कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी झाली प्रशासकीय बैठक जिल्हाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिर येथे गुरुवार, दि. 19 मार्चला केंद्रीय कृषीमंत्री ना. शिवराजसिंहजी चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत अक्षय कृषी परिवार व मंगळ ग्रह सेवा संस्था अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने भूमी सुपोषण चळवळीचा राष्ट्रीय शुभारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार, दि. 13 मार्च रोजी जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री मंगळग्रह मंदिर येथे सुमारे दोन तासांची प्रशासकीय मेगा बैठक झाली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, प्रांताधिकारी मयूर भंगाळे, पोलीस उपअधीक्षक विनायक कोते, जिल्हा कृषी अधीक्षक के. एन. तडवी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष राऊत, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा,…
Author: Nilesh Ajmera
कामात कोठलेही गैरप्रकार होत असल्यास ते त्वरित थांबवण्याच्या सुचना दिल्या. जळगाव- उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी शुक्रवारी मनपाच्या आरोग्य विभागाच्या सर्व मुख्य आरोग्य निरिक्षक, युनिट प्रमुख, स्वच्छता निरिक्षक इत्यादी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना कामात सुधारणा करण्याचे तसेच कामात कोठलेही गैरप्रकार होत असल्यास ते त्वरित थांबवण्याच्या सुचना दिल्या. 17 वा माळा येथील उपमहापौर दालनात ही सभा आयोजित करण्यात आलेली होती. जळगाव शहर आपल्याला स्वच्छ व सुंदर करायचे आहे. शहराच्या सर्व भागात घंटागाडी नियमित फिरली पाहीजे, रस्ते गटारी यांच्या नियमित स्वच्छतेसह, शहरातील कचरा वेळच्या वेळी उचलला गेला पाहिजे अशी अपेक्षा उपमहापौरांनी यावेळी व्यक्त केली कर्मचाऱ्यांकडून नेमलेली कामे करुन घ्यावी, काम न करणाऱ्या…
संपूर्ण परिसरात अत्यंत भक्तिमय व आध्यात्मिक वातावरण अनुभवायला मिळाले. पाडळसे येथे या प्रसंगी प्रसिद्ध कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. त्यांच्या ओजस्वी आणि भावपूर्ण वाणीमधून सांगितलेली शिवमहापुराण कथा ऐकताना भगवान शिवाविषयीची श्रद्धा अधिक दृढ झाली. त्यांच्या कथनशैलीतून जीवनातील अनेक मूल्ये, धर्म, भक्ती आणि सकारात्मक विचार यांचा सुंदर संदेश मिळाला. कथा श्रवण करताना मनाला अत्यंत समाधान आणि आध्यात्मिक शांतता लाभली. हजारो भाविकांसोबत बसून भक्तिभावाने कथा ऐकण्याचा हा अनुभव खरोखरच अविस्मरणीय ठरला. भगवान शिवाच्या कृपेने मिळालेला हा पवित्र क्षण आयुष्यात सदैव स्मरणात राहील असा आहे. या वेळीस उपस्थित आयोजक रतनभाऊ धोंडू भोई, भोरगाव लेवा पंचायत कुटुंबनायक ललित दादा…
ॲड. जयप्रकाश बाविस्कर यांच्या उपस्थितीत पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांचा उत्साह.. जळगाव: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार, जळगाव शहरात मनसेच्या वतीने ‘सदस्य नोंदणी अभियाना’चा अत्यंत धुमधडाक्यात प्रारंभ करण्यात आला. पक्षाचे ज्येष्ठ नेते ॲड. जयप्रकाश बाविस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. काव्य रत्नावली चौकात गर्दी शहरातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या काव्य रत्नावली चौकात सायंकाळी ५ वाजता या अभियानाला सुरुवात झाली. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. ॲड. बाविस्कर यांनी स्वतः उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आणि नोंदणी प्रक्रियेची पाहणी केली. या नोंदणी मोहिमेत मनसेचे सर्व आजी-माजी पदाधिकारी, अंगीकृत…
प्रवासी वाहतुकीत समान नियम लागू करण्याचा निर्णय मुंबई : राज्यात रिक्षा व टॅक्सींसाठी नवीन परमिट देण्याची प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली असून प्रवासी वाहतूक करणाऱ्या ई-रिक्षा आणि ई-बाईकसाठी मोटार वाहन विभागाकडे नोंदणी करून परवाना घेणे बंधनकारक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबतची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, आतापर्यंत इलेक्ट्रिक रिक्षांना प्रवासी वाहतुकीसाठी स्वतंत्र परमिट घेण्याची सक्ती नव्हती. मात्र, वाढत्या ई-वाहनांची संख्या लक्षात घेता केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार प्रवासी वाहतुकीसाठी एकसमान नियम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पारंपरिक रिक्षा, टॅक्सी तसेच इलेक्ट्रिक रिक्षा या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी समान नियम लागू राहणार आहेत.दरम्यान, परमिट प्रक्रियेत…
