Author: Editorial Desk

अपहार प्रकरणात नवा खुलासा; मुलाच्या खात्यात 10 लाख, सोन्याची खरेदी ? पोलीस दलाच्या दक्षता पेट्रोलपंपावरील आर्थीक गैरव्यवहार झालेल्या काळात उपनिरीक्षक वाल्मिक वाघ यांनी मुलाच्या खात्यावर दहा लाख रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर सोने देखील खरेदी केल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. त्यामुळे अपहाराचा पैसा संशयित वाल्मिक वाघ यांनी सोने किंवा अन्य कोणाच्या नावे मालमत्ता खरेदी केल्याचा पोलिसांना संशय असल्याचे तपासधिकारी पोनि राहुल गायकवाड यांनी न्यायालयासमोर सांगितले. त्यानुसार न्यायालयाने त्यांना दि. १३ रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलीस दलातील वेल्फेअरतर्फे चालविल्या जाणाऱ्या दक्षता पेट्रोल पंपावर व्यवस्थापक म्हणून पोलीस उपनिरीक्षक वाल्मीक वाघ यांची नेमणूक करण्यात आली होती. दि. १२ फेब्रुवारी रोजी ते बेपत्ता…

Read More

सिलेंडरसाठी ३–५ दिवस प्रतीक्षा; हॉटेल व्यवसाय अडचणीत, व्यावसायिक गॅस बंदीची अफवा फेटाळली जळगाव | आखाती देश इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक स्तरावर इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून त्याचे परिणाम आता महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचू लागले आहेत. राज्यात घरगुती एलपीजी, व्यावसायिक गॅस आणि सीएनजीच्या पुरवठ्यात तुटवडा निर्माण झाला असून सिलेंडरसाठी ग्राहकांना अनेक दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर व्यावसायिक गॅस पुरवठा पूर्णपणे बंद झाल्याच्या अफवा पसरल्या आहेत. मात्र, राज्य सरकारने या अफवांचे खंडन करत वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे. राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, व्यावसायिक एलपीजी पुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आल्याचा…

Read More

निवास, भोजनासह पुस्तके ही मिळणार विनामूल्य; सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट व नोबेल फाउंडेशनचा प्रकल्प जळगाव । “जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपले, तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणावा”. संत तुकारामांच्या अभंगाच्या या ओवी खऱ्या अर्थाने जगण्याचे कार्य फैजपूर येथील संत परमपूज्य महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराज करीत आहेत. त्यांच्या प्रयत्नांनी आता खानदेशातील पन्नासहून अधिक होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना निवासी स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण निशुल्क दिले जाणार आहे. जळगाव ,धुळे, आणि नंदुरबार जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी आर्थिक अडचणीमुळे शिक्षणापासून तसेच स्पर्धा परीक्षांच्या तयारीपासून वंचित राहतात. या विद्यार्थ्यांना आपल्या स्वप्नपूर्तीसाठी थांबावे लागू नये तसेच यांच्या जीवनात यशाचा प्रकाश निर्माण व्हावा यासाठी फैजपूर येथील प्रसिद्ध…

Read More

राजस्थान राज्य कृषी विद्यापीठ यांच्याकडून विज्ञानातील मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली जळगाव । प्रख्यात उद्योगपती व कृषी क्षेत्रातील तत्त्वचिंतक नंदकिशोर कागलीवाल यांना भारतीय कृषी क्षेत्रातील त्यांच्या मोलाच्या योगदानाबद्दल राजस्थान राज्य कृषी विद्यापीठ यांच्याकडून विज्ञानातील मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे. मंगळवार दि. १० मार्च रोजी जयपूर येथे हा सोहळा संपन्न झाला. भारतीय बियाणे उद्योगाच्या विकासामध्ये केलेले त्यांचे अग्रगण्य कार्य, तंत्रज्ञान-संलग्न उच्च उत्पादकता व कीड-प्रतिरोधक बियाण्यांचा प्रसार तसेच ग्रामीण विकास, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील त्यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न यांचा गौरव या सन्मानाद्वारे करण्यात आला आहे. त्यांच्या कार्यामुळे देशभरातील असंख्य शेतकरी व समाजघटकांच्या जीवनमानावर सकारात्मक परिणाम झाला आहे.मागील वर्षी, कागलीवाल यांना सेज विद्यापीठ, भोपाळ…

Read More

ब्रह्मलीन परमपूज्य लक्ष्मण चैतन्य जी बापू माझ्याकडून करून घेतात!.. आपल्या जीवनातील दुर्गुणांची होळी करा,आणि सात्विक जीवन जगा!. जामनेर प्रतिनिधी : तालुक्यातील गुरुदेव सेवाश्रमच्या चैतन्य धाम येथे रंगपंचमी निमित्त भव्य लेंगी नृत्य स्पर्धा व धार्मिक कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला संपूर्ण जिल्ह्यासह मराठवाडा व विदर्भातून महिला भगिनी, पुरुषवर्ग आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या प्रसंगी संबोधन करताना चैतन्य धामचे निर्माते श्रद्धेय श्री श्याम चैतन्य जी महाराज यांनी अत्यंत भावनिक शब्दांत सांगितले की, “मी काहीच करत नाही… ब्रह्मलीन परमपूज्य लक्ष्मण चैतन्य जी बापू माझ्याकडून करून घेतात.” त्यांच्या या अमृत वचनांनी उपस्थित भाविक भक्तांचे डोळे…

