Author: Nilesh Ajmera

कुणी केला सरकारला जळजळीत संतप्त सवाल? मुंबईतील ड्रग्स प्रकरणासह नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतर, लैंगिक छळावरून अमित ठाकरे यांनी सरकारला खडे बोल सुनावले. अमित ठाकरे यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. त्यांनी मोठा संताप व्यक्त केला. तर आपण जर सत्तेत असतो तर अशा लोकांना अगोदर फासावर चढवले असते असा संताप त्यांनी व्यक्त केला. त्यांनी पोलिसांना २४ तासांसाठी मोकळी दिल्यास सर्व गुन्हेगार नीट होतील असे भाष्य केले. आज पुण्यात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज ठाकरेंनी सगळीकडे संपर्क अध्यक्ष नेमले आहेत. आम्ही सगळ्यांना वन टू वन भेटणार आहोत. सगळ्यांकडून जाणून घेणार आहोत आम्ही कुठ कमी पडतोय. संघटनेत काही बदल झाले पाहिजेत. सगळा सविस्तर अहवाल…

Read More

वेळेचे काटेकोर पालन यावर भर देत व्यापक नियोजन हाती घेतले आहे. भुसावळ प्रतिनिधी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात होणाऱ्या भव्य मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने शिस्त, सुरक्षितता आणि वेळेचे काटेकोर पालन यावर भर देत व्यापक नियोजन हाती घेतले आहे. १० एप्रिल रोजी कमल गणपती हॉल येथे झालेल्या बैठकीत यासंदर्भात महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या. व्यासपीठावर भुसावळ उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये पोलीस निरीक्षक महेश गायकवाड (तालुका), राहुल वाघ (बाजारपेठ), उध्दव डमाळे (शहर), सहाय्यक पोलीस निरीक्षक योगीता नारखेडे (नशिराबाद) तसेच वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश महाले, नगर पालिकेचे वैभव पवार…

Read More

आयोजित पत्रकार परिषद लोकनियुक्त अध्यक्षा सौ.छायाताई अतुल पाटील यांच्यासह त्यांच्या गटातील नगरपरिषद सदस्य उपस्थित होते. यावल प्रतिनिधी : यावल नगरपरिषद साठवण तलावाबाबत भाजपाचे तत्कालीन तालुकाध्यक्ष उमेश फेगडे यांनी दाखल केलेली जनहित याचिका औरंगाबाद खंडपीठाने फेटाळल्याची माहिती माजी नगराध्यक्ष अतुल वसंतराव पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आयोजित पत्रकार परिषद लोकनियुक्त अध्यक्षा सौ.छायाताई अतुल पाटील यांच्यासह त्यांच्या गटातील नगरपरिषद सदस्य उपस्थित होते. यावल नगरपरिषदेने सन २०१७ मध्ये १०० दशलक्ष लिटर प्रति दिवस (MLD) क्षमतेची, प्लॅस्टिक लायनिंग असलेली गळतीमुक्त पाणी साठवण तलाव बांधण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यानुसार प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (PMC) नियुक्त करण्यात आली होती.आर.एस. महाजन यांना सदर कामासाठी विहित निविदा प्रक्रिया पूर्ण…

Read More

यज्ञ सप्ताह व सामुदायक गुरुचरित्र पारायण सोहळा सुरू झाला आहे. यावल प्रतिनिधी : शहरातील भुसावळ रस्त्यावर असलेल्या श्री स्वामी समर्थ केंद्रात श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त अखंड नामजप, यज्ञ सप्ताह व सामुदायक गुरुचरित्र पारायण सोहळा सुरू झाला आहे. सदर सोहळा हा दिनांक १५ एप्रिल पर्यंत चालणार आहे. यानिमित्ताने गुरुचरित्र पारायण साठी मोठ्या संख्येत भाविक, भक्तांची येथे दररोज आता उपस्थितीत लाभणार आहे.पहिल्या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. शहरात भुसावळ रस्त्यालगत श्री स्वामी समर्थ केंद्र आहे. येथे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त गुरुवार पासून अखंड नाम यज्ञ सप्ताह व सामुदायक गुरुचरित्र पारायण सोहळ्याला सुरुवात झाली. सकाळी साडेसात वाजता औदुंबर प्रतीक्षणा, ८ वाजता भूपाळी,…

Read More

या निर्णयामुळे मुंबई, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, छत्तीसगड, झारखंड आणि पश्चिम बंगालकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा चाळीसगाव प्रतिनिधी : मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) ते हटिया तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस ते संतरागाछी दरम्यान अतिरिक्त साप्ताहिक विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. या निर्णयामुळे मुंबई, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, छत्तीसगड, झारखंड आणि पश्चिम बंगालकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.या विशेष गाड्यांना ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा आणि भुसावळ या प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आले असून चाळीसगावकरांसाठी ही आनंदाची बाब ठरली आहे. त्यामुळे स्थानिक प्रवाशांना या गाड्यांचा थेट लाभ मिळणार आहे.लोकमान्य टिळक टर्मिनस ते हटिया या विशेष गाडीच्या…

