्हा परीषद रुग्णवाहिका दुरुस्तीचे बिल देत नसल्याने रुग्णवाहिका किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध हौऊ शकले नाही. त्यामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. विशेष म्हणेज रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने रुग्ण…

Read More

शेतकऱ्याचे मोठे नुकसान प्राथमिक माहितीनुसार, वीज वाहिनीत झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. धरणगाव, – मौजे वंजारी ता. धरणगाव येथील शेतकरी पुरुषोत्तम शंकर चौधरी यांच्या गट क्रमांक 39/2 मधील शेतात आज दुपारी सुमारे दीड ते दोन वाजेच्या दरम्यान अचानक आग लागून मोठे नुकसान झाले. प्राथमिक माहितीनुसार, वीज वाहिनीत झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या आगीत सुमारे 80 आर क्षेत्रातील उभे मका पीक पूर्णतः जळून खाक झाले असून 100 टक्के नुकसान झाले आहे. घटनेनंतर तत्काळ पंचनामा करण्यात आला असून तलाठी इफ्तार देशमुख यांनी पाहणी करून अहवाल तयार केला. यावेळी एमएसईबीचे…

Read More