Read More

फार्मसी शिक्षक सक्षमीकरण, नवतंत्रज्ञान व संशोधनावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन तथा ‘APTI-MS तर्फे डॉ. व्ही. आर. पाटील यांना ‘बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड’ फैजपूर प्रतिनिधी : फार्मसी शिक्षक सक्षमीकरण, नवतंत्रज्ञान व संशोधनावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन तथा ‘APTI-MS तर्फे डॉ. व्ही. आर. पाटील यांना ‘बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड’असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टीचर्स ऑफ इंडिया (APTI) महाराष्ट्र राज्य शाखेच्या वतीने आयोजित “महा-APTICON २०२६” ही राज्यस्तरीय परिषद सातारा येथील यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. राज्यभरातील फार्मसी शिक्षक, संशोधक आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मोठ्या उपस्थितीत पार पडलेल्या या परिषदेत फार्मसी शिक्षणातील बदलते प्रवाह, आधुनिक अध्यापन पद्धती, संशोधन आणि नवतंत्रज्ञान या विषयांवर सखोल चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले. या…

Read More

प्रतिष्ठा महिला मंडळाच्या वतीने प्रेरणादायी महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भुसावळ प्रतिनिधी : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून भुसावळ येथील प्रोफेसर कॉलनीतील बियाणी स्कूल येथे प्रतिष्ठा महिला मंडळाच्या वतीने प्रेरणादायी महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. देशातील थोर महिलांच्या जीवनकार्यावर आधारित नाटिकांचे सादरीकरण करून स्त्री शक्तीचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमात महिलांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई, राजमाता जिजाऊ, अंतराळवीर कल्पना चावला , सवित्रीबाई फुले .यांसारख्या महान महिलांची वेषभूषा करून त्यांच्या कार्याची आठवण करून दिली. स्वातंत्र्यलढा, संस्कार आणि आधुनिक काळातील कर्तृत्व या विविध अंगांनी महिलांचे योगदान अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमात सादर करण्यात आलेल्या नाटिकांमधून प्रभावी संदेश…

Read More

भुसावळ येथुन जवळ असलेल्या अकलूद शिवारात मंगळवार पासून कथावाचक पं. प्रदीप मिश्रा यांच्या श्री शिवमहापुराण कथेला सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी शहरातील तापी नगर परिसरातून तापी नदीपर्यंत आणि तेथून कथास्थळापर्यंत भव्य कलश शोभायात्रा काढण्यात आली.कथेसाठी मोठ्या प्रमाणावर भाविक येण्याची शक्यता लक्षात घेता वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. भुसावळ मार्गे रावेरहून मध्यप्रदेशकडे आणि भुसावळहून यावलमार्गे गुजरातकडे जाणारी तसेच येणारी सर्व अवजड वाहतूक पुढील सात दिवस सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे. कथास्थळी भव्य व्यवस्थाआयोजन समितीने भाविकांसाठी मोठ्या प्रमाणावर सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. कथास्थळी १३२ बाय ६०० फूट आकाराचा एक तसेच १०० बाय ६००…

Read More

‘भरोसा सेल’च्या इमारतीचे भूमिपूजन महिला व बालकल्याणार्थ मोठे पाऊल जळगाव: जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या माध्यमातून महिला व बालकांच्या सुरक्षिततेसाठी आणि तत्पर तक्रार निवारणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या ‘भरोसा सेल व समुपदेशन केंद्राच्या’ नवीन इमारतीचा भूमिपूजन सोहळा दिनांक ०८ मार्च रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरात उत्साहात संपन्न झाला.सदर इमारतीचे भूमिपूजन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री मा. ना. श्री. गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात पोलीस अधीक्षक मा. डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या प्रास्ताविकाने झाली, ज्यामध्ये त्यांनी या केंद्राच्या उभारणीचा उद्देश स्पष्ट केला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार प्रदर्शन जळगाव उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी…

Read More

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी विरोधक आक्रमक : निषेधार्ह घोषणा महाराष्ट्र विधानमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान, विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तीव्र आंदोलन केले. शेतकऱ्यांचा सातबारा पूर्णपणे कोरा करावा, ही विरोधकांची प्रमुख मागणी आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारने दोन लाखांपर्यंतचे कृषी कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. मात्र, विरोधकांनी या घोषणेवर टीका करत, ही कर्जमाफी अपुरी असल्याचे म्हटले आहे. सातबारा कोरा करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, फसवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, शेतकरी उपाशी, मंत्री तुपाशी अशा घोषणा देत विरोधकांनी सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. हातामध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, निकषांचा खेळ सोडा असे बॅनर घेऊन त्यांनी घोषणाबाजी केली. विरोधकांचा आक्षेप आहे की, सरकारने अटी व शर्ती लावून…

Read More