जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरात महापालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेला वेग आला असून गेल्या पंधरा दिवसांपासून ही कारवाई सातत्याने सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत गुरुवार, २३ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेपासून अतिक्रमण विभागाने राष्ट्रीय महामार्गावरील शासकीय तंत्रनिकेतन ते मानराज पार्क या दरम्यान विशेष कारवाई राबवली. या कारवाईदरम्यान महामार्गाच्या कडेला उभारण्यात आलेल्या आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या दुकाने व टपऱ्यांवर बुलडोझर चालवण्यात आला. अनेक अतिक्रमणे हटवून साहित्य जप्त करण्यात आले. तसेच समांतर रस्त्यावर बेकायदेशीररीत्या उभ्या असलेल्या पाच वाहनांवरही कारवाई करत ती जप्त करण्यात आली. महापालिकेच्या या कारवाईमुळे संबंधित व्यावसायिकांमध्ये काही प्रमाणात नाराजी दिसून आली, तर नागरिकांनी मात्र वाहतूक सुरळीत होण्यासाठी या उपक्रमाचे स्वागत…
Author: Nilesh Ajmera
एरंडोल- महा लाईव्ह न्यूज प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील कासोदा गावात एका ४४ वर्षीय सफाई कामगार महिलेला जातीवाचक शिवीगाळ करत आणि हात पकडून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. यामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, पीडित महिला कासोदा येथील एका शासकीय कार्यालयात सफाई कामगार म्हणून कार्यरत आहे. २२ मार्च रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ती आपल्या घराचे गेट बंद करत असताना संशयित आरोपी हकीम खान उर्फ काल्या जमशेर खान याने अचानक गेटला लाथ मारून दहशत निर्माण केली. पीडित महिलेने याबाबत जाब विचारल्यावर आरोपीने…
जामनेर प्रतिनिधी । जामनेर शहरात विश्वासघाताची एक संतापजनक घटना समोर आली आहे. एथर शोरूममध्ये कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्यानेच शोरूममधील लॉकर फोडून १ लाख ६८ हजार रुपयांची रोकड चोरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने स्थानिक व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एथर शोरूमचे मॅनेजर दीपक नितीन मोरे यांनी यासंदर्भात पोलीस तक्रार दाखल केली आहे. २० एप्रिल रोजी शोरूमचे कामकाज आटोपून सर्व कर्मचारी घरी गेले होते. याच संधीचा फायदा घेत शोरूममधील हाऊस कीपिंग कर्मचारी महेश राजेंद्र देवरे याने रात्री शोरूममध्ये शिरून चोरी केली. त्याने लॉकरमधील ५०० रुपयांच्या ३३६ नोटा, म्हणजेच १ लाख ६८ हजार रुपये चोरले. दुसऱ्या दिवशी सकाळी…
भुसावळ प्रतिनिधी | शहरातील पापा नगर भागातील बोहरी कब्रस्तान परिसरात आज सकाळी अचानक वीज वितरण कंपनीच्या डीपीला भीषण आग लागल्याची घटना घडली. सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. सुदैवाने, नगरपालिकेच्या अग्निशामक दलाने वेळेवर पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास बोहरी कब्रस्तानजवळील डीपीमधून अचानक ठिणग्या पडू लागल्या आणि काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले. परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी मिळेल त्या साधनाने आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीची तीव्रता वाढतच होती. धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अग्निशामक…
चाळीसगाव प्रतिनिधी | चाळीसगाव बस स्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी एका महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र चोरल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, प्रतिभा सुधाकर पाटील (वय ३९, रा. काकळणे, ता. चाळीसगाव) या मंगळवारी २१ एप्रिल दुपारी १ वाजेच्या सुमारास चाळीसगाव बसस्थानकावर आल्या होत्या. त्या पारोळ्याकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना, तिथे असलेल्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मणी असलेले मंगळसूत्र (वजन ६ ग्रॅम) लंपास केले. चोरीचा प्रकार लक्षात येताच महिलेने आरडाओरडा केला, मात्र तोपर्यंत…