रावेर तालुक्यातील गारखेडा उपकेंद्र परिसरात घडली होती घटना जळगाव प्रतिनिधी :- रावेर तालुक्यातील गारखेडा उपकेंद्र परिसरात १० मार्च रोजी नवजात बाळाच्या मृत्यूप्रकरणी गंभीर दखल घेत जिल्हा परिषद जळगावच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी गारखेडा आरोग्य उपकेंद्रातील कंत्राटी आरोग्य सेविका नंदा कडू पाटील यांना सेवेतून कमी करण्याची कारवाई केली आहे. रावेर तालुक्यातील गारखेडा आरोग्य उपकेंद्रात १० मार्च रोजी मध्यरात्री सुमारे १ वाजेच्या सुमारास एका महिलेची प्रसूतीची घटना घडली. रुकसाना अजित तडवी या तिसऱ्या खेपाच्या गरोदर महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर संबंधित आशा सेविकेने तत्काळ गारखेडा येथील उपकेंद्रात दाखल केले. उपकेंद्रात कार्यरत असलेल्या कंत्राटी आरोग्य सेविकेला याबाबत दूरध्वनीद्वारे तात्काळ कळविण्यात आले…
बांधकाम कामगार महिलांना वाटप करण्यात येणाऱ्या गृह उपयोगी वस्तूंच्या (भांडी सेट) वितरण केंद्रावर संभ्रम जळगाव प्रतिनिधी । शासनाच्या वतीने बांधकाम कामगार महिलांना वाटप करण्यात येणाऱ्या गृह उपयोगी वस्तूंच्या (भांडी सेट) वितरण केंद्रावर आज संभ्रम आणि संतापाचे वातावरण पाहायला मिळाले. एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या मागील गोडाऊनवर सुरू असलेल्या या वाटपात कर्मचाऱ्यांनी ‘केवायसी अपडेट’ करण्याच्या बहाण्याखाली लाभार्थी महिलांकडून १०० ते ३०० रुपयांची बेकायदेशीर मागणी केल्याचा गंभीर आरोप महिलांनी केला आहे. सकाळपासूनच महिलांची मोठी गर्दी झालेली होती. शहरातील तसेच परिसरातील शेकडो महिलांनी पहाटे ६ वाजेपासूनच रांगेत उभे राहून आपला नंबर येण्याची प्रतीक्षा केली. या गर्दीत वयोवृद्ध महिलांचा तसेच अंगावर लहान बाळे असलेल्या मातांचा समावेश…
जिल्हापेठ पोलिसांनी कारवाई करत त्यांच्या ताब्यातून ८ गावठी पिस्टल, १० जिवंत काडतुसे आणि एक दुचाकी असा सुमारे ३.१० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त जळगाव । मध्य प्रदेशातून जळगाव शहरात अवैध शस्त्रांची विक्री करणाऱ्या टोळीवर जिल्हापेठ पोलिसांनी कारवाई करत त्यांच्या ताब्यातून ८ गावठी पिस्टल, १० जिवंत काडतुसे आणि एक दुचाकी असा सुमारे ३.१० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या संदर्भात शनिवारी पत्रकार परिषद झाली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे उपस्थित होते. जळगावातील यश रामदास नन्नवरे (२७) हा गावठी पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे प्रभारी अनिल वाघ यांना…
जळगाव जिल्ह्यात हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेत मोठे फसवणूक प्रकरण उघडकीस आले आहे. जळगाव । जळगाव जिल्ह्यात हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेत मोठे फसवणूक प्रकरण उघडकीस आले आहे. प्रत्यक्षात केळीची लागवड नसतानाही शेकडो शेतकऱ्यांनी हजारो हेक्टर क्षेत्रावर केळी दाखवून पीक विमा मिळवण्याचा डाव रचला होता, मात्र प्रशासनाच्या सॅटेलाइट तपासणीत हा डाव उधळला. या प्रकरणी प्रशासनाने संशयित सर्व शेतकऱ्यांना नोटिसा पाठविण्याची प्रक्रिया सुरू केल्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर (एमआरसॅक) मार्फत सॅटेलाइट तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करण्यात आलेल्या पडताळणीत हा प्रकार उघड झाला. जिल्ह्यात १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरदरम्यान ‘एमआरसॅक’ द्वारे करण्यात आलेल्या तांत्रिक पडताळणीत तब्बल ४५ हजार…
जळगावसह महाराष्ट्रात सध्या नागरिकांना प्रखर उन्हाचा सामना करावा लागत आहे. जळगाव । जळगावसह महाराष्ट्रात सध्या नागरिकांना प्रखर उन्हाचा सामना करावा लागत आहे. मार्चच्या दुसऱ्याच आठवड्यात उन्हाचा तडाखा तीव्र झाला असून अनेक शहरांमध्ये तापमानाने ४० अंशांची मर्यादा ओलांडली आहे. यामुळे वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असून, अंगाची लाहीलाही होत आहे. अशातच हवामानात बदल होणार असून महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा मोठा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला. विशेष जळगाव जिल्ह्यातही उष्णतेच्या लाटेसह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. काय आहे हवामान खात्याचा अंदाज हवामान खात्याच्या अंदाजानुसार, नाशिक, जळगाव, संभाजीनगर आणि विदर्भातील जिल्ह्यांत १४ मार्चपर्यंत उष्णतेची लाट कायम राहील. मात्र यानंतर…

