शहरात नियोजनाचा अभाव जाणवत होता. भुसावळ प्रतिनिधी : शहर एकेकाळी लहान खेड्यासारखे भासत होते. कापडाच्या दुकानांची स्थिती टपऱ्यांसारखी होती, शहरात नियोजनाचा अभाव जाणवत होता. मात्र या परिस्थितीत मोठा बदल घडवून आणण्याचे श्रेय संतोष भाऊ चौधरी यांना जाते. त्यांच्या दूरदृष्टी, नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे भुसावळ शहराचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलला आहे.पूर्वी ज्या ठिकाणी साधी, असुविधायुक्त दुकाने होती, त्याच ठिकाणी आधुनिक, अद्ययावत दुकाने उभी राहिली आहेत. शहरातील व्यापाराला नवी दिशा मिळाली आणि व्यापाऱ्यांसाठी अधिक चांगले वातावरण तयार झाले. बाजारपेठेत उभे राहिलेले शॉपिंग कॉम्प्लेक्स हे या विकासाचे ठळक उदाहरण आहे.नगरपालिकेच्या पडक्या शाळांची जागा आता भव्य आणि सुसज्ज शैक्षणिक कॉम्प्लेक्सने घेतली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध…
Author: Nilesh Ajmera
शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर भुसावळमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भुसावळ प्रतिनिधी : शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर भुसावळमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या नगरसेवकांवर थेट आरोप करत, “भुसावळच्या विकासाला मुद्दाम अडथळे निर्माण केले जात आहेत,” असे स्पष्टपणे सांगितले आहे . पत्रकार परिषद मध्ये त्यांनी सांगितले की, नगरपालिकेच्या बैठकीत वारंवार अडथळे निर्माण केले जातात, माईक हिसकावून घेणे, निर्णय प्रक्रियेत अडथळे आणणे अशा प्रकारे कामकाजात अडचणी निर्माण केल्या जात आहेत. “मी सामान्य कुटुंबातील महिला असल्यामुळे मला जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे,” असा गंभीर आरोपही त्यांनी केला.भंगाळे पुढे म्हणाल्या की, विकासकामांसाठी त्या विविध मंत्र्यांकडे पाठपुरावा करत असून, जनतेच्या आशीर्वादाने…
चार वर्षांपासून त्या पदावर कार्यरत असताना संबंधित अधिकारी कार्यालयात नियमितपणे हजर राहत नसल्याची तक्रार नागरिकांकडून वारंवार केली जात आहे. मुक्ताईनगर प्रतिनिधी : मुक्ताईनगर तहसील कार्यालयात कार्यरत असलेल्या निवासी नायब तहसीलदार यांच्या अनियमित उपस्थितीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या चार वर्षांपासून त्या पदावर कार्यरत असताना संबंधित अधिकारी कार्यालयात नियमितपणे हजर राहत नसल्याची तक्रार नागरिकांकडून वारंवार केली जात आहे. कार्यालयीन वेळ सकाळी ९:४५ ते सायंकाळी ६:१५ अशी निश्चित असताना, नायब तहसीलदार वेळेवर कार्यालयात येत नसल्याचे अनेकदा आढळून आले आहे. तसेच, सायंकाळीही कार्यालयीन वेळ पूर्ण होण्यापूर्वीच ते निघून जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. काही वेळा दुपारी किंवा सायंकाळी चार-साडेचारनंतरच त्यांची उपस्थिती दिसून येते,…
शिक्षेची कारणे दाखवा नोटीस पोलीस अधीक्षक यांनी सहाय्यक फौजदार यांना दिल्याने जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. जळगाव प्रतिनिधी : पुढील देय वार्षिक वेतन वाढ दोन वर्षाकरिता ( अपरिणाम कारक ) का रोखण्यात येऊ नये या शिक्षेची कारणे दाखवा नोटीस पोलीस अधीक्षक यांनी सहाय्यक फौजदार यांना दिल्याने जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की पोलीस अधीक्षक जळगाव डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दि.२४ नोव्हेंबर २०२५ रोजी सहाय्यक फौजदार अतुल रघुनाथ वंजारी नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांना दिलेल्या अंतिम आदेशात नमूद केले आहे. की कसुरी बाबत पुढील देय वार्षिक वेतनवाढ दोन (०२) वर्षाकरीता (अपरिणाम कारक) का रोखण्यात येऊ…
मुलीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मुलीला जन्म दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जळगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मुलीला जन्म दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात पतीसह सासू आणि सासऱ्यांविरुद्ध बालविवाह आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचा विवाह साधारण एक वर्षापूर्वी समाजाच्या रीतिरिवाजाप्रमाणे जळगाव तालुक्यातील एका तरुणासोबत झाला होता. लग्नानंतर पीडिता पती व सासू-सासऱ्यांसोबत राहत होती. यादरम्यान ती गरोदर राहिली. दि. ३ एप्रिल रोजी प्रसूती कळा सुरू झाल्याने तिला रात्री ८ वाजेच्या सुमारास जळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल…
भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेच्या दिवशी जिल्ह्यातील राजकीय वातावरणात मोठा बदल घडला आहे. भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेच्या दिवशी जिल्ह्यातील राजकीय वातावरणात मोठा बदल घडला आहे. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विनोद बडगुजर आणि माजी मनसे पदाधिकारी अँड सागर शिंपी यांनी दिनांक ६ एप्रिल रोजी भाजप कार्यालय जी एम फाउंडेशन येथे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पक्षात प्रवेशाच्या सोहळ्यात भाजपा जिल्हा महानगर अध्यक्ष सुरेश भोळे (राजू मामा), दीपक सूर्यवंशी तसेच भाजपचे पदाधिकारी उदय भालेराव, सदाशिव आबा, सुनील बढे, मनोज भांडारकर आणि मनोज सोनवणे उपस्थित होते. या प्रसंगी नवीन सदस्यांना पक्षाचा पारंपरिक गमछा प्रदान करून औपचारिक स्वागत करण्यात आले. विनोद बडगुजर आणि अँड सागर शिंपी…
“भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे महापुरुषांच्या प्रतिमेस अभिवादन जळगाव : सामाजिक न्याय विभागाच्या वतीने “भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन ८ ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत करण्यात आलेले असुन दि. ८ एप्रिल रोजी महापुरुषांच्या प्रतिमेस अभिवादन करून कार्यक्रमाचे उद्घाटन समाज कल्याण विभागाचे उपायुक्त श्री राकेश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रविंद्र ठाकुर,श्री योगेश पाटील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण व जिल्हयातील विविध वृत्तपत्रांचे, इलेक्ट्रॉनिक्स मिडियाचे प्रतिनिधी उपस्थित होते. या सप्ताहाच्या कार्यक्रमास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रणधीर सोमवंशी यांनी भेट देऊन सप्ताहाची रुपरेषा जाणुन घेतली आणि या सप्ताहास शुभेच्छा दिल्या. दि. ९ एप्रिल…
महापौर दीपमाला काळे यांच्या आदेशानंतर महापालिका प्रशासनाने शहरभर स्वच्छतेचा धडाका लावला आहे. जळगाव प्रतिनिधी । ‘माझं जळगाव, स्वच्छ जळगाव’ हे ब्रीदवाक्य केवळ घोषणांपुरते न ठेवता प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जळगाव शहरात मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असून, महापौर दीपमाला काळे यांच्या आदेशानंतर महापालिका प्रशासनाने शहरभर स्वच्छतेचा धडाका लावला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध भागांतून घाण, कचरा आणि अस्वच्छतेबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढत होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत महापौर दीपमाला काळे यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाला तातडीने कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार आरोग्य विभागाने मेहरूण परिसरासह शहरातील प्रमुख व्यापारी भागांमध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबवून मोठ्या प्रमाणात कचरा हटवण्याचे काम हाती घेतले. या मोहिमेअंतर्गत…
दरवाढीमुळे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी प्रवाशांना सुमारे ९० ते १०० रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. जळगाव । उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) १५ एप्रिलपासून तिकीट दरात १० टक्क्यांची हंगामी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उन्हाळी सुट्यांमध्ये गावाला जाताना प्रवाशांना अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. या दरवाढीमुळे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी प्रवाशांना सुमारे ९० ते १०० रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. महामंडळाच्या आदेशानुसार, वाढीव दर उन्हाळी हंगामात वाढणारी प्रवासी संख्या आणि उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने लागू करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ही दरवाढ केवळ साध्या, मिडी आणि जलद बस सेवांसाठी लागू असणार आहे.…
पूर्वी १२५ ते १३५ रुपयांदरम्यान मिळणारे सोयाबीन तेल आता १६० ते १७० रुपयांपर्यंत पोहोचले आहे. जळगाव । आखाती देशांमधील युद्धाची झळ थेट स्वयंपाकघरातील बजेटवर जाणवली आहे. खाद्यतेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली. विशेषतः सोयाबीन तेलाच्या दरात अचानक उसळी दिसून आली असून प्रति किलो सुमारे ३५ रुपयांची वाढ झाली आहे. पूर्वी १२५ ते १३५ रुपयांदरम्यान मिळणारे सोयाबीन तेल आता १६० ते १७० रुपयांपर्यंत पोहोचले आहे. याशिवाय शेंगदाणा, सूर्यफूल आणि पामतेलाच्या किमतींमध्येही लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर ताण वाढला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे आयात प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले आहेत. कच्चे तेल आणि खाद्यतेलाचा पुरवठा विस्कळीत झाल्याने उत्पादन…