तीन वर्षांत आर्थिक आघाडीवर नेत्रदीपक कामगिरी केली असून, समितीच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. जळगाव प्रतिनिधी | जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने गेल्या तीन वर्षांत आर्थिक आघाडीवर नेत्रदीपक कामगिरी केली असून, समितीच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, बाजार समितीने खर्च वजा जाता लाखांच्या घरात नफा कमावला आहे. अशी माहिती सभापती सुनील महाजन यांनी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. आर्थिक स्थितीचा आढावा:समितीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सन २०२३-२४ मध्ये समितीचे उत्पन्न ७ कोटी १८ लाख रुपये होते, जे २०२५-२६ मध्ये वाढून ९ कोटी ९५ लाख रुपयांवर पोहोचले आहे. विशेष म्हणजे, सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात सर्व खर्च…
महिला मोर्चावरून खा. संजय राऊत यांचा हल्लाबोल मुंबई । महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात राजकीय वातावरण तापले असताना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. “लोकांनी त्यांची ठासली आहे, आमची काय ठासतायत ते बघा,” असा घणाघात करत त्यांनी महायुतीच्या महिला मोर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राऊत म्हणाले की, काल काढण्यात आलेल्या महिला मोर्चात महिलांपेक्षा पुरुषांची संख्या जास्त होती. “नारी शक्ती त्यांच्या बाजूने नाही. ज्या दिवशी महिलांना दिले जाणारे 1500 रुपये बंद होतील, तेव्हा खरी ताकद कोणाकडे आहे ते कळेल,” असा टोला त्यांनी लगावला. राज्यातील प्रत्येक नागरिकाला मराठी भाषा येणे आवश्यक असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.…
पर्यावरण पूरक ‘महाराष्ट्र राज्य कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरण २०२६’ ला मंजुरी देण्यात आली मुंबई । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणारे अनेक धाडसी निर्णय घेण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने पर्यावरण पूरक ‘महाराष्ट्र राज्य कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरण २०२६’ ला मंजुरी देण्यात आली असून, यासाठी ५०० कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. हे प्रकल्प सार्वजनिक-खाजगी भागीदारी आणि हायब्रीड अन्युईटी तत्त्वावर राबवले जाणार असून, प्रत्येक जिल्ह्यात यासाठी समन्वय समिती कार्यरत असेल. या निर्णयामुळे कचरा व्यवस्थापनासोबतच हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यास मोठी मदत होणार आहे. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिक्षकांसाठीही आजचा दिवस आनंदाचा ठरला. राज्यातील…
जळगाव महानगरपालिकेने राज्य सरकारकडे २०० कोटी रुपयांच्या विशेष अनुदानाची मागणी केली आहे. जळगाव शहरातील वाढत्या वाहतूक ताण आणि रस्त्यांच्या दुरवस्थेच्या पार्श्वभूमीवर जळगाव महानगरपालिकेने राज्य सरकारकडे २०० कोटी रुपयांच्या विशेष अनुदानाची मागणी केली आहे. यासंदर्भात महापौर सौ. दीपमाला काळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. पत्रात नमूद केल्याप्रमाणे, जळगाव शहराचा दिवसेंदिवस विस्तार होत असून जिल्ह्याच्या केंद्रस्थानी असल्यामुळे शासकीय कार्यालये, बाजारपेठ, शैक्षणिक व वैद्यकीय सुविधांसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. परिणामी, शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विशेषतः नव्याने विकसित होणाऱ्या निवासी भागांमध्ये गेल्या १० ते १५ वर्षांपासून अनेक रस्ते अद्याप…
जामनेर तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश…. मुंबई येथे शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जामनेर तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांचा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या कार्यक्रमात डॉ. मनोहर पाटील आणि विश्वजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने नागरिकांनी शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, रावेर लोकसभेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत काते, जिल्हा प्रमुख समाधान महाजन तसेच शिवसेना तालुका प्रमुख अॅड. भरत पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व नेत्यांनी नव्याने पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करत त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जामनेर तालुक्यातील विविध गावांमधून आलेल्या कार्यकर्त्यांनी या सोहळ्यात मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. या…

