Author: Editorial Desk

भुसावळात सोलर ग्राहकांना विज मंडळाचा धक्का : घेतलेल्या युनिटचे पैसे मिळाले नाही परंतु रक्कमेचा भुर्दंड ! भुसावळ प्रतिनिधी – शहरात महावितरणच्या सॉफ्टवेअर त्रुटीमुळे चुकीची हजारो रुपयांचे वीजबिले मिळत आहेत, ज्यामुळे त्यांचे कनेक्शन कापले जात आहेत. हे प्रधानमंत्री सूर्यघर योजनेंतर्गत सोलर पॅनेल बसवणाऱ्या हजारो नागरिकांना प्रभावित करत आहे. सोलर ग्राहक या कारणाने संकटात सापडला आहे.समस्या काय?नेट-मीटरिंग प्रक्रियेत जनरेशन (सोलरमधून तयार होणारी वीज) शून्य दाखवली जाते, फक्त वापरलेली वीज मोजली जाते. युनिट मोजले गेले तरी पैसे मिळत नाही .गेल्या अनेक महिन्यांपासून हा घोळ सुरू आहे, ज्यामुळे झीरो बिल ऐवजी हजारो रुपये बिले येतात आणि ग्राहकांना थकबाकीदार ठरवले जाते . सोलर ग्राहकांनी विज…

Read More

महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी साडेआठ कोटींचे शिलकीचे अंदाजपत्रक सादर केले जळगाव – स्थायी समितीच्या सभेत महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी मंगळवारी साडेआठ कोटींचे शिलकीचे अंदाजपत्रक सादर केले आहे. यावेळी 1452 कोटी रूपयांचे मुळ अंदाजपत्रक सादर करण्यात आले असून त्यावर समिती अभ्यास करणार आहे. त्यानंतर हेअंदाजपत्रक महासभेसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.मनपा निवडणुकीनंतर महापालिकेची पहिलीच स्थायी समितीची सभा सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी व्यासपीठावर आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त धनश्री शिंदे, उपायुक्त प्रशासन निर्मला पेखळे गायकवाड, नगरसचिव सतीश शुक्ला हे उपस्थित होते. सभेच्या सुरूवातीला आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या हस्ते नवनिर्वाचित सभापती यांचे स्वागत करण्यात…

Read More

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी खडसे यांच्याविरोधात एसआयटी नेमण्याचे आदेश दिले आहेत. जळगाव । माजी मंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी खडसे यांच्याविरोधात एसआयटी नेमण्याचे आदेश दिले आहेत. या चौकशीसाठी सहा विभागांतील अधिकारी सहभागी होणार असून संबंधित प्रकरण नऊ गावांतील जमिनींशी जोडलेले असल्याचे सांगितले जात आहे. नेमकं प्रकरण काय? या प्रकरणाबाबत भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, मुक्ताईनगर येथे राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरण सुरु आहे. 25 जानेवारी 2022 मध्ये या संदर्भात राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले होते. यासाठी 56.80 हेक्टर जमिन भूसंपादन करण्याचा निर्णय सरकारने…

Read More

जागतिक स्तरावर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इंधन पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता जळगाव । जागतिक स्तरावर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इंधन पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता जळगाव जिल्हा प्रशासनाने घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध वापर, साठेबाजी आणि काळाबाजाराच्या तक्रारी वाढू नयेत यासाठी जिल्ह्यात विशेष भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या आदेशानुसार या पथकाची स्थापना करण्यात आली. या भरारी पथकात तहसीलदार, पोलीस निरीक्षक,उपनिरीक्षक, बीपीसीएल, एचपीसीएल व आयओसीएलचे सेल्स अधिकारी तसेच निरीक्षण अधिकारी व पुरवठा निरीक्षक यांचा समावेश आहे. भरारी पथक जिल्ह्यात विविध ठिकाणी अचानक तपासण्या करून घरगुती गॅस सिलेंडरचा गैरवापर, साठेबाजी किंवा…

Read More

अशातच भारतासह सगळ्या जगासाठी चिंता वाढवणारी बातमी आहे. जळगाव । इराण-अमेरिका संघर्ष आणि मध्य पूर्वेतील तणावामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतून कच्च्या तेलाची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे भारतात अनेक देशात गॅसची टंचाई निर्माण झाली आहे. अशातच भारतासह सगळ्या जगासाठी चिंता वाढवणारी बातमी आहे. मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय तेलबाजारात पुन्हा मोठी अस्थिरता दिसून येत असून गुरुवारी कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये ९ टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल १०० डॉलरच्या पुढे गेली आहे. ब्रेंट क्रूड सध्या सुमारे १००.५० डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार करत असल्याची माहिती समोर आली आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुझ परिसरात बुधवारी तेलवाहू टँकरवर झालेल्या हल्ल्यानंतर जागतिक बाजारात चिंता वाढली आहे. या…

