Author: Nilesh Ajmera

जिल्ह्यांमध्ये सूर्य तापला उष्णेतेची लाट, जळगावसाठीही महत्वाचा इशारा जळगाव । मार्च महिन्याची सुरुवात होताच जळगावसह राज्यात उष्णतेची तीव्रता वाढू लागली आहे. सकाळपासूनच उन्हाचा चटका जाणवत असून दुपारच्या सुमारास सूर्य आग ओकत असल्याने उकाड्याचा त्रास मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. दरम्यान हवामान खात्यानं राज्यातील काही भागांत उष्णतेची लाट येण्याचा इशारा दिला असून जळगावसह उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यात तापमान वाढीचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे उकाड्याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यात तापमान झपाट्याने वाढत असून ते ४० अंश सेल्सिअसच्या जवळ पोहोचले आहे. गेल्या २४ तासात जळगावचे कमाल तापमान ३८.५ इतके होते. तर किमान तापमान १७ अंशापर्यंत होते. दरम्यान उन्हाची तीव्रता वाढल्याने दुपारच्या वेळी…

Read More

मध्य प्रदेशातून जळगाव शहरात अवैध शस्त्रांची विक्री करणाऱ्या टोळीवर जिल्हापेठ पोलिसांनी कारवाई जळगाव । मध्य प्रदेशातून जळगाव शहरात अवैध शस्त्रांची विक्री करणाऱ्या टोळीवर जिल्हापेठ पोलिसांनी कारवाई करत त्यांच्या ताब्यातून ८ गावठी पिस्टल, १० जिवंत काडतुसे आणि एक दुचाकी असा सुमारे ३.१० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या संदर्भात शनिवारी पत्रकार परिषद झाली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे उपस्थित होते. जळगावातील यश रामदास नन्नवरे (२७) हा गावठी पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे प्रभारी अनिल वाघ यांना मिळाली. त्यांच्या पथकाने यश नन्नवरे याला ताब्यात घेत एक गावठी…

Read More

बदलापुरातील स्त्री बीज तस्करी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. बदलापुरातील स्त्री बीज तस्करी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात उल्हासनगरतून अटक करण्यात आलेली सोनल गरेवार ही महिला प्रशिक्षण नसताना सोनोग्राफी मशीन हाताळायची. सोनोग्राफी सेंटरमध्ये काम करणारी सोनाली महिलांचे व्हिडीओ ३० सेकंदाचे पाठवायची अशी माहिती पोलिस तपासातून उघड झाली आहे. उल्हासनगरमधील एका सोनोग्राफी सेंटरमधून सोनल गरेवालला पोलिसांनी अटक केली होती. या संबंधित सेंटरचा परवाना रद्द करण्यात आला आहे. तसंच हे सोनोग्राफी सेंटर सील करण्यात आले आहे. बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणात मुख्य आरोपी सुलक्षणा गाडेकरला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणात एक एक करत अनेक महिलांना अटक…

Read More

वयाच्या ५८ व्या वर्षीही नर्मदा पायी परिक्रमा पूर्ण भारतीय संस्कृतीत नद्यांना देवता मानतात. नद्यांबद्दल पूज्य भावना, कृतज्ञता व आदर व्यक्त करण्याची आपली पुरातन परंपरा आहे. यासाठी असंख्य प्रथा, चालीरीती, रितीरिवाज आहेत. त्यातीलच एक वैशिष्ट्यपूर्ण व पृथ्वीतलावरील एकमेवाद्वितीय परंपरा म्हणजे नर्मदापरिक्रमा होय. याच परंपरेला मनवेल येथील चंपालाल गोकुळ पाटील या यांनी नर्मदा मैय्याची पाचवी परिक्रमा दि. ११ जानेवारी रोजी शुभमुहूर्तावर ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग, मध्यप्रदेश येथून संकल्प करून ४८ दिवस यात्रेत पायी चालत माता नर्मदेची पायी परिक्रमा दि. १ मार्च २०२६ रोजी पूर्ण केली. अत्यंत खडतर समजली जाणारी पायी नर्मदा परिक्रमा मध्यप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड राज्यांतून जवळपास बाविस जिल्ह्यामधून साधारणत साडेतीन हजार किमीचा…

Read More

सात संशयितांकडून आठ गावठी पिस्तुल आणि दहा जीवंत काडतूस हस्तगत करण्यात आले. जळगाव – मध्यप्रदेशातून गावठी बनावटीचे पिस्तुल आणून त्याची जळगावात विक्री करणाऱ्यांचा जिल्हापेठ पोलीसांनी पर्दाफाश केला. सात संशयितांकडून आठ गावठी पिस्तुल आणि दहा जीवंत काडतूस हस्तगत करण्यात आले. गावठी पिस्तुलची विक्री करणारा हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध आठ गंभीर गुन्हे दाखल आहे. सात पैकी तीन संशयित हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील असून तर उर्वरीत चौघांनी केवळ दहशत माजविण्यासाठी त्यांनी गावठी कट्टे खरेदी केले. अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली. याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, शहरातील इंडिया गॅरेज परिसरात राहणारा यश रामदास नन्नवरे (वय २७) हा गावठी…