Read More

एका हिंदू तरुणीला धर्मांतर करून तिच्याकडून मुस्लिम धर्माचे धडे दिले जात होते, नाशिक येथील एका आंतरराष्ट्रीय आयटी कंपनीतील वरिष्ठांकडून हिंदू कर्मचाऱ्यांना धर्मांतर करण्याचे रॅकेट काम करीत असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतीत एका हिंदू तरुणीला धर्मांतर करून तिच्याकडून मुस्लिम धर्माचे धडे दिले जात होते, ही माहिती समोर आली आहे. त्या पीडित हिंदू मुलीला तीन वर्षे झाले. तिला मुस्लिम समाजाचे रोजे करण्यास भाग पाडले होते. ती तरुणी गेल्या तीन वर्षात ओठाला लिपस्टिक सुद्धा लावत नव्हती. तिच्यावर धर्मांतरासोबतच मानसिक छळ देखील करण्यात येत होता. म्हणजे तिची मानसिक छेडछाड करण्यात येत होती. यामध्ये हिंदू मुलींना टार्गेट करण्यात येत होते. त्या हिंदू मुलींचे धर्मांतराच्या…

Read More

संदीप गावित यांनी आपला पदभार अधिकृतपणे स्वीकारला. जळगाव । जळगावचे नवनियुक्त अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून संदीप गावित यांनी आपला पदभार अधिकृतपणे स्वीकारला. नुकताच राज्य शासनाच्या बदली आणि पदोन्नती आदेशानुसार त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली होती.जळगावचे अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांच्या जागेवर राज्य पोलिस सेवेतील अपर पोलिस अधीक्षकपदी संदीप गावीत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नखाते यांच्या बदलीची स्वतंत्र ऑर्डर निघणार असल्याने त्यांची नियुक्ती अद्याप कुठे करण्यात आले हे कळू शकले नाही. यावेळी अशोक नखाते यांनी नवनियुक्त अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. पदभार स्वीकारल्यानंतर संदीप गावित यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक…

Read More

शहरात भरदिवसा कायदा-सुव्यवस्थेचे वाभाडे काढणारी घटना घडली आहे. जळगाव । जळगाव शहरात भरदिवसा कायदा-सुव्यवस्थेचे वाभाडे काढणारी घटना घडली आहे. ‘महाराष्ट्र जनक्रांती मोर्च्या’चे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला असून, या घटनेत सपकाळे जखमी झाले आहेत. दरम्यान, संतापलेल्या टोळक्याने त्यांच्या चारचाकी वाहनाची तोडफोड केली या घटनेनं खळबळ उडाली आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुकुंद सपकाळे हे आपल्या चारचाकी वाहनाने रिंगरोड वरून बहिणाबाई गार्डनकडे जात असताना यादरम्यान, काही तरुणांच्या टोळक्याने त्यांना अडवले. हल्लेखोरांनी लाठ्या-काठ्या आणि शस्त्रांच्या सहाय्याने त्यांच्या गाडीवर हल्ला चढवला. हल्लेखोरांनी सपकाळे यांच्या चारचाकी वाहनाच्या काचा फोडून वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. गाडीची तोडफोड केल्यानंतर हल्लेखोरांनी…

Read More

जळगावकरांनो काळजी घ्या ! जळगाव । एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा संपताच जळगाव जिल्ह्याने आपले ‘हॉट’ शहर असल्याचे रूप दाखवण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसांत जळगावच्या तापमानात तब्बल ५ अंशांहून अधिक वाढ झाली असून, जिल्ह्याचा पारा आता ४१ अंशांवर पोहोचला आहे. वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे दुपारच्या वेळी जळगावच्या रस्त्यांवर अक्षरशः शुकशुकाट पाहायला मिळत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला उन्हाची तीव्रता तुलनेने कमी होती. गुरुवारी जळगावचे तापमान ३६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. मात्र, अवघ्या ४८ तासांत तापमानात मोठी वाढ होऊन शनिवारी हा आकडा ४१ अंशांवर जाऊन ठेपला आहे. कोरड्या हवेमुळे उन्हाच्या झळा अधिक तीव्रतेने जाणवत आहेत. सकाळी १० वाजेपासूनच उन्हाचे चटके जाणवू लागल्याने…

Read More

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन ; 92 व्या वर्षी संगीतविश्व पोरकं मुंबई । भारतीय संगीतविश्वाला आज मोठा धक्का बसला असून ज्येष्ठ आणि बहुमुखी पार्श्वगायिका यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले आहे. सहा दशकांहून अधिक काळ आपल्या सुरेल आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आशाताईंच्या जाण्याने संपूर्ण देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. भारतरत्न Lata Mangeshkar यांच्या लहान बहिणी असलेल्या आशा भोसले यांनी हिंदीसह मराठी, बंगाली, गुजराती, तमिळ, तेलुगू अशा विविध भाषांमध्ये हजारो गाणी गाऊन एक वेगळाच ठसा उमटवला. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी R. D. Burman, O. P. Nayyar, S. D. Burman आणि लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांसारख्या दिग्गज संगीतकारांसोबत काम करत अनेक अजरामर…

Read More