राजकीय मतभेद आणि नावांवर एकमत न होणे ही यामागची प्रमुख कारणे असल्याचे समोर आले आहे. महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यांच्या सात जागांसाठी राबवण्यात येणारी प्रशासकीय प्रक्रिया आठवडाभर पुढे ढकलण्यात आली असून, वाढते राजकीय मतभेद आणि नावांवर एकमत न होणे ही यामागची प्रमुख कारणे असल्याचे समोर आले आहे. आता या जागांसाठी २५ तारखेपर्यंत नामनिर्देशन प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नगरसेवकांच्या नामनिर्देशन अर्जाप्रमाणेच स्वीकृत सदस्यांची निवड प्रक्रिया पार पडणार आहे. सुरुवातीला महायुती म्हणून एकत्र दावा करणाऱ्या पक्षांना मागे हटावे लागले असून, नियमानुसार जागांचे वाटप ठरवण्यात आले आहे. त्यानुसार तीन प्रमुख पक्षांना अनुक्रमे चार, दोन आणि एक जागा मिळणार आहे. ठाकरे गटाला त्यांच्या संख्याबळानुसार…
Author: Nilesh Ajmera
जळगाव । देशात सर्वसामान्य महागाई कमी होण्याची अपेक्षा करीत असताना आता आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या संघर्षाचा थेट परिणाम आता सर्वसामान्यांच्या खिशावर होऊ लागला आहे.अमेरिका आणि इराण यांच्यात सुरु असलेल्या युद्धामुळे आयात – निर्यात विस्कळीत झाली असून यामुळे खाद्यतेलाच्या दरात अचानक मोठी वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांत खाद्यतेलाच्या किंमतीत प्रति किलो तब्बल १३ ते १८ रुपयांची वाढ झाली आहे. विशेषतः सूर्यफूल आणि सोयाबीन तेलाचे दर कडाडले असून, ऐन सणासुदीच्या तोंडावर ही वाढ अधिकच जाणवू लागली आहे. फेब्रुवारी अखेरीस १६० रुपये असलेले सूर्यफूल तेल आता १७३ रुपयांवर पोहोचले आहे. घाऊक बाजारातही १० ते १२ टक्क्यांची वाढ झाली असून, पुरवठा कमी आणि मागणी…
तालुक्यातील पाळधी येथून एक मोठी दुर्घटना घडली. जळगाव । धरणगाव तालुक्यातील पाळधी येथून एक मोठी दुर्घटना घडली. येथील साईबाबा मंदिराच्या भक्तनिवासाचा स्लॅब कोसळल्याने तब्बल ७ कामगार जखमी झाले. जखमींपैकी २ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली असून या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पर्यटन विभागाकडून पाळधीतील साईबाबा मंदिराच्या भक्तनिवासासाठी कोट्यवधी रुपयांचा प्रकल्प राबवण्यात येत असून गेल्या काही महिन्यांपासून येथे बांधकाम सुरू आहे. दरम्यान, कामगार नियमितप्रमाणे काम करत असताना अचानक बांधकामाचा निर्माणाधीन स्लॅब (साचा) कोसळला आणि क्षणातच परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या दुर्घटनेत ७ कामगार जखमी झाले असून त्यांना तात्काळ उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. त्यापैकी २ कामगारांची…
भारतासह अनेक देशांमध्ये इंधनाची कमतरता निर्माण झाली आहे. मध्य-पूर्वेतील युद्धामुळे संपूर्ण जगाला फटका बसला आहे, कारण तेल आणि नैसर्गिक वायु पुरवठा साखळी विस्कळित झाली आहे. त्यामुळे भारतासह अनेक देशांमध्ये इंधनाची कमतरता निर्माण झाली आहे. अशातच आता युद्धाच्या पार्श्वभूमीवर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने घरगुती गॅस सिलेंडर बुकिंगसाठीचा कालावधी आणखी वाढवला आहे. याचा फटका थेट सर्व सामान्य जनतेला बसणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गॅस सिलिंडर बुकिंगचा कालावधी 21 दिवसांवरून वाढवून 25 दिवस करण्यात आला आहे. ब्लॅक मार्केटिंग आणि साठेबाजी (हॉर्डिंग) रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय घेताना सरकारने हेही स्पष्ट केले आहे की सध्या घरगुती गॅस, डिझेल…
या प्रकरणी पाच जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न व शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाळीसगाव – शहरातील हनुमानवाडी परिसरात दि. १५) रात्री झालेल्या फायरींगमध्ये एका रिक्षाचालकाला गोळी लागून तो गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न व शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, जखमीचे नाव सिकंदर शेख निसार शेख (वय ३६, रा. अनिल नगर, रेल्वे स्टेशनजवळ, चाळीसगाव) असे असून ते रिक्षा चालक आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंकित महेंद्र मोरे , मेहुल रत्नपाल गोरे , कृष्णा जिभाऊ शेळते (सर्व रा. चाळीसगाव) तसेच अन्य दोन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.पोलीसांनी दिलेल्या…
जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने आयोजित ७३ वी जिल्हा पुरुष व महिला अजिंक्यपद व निवड भुसावळ प्रतिनिधी : जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने आयोजित ७३ वी जिल्हा पुरुष व महिला अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा २०२५–२६ स्व. बबन भाऊ बाहेती महाविद्यालय, जळगाव येथे दिनांक १४ ते १५ मार्च २०२६ या कालावधीत उत्साहात पार पडली. या स्पर्धेत मुलांच्या २६ संघांनी तर मुलींच्या ६ संघांनी सहभाग नोंदवला. जळगाव, भुसावळ, भडगाव, पाचोरा, एरंडोल, रावेर, मुक्ताईनगर आणि जामनेर या तालुक्यांतील संघांनी स्पर्धेत भाग घेतला होता. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यांमध्ये पुरुष गटात महाबली क्रीडा प्रसारक मंडळ, भुसावळ यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावला.अंतिम सामन्यात…
रेल्वे महसुलाचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने भुसावळ विभागातील तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट दक्षता आणि कार्यतत्परता दाखवली भुसावळ प्रतिनिधी : रेल्वे महसुलाचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने भुसावळ विभागातील तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट दक्षता आणि कार्यतत्परता दाखवली आहे. भुसावळ विभागातील सुविधा विभागात कार्यरत असलेले तिकीट तपासणी कर्मचारी श्री. सी. पी. बाढे यांनी दिनांक १५ मार्च २०२६ रोजी तिकीट तपासणी मोहिमेदरम्यान उल्लेखनीय कामगिरी बजावली.सतर्क व पद्धतशीर तिकीट तपासणीद्वारे श्री. बढे यांनी तिकीटविरहित/अनियमित प्रवासाच्या एकूण ७८ प्रकरणांची नोंद करत ₹२,५७,६५० इतका दंड वसूल करण्यात आला आहे. नियमित व कडक तिकीट तपासणी मोहिमेमुळे तिकीटविरहित प्रवासाला आळा बसण्यास मदत होते तसेच वैध तिकीट असलेल्या प्रवाशांना योग्य आसनव्यवस्था आणि अधिक…
छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर वरणगाव नगरपरिषद येथे दि१६ मार्च रोजी आयोजित होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून दिली होती. वरणगाव प्रतिनिधी : मंडळ स्तरावरील छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर वरणगाव नगरपरिषद येथे दि१६ मार्च रोजी आयोजित होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून दिली होती. शिबिर रद्द झाल्याने नागरिकात संतापाची लाट उसळली आहे . या अनुषंगाने तहसीलदारांच्या प्रतिनिधी नायब तहसीलदार प्रीती लुटे यांच्या उपस्थितीत शिबिराच्या पूर्वतयारीची बैठकही पार पडली होती. मात्र, शिबीर प्रत्यक्ष दिवशी पुढे ढकलल्याची माहिती समोर येताच नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. सकाळपासूनच वरणगाव नगरपरिषद येथे सुमारे ३०० च्यावर नागरिकांची गर्दी झाली होती. रेशन कार्डसंदर्भातील नोंदणी, १४ अंकी क्रमांक मिळविणे, नाव वाढवणे किंवा…
राज्यातील लाडक्या बहिणींना दिलासा; दोन महिन्यांचे ३ हजार रुपये एकाचवेळी मिळणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. फेब्रुवारी व मार्च महिन्याचा रखडलेला हप्ता राज्य सरकारकडून एकाचवेळी देण्याचे संकेत मिळाले असून हा निधी एप्रिल महिन्यात १५ तारखेपूर्वी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र याचवेळी ई-केवायसी न केलेल्या महिलांना या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते. महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. राज्यातील लाखो महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच सादर…
गॅस दरवाढीने चालक हैराण ; रिक्षा भाडेवाढीने प्रवाशांना फटका जळगाव । इस्रायल-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या गॅसचा तुटवडा आणि गॅसच्या दरवाढीने सर्वसामान्य होरपळून निघत आहे. एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे रिक्षा चालकांना देखील फटका बसला आहे. गॅसचा पुरवठा सुरळीत असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात गॅस एजन्सी आणि पंपांवर नागरिकांच्या लांबलचक रांगा लागलेल्या आहेत. अनेक ठिकाणी नागरिकांना पहाटेपासून सिलेंडरसाठी थांबावे लागत असून ऑनलाईन बुकिंगही सुरळीत होत नसल्याने सर्वसामान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. जळगाव शहरातही याचा मोठा परिणाम दिसून येत आहे. इच्छा देवी चौक परिसरातील एलपीजी गॅस पंपावर रिक्षांमध्ये गॅस भरण्यासाठी चालकांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. शहरात एकूण तीन एलपीजी गॅस…