Read More

पेट्रोल डिझेलचे दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जळगाव । मध्य पूर्वेतील इराण-इस्त्रायल-अमेरिकेच्या युद्धाची झळ भारताला असत असल्याचं दिसत असून आजपासून भारतात एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढल्या असून यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसला आहे. त्यानंतर आता पेट्रोल डिझेलचे दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तेल उत्पादक कंपन्यांनी पंप चालकांनाही मोठ्या सूचना दिल्याने सर्वसामान्य नागरीक धास्तावले आहेत. इराण-इस्त्रायलचे युद्धामुळे सागरी मार्गाने होणाऱ्या व्यवसायावर परिणाम झाला असून त्यामुळे इंधन,गॅसची आयात होण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे आता पेट्रोल डिझेलचे दरदेखील वाढण्याची शक्यता आहे.अशातच आता तेल कंपन्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ॲडव्हान्स पैसे भरा नंतरच पेट्रोल मिळेल, असं तेल कंपन्यांनी सांगितले आहे.युद्धामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये…

Read More

उन्मेश पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पक्षप्रवेशाची माहिती दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, ‘जळगाव लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि उबाठा गटाचे उत्तर महाराष्ट्रातील नेते उन्मेश पाटील यांनी आज शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान, या वेळी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी “उन्मेश पाटील पुन्हा जळगावचे खासदार होतील,” असे विधान केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, नव्या चर्चांना उधाण आले आहे. कारण, सध्या जिल्ह्यातील दोन्ही खासदार…

Read More

भारतात एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत. जळगाव । मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या युद्धाचा आता भारतावरही परिणाम होत आहे. भारतात एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ६० रुपये आणि १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ११५ रुपयांनी वाढ केली आहे. नवे दर आज म्हणजेच ७ मार्चपासून लागू होतील. जळगावला ८५८.५० रुपयांत मिळणारे स्वयंपाकाच्या गॅसचे सिलिंडर आता ९१८.५० रुपयांना मिळेल. यामुळे पुन्हा सर्वसामान्यांच्या खिशाला झळ पोहोचणार आहे. दिल्लीत घरगुती सिलिंडरची किंमत ८५३ रुपयांवरून ९१३ रुपये होईल. तर, व्यावसायिक सिलिंडरची किंमत आता १,७६४ रुपयांवरून १८८३ रुपये होईल.घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत शेवटच्या वेळी ८ एप्रिल २०२५…

Read More

जळगाव जिल्ह्यात तुती लागवड वाढवून रेशीम उत्पादनाला चालना देण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली जळगाव प्रतिनिधी । राज्य शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या महा-रेशीम अभियान 2026 अंतर्गत जळगाव जिल्ह्यात तुती लागवड वाढवून रेशीम उत्पादनाला चालना देण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्हा रेशीम कार्यालयाच्या वतीने रेशीम रथाच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये प्रचार व प्रसार केला जाणार असून या जनजागृती रथाचे उद्घाटन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे करण्यात आले. रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने महा-रेशीम अभियान राबविले असून त्याअंतर्गत तुती लागवड वाढविणे, शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणे तसेच रेशीम उत्पादन…

Read More

ड्रायव्हिंग लायसन्स चाचणी ट्रॅकवर नागरिकांना भेडसावत असलेल्या गंभीर समस्यांकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लक्ष वेधले आहे. जळगाव प्रतिनिधी । शहराजवळील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) नवीन वाहन फिटनेस टेस्टिंग ट्रॅक आणि कायमस्वरूपी ड्रायव्हिंग लायसन्स चाचणी ट्रॅकवर नागरिकांना भेडसावत असलेल्या गंभीर समस्यांकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लक्ष वेधले आहे. या ठिकाणी पिण्याचे पाणी, सावलीची व्यवस्था आणि स्वच्छतागृहांचा अभाव असल्याने नागरिकांना तीव्र उन्हात मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत असल्याचा आरोप मनसेने केला असून यासंदर्भात प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. जळगाव शहरापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर असलेल्या या ट्रॅकवर दररोज जिल्हाभरातून शेकडो वाहन चालक, वाहनमालक आणि नागरिक विविध कामांसाठी येत असतात. वाहन फिटनेस तपासणी तसेच कायमस्वरूपी…

Read More