Read More

जळगाव जिल्ह्यासाठी १५ कोटी ७७ लाखांची मदत जळगाव । नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई साठी राज्य शासनाने तत्काळ शासन निर्णय काढून जळगाव जिल्ह्यासाठी सुमारे १५ कोटी ७७ लाख रुपयांची मदत मंजूर केली आहे. राज्यात २०२२-२३ व २०२३-२४ या कालावधीत शेतकऱ्यांना सुमारे ५ हजार कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. तसेच खरीप हंगामात राज्यातील १ कोटी २ लाख शेतकऱ्यांच्या ७९ लाख ८३ हजार ५८१ हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीसाठी सुमारे १५ हजार ८१७ कोटी रुपयांची मदत देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे, असे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले. जळगाव जिल्ह्यातील रावेर व यावल तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीबाबत सदस्य…

Read More

लहान भावाला जीवे मारण्याची धमकी! जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – वेळोवेळी तरुणीचा पाठलाग करुन तिला माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव व माझ्याशीच लग्न कर असे म्हणत तिचा विनयभंग केला. तसेच तरुणीला मी तुझे लग्न दुसरीकडे होवू देणार नाही जर तू केले तर तुला व तुझ्या लहान भावाला मारुन टाकेल अशी धमकी देखील दिली. ही घटना फेब्रुवारी २०२५ ते दि. ८ मार्च दरम्यान घडली. याप्रकरणी संशयित सलमान सगीर काकर (रा. पंचशीलनगर) याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील एका भागात १९ वर्षीय तरुणी वास्तव्यास असून त्या तरुणीचा फेब्रुवारी २०२५ पासून संशयित सलमान काकर हा पाठलाग करीत होता. दरम्यान, दि. ८…

Read More

चार वर्षीय भाचीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना एरंडोल – शेजारी राहणाऱ्या मामाने चार वर्षीय भाचीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. अत्याचार करणाऱ्या नराधमासह एरंडोल पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरुद्ध पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील एका भागात चार वर्षीय चिमुकली वास्तव्यास असून त्यांच्या घराशेजारीच तीचा मामा देखील वास्तव्यास आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास चिमुकली घरी एकटी असल्याचे पाहून संशयिताने तीला स्वतःच्या घरी नेले. त्याठिकाणी चिमुकलीसोत घृणास्पद कृत्य करीत तिच्यावर अत्याचार केला काही वेळानंतर चिमुकल्या मुलीची आई घरी आल्यानंतर तिला मुलगी दिसून न आल्याने तीने आजूबाजूला असलेल्या घरांमध्ये तिचा शोध यावेळी तिला भावाच्या घरात चिमुकली मिळून आली.…

Read More

३१ मार्चपर्यंत कर्जफेडीची अट; १.६४ लाख शेतकरी ५० हजारांच्या प्रोत्साहनपर अनुदानासाठी पात्र जळगाव प्रतिनिधी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत पीककर्ज घेतलेल्या नियमित कर्जदार शेतकऱ्यांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय बँकेने घेतला आहे. यावर्षी वेळेत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांकडून बँक व्याज आकारणार नसल्याची घोषणा जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी दिली. १.६४ लाख शेतकऱ्यांना होणार लाभ बँकेच्या या निर्णयाचा लाभ एप्रिल २०२५ मध्ये पीककर्ज घेतलेल्या जिल्ह्यातील सुमारे १ लाख ६४ हजार ८६५ शेतकऱ्यांना होणार आहे. या शेतकऱ्यांनी एकूण १०७२ कोटी १५ लाख रुपयांचे कर्ज घेतले असून त्यावरील सुमारे ६४ कोटी ३२ लाख रुपयांचे व्याज सध्या बँक घेणार नाही. त्यामुळे वेळेत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना…

Read More

धमकीचा ई-मेल मिळताच पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा तात्काळ सतर्क…! मुंबईतील महाराष्ट्र विधानभवन परिसरात बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. विधानभवन कार्यालयाच्या अधिकृत ई-मेलवर अज्ञात व्यक्तीकडून विधानसभा बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा मेल पाठवण्यात आला होता. धमकीचा ई-मेल मिळताच पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा तात्काळ सतर्क झाल्या. सुरक्षेच्या कारणास्तव विधानभवन परिसरात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले. तपास पूर्ण होईपर्यंत काही काळासाठी कर्मचाऱ्यांना बाहेरच थांबवण्यात आले होते आणि कोणालाही आत प्रवेश दिला जात नव्हता. यानंतर बॉम्ब शोधक पथक आणि पोलिसांनी संपूर्ण परिसराची तपासणी केली. प्राथमिक तपासणीनंतर सुरक्षा तपास पूर्ण करत हळूहळू कर्मचाऱ्यांना पुन्हा आत सोडण्यात आले. सध्या राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू…

Read More