अमळनेर प्रतिनिधी | भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका मध्यस्थालाच बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना अमळनेर तालुक्यातील बोहरा गावात घडली आहे. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संजय भीमराव भिल (वय ४५, रा. बोहरा) हे ३० एप्रिल रोजी सायंकाळी गावातील एका किराणा दुकानासमोर उभे होते. त्यावेळी तिथे संशयित आरोपी शेखर संतोष मेहेरे आणि राजेंद्र वर्णेवर कोळी यांच्यात वाद सुरू होता. संजय भिल यांनी सामाजिक बांधिलकीतून मध्यस्थी करत “भांडण करू नका” असे सांगून दोघांना सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, याचा राग धरून आरोपी शेखर याने शिवीगाळ केली. वादाचे पर्यवसान रात्री हिंसक वळणात…
Author: Nilesh Ajmera
पाचोरा प्रतिनिधी | लग्नास नकार दिल्याच्या रागातून एका तरुणाने तरुणीचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करून तिच्या भावाला पाठवल्याचा धक्कादायक प्रकार पाचोरा शहरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध विनयभंग आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा येथील एका २३ वर्षीय तरुणाने पोलिसांत तक्रार दिली आहे. संशयित आरोपी सोनुसिंग अजितसिंग चितोडिया (रा. सातारा परिसर, संभाजीनगर) याला तरुणाच्या बहिणीशी लग्न करायचे होते. मात्र, तरुणीने लग्नास नकार दिल्याने संशयिताने मनात राग धरला होता. मागील दोन महिन्यांपासून हा छळ सुरू होता. ३० एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास संशयिताने फिर्यादीच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर काही अश्लील व्हिडिओ आणि आक्षेपार्ह मजकूर पाठवला. …
जळगाव प्रतिनिधी | भारतीय लोकशाहीचा पाया असलेल्या मतदार यादीच्या अचूकतेसाठी आणि बळकटीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या SIR (मतदान पुनरीक्षण यादी कार्यक्रम) संदर्भात जळगाव शहरात एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक जळगाव शहराचे आमदार आदरणीय आमदार राजूमामा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली १ मे रोजी पार पडली. या बैठकीचा मुख्य उद्देश मतदार याद्यांमधील नावांची पडताळणी करणे, नवीन मतदारांची नोंदणी करणे आणि यादीतील दुबार किंवा मृत मतदारांची नावे वगळून यादी दोषमुक्त करणे हा होता. याप्रसंगी बोलताना आमदार राजूमामा भोळे यांनी सांगितले की, “प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत असणे हे आपले कर्तव्य आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असून, सर्व कार्यकर्त्यांनी…
जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहरातील कानळदा रोडवरील समर्थ लॉनजवळ मध्यरात्रीच्या सुमारास एक भीषण घटना घडली आहे. दुचाकीला झालेल्या या अपघातात २७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. मात्र, मृतदेहाची अवस्था आणि घटनास्थळाची परिस्थिती पाहता नातेवाईकांनी हा अपघात नसून घातपात असल्याचा खळबळजनक संशय व्यक्त केला आहे. अक्षय संजय देशमुख (वय २७) आणि त्याचा मित्र गणेश पवार हे दोघे धानोरा येथून आपल्या मित्राच्या लग्नानिमित्त आयोजित हळदीचा कार्यक्रम आटोपून जळगावकडे परतत होते. मध्यरात्री साडेअकरा ते बारा वाजेच्या सुमारास कानळदा रोडवरील समर्थ लॉनजवळ त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. या घटनेत अक्षय देशमुख याचा जागीच मृत्यू झाला, तर गणेश पवार…
जळगाव प्रतिनिधी | जळगाव महानगरपालिकेची ४२ कोटी ६० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या थेट आदेशानंतर मुंबईस्थित ‘मे. अटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लि.’ व त्यांच्या संचालकांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, गुन्हा दाखल होताच हा तपास तातडीने आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १९९६-९७ ते २००१-०२ या कालावधीत जळगाव शहरातील रस्ते डांबरीकरणाच्या एकूण २५६ कामांचे कंत्राट अटलांटा कंपनीला देण्यात आले होते. या कामांसाठी महापालिकेने कंपनीला सुमारे २४.३५ कोटी रुपये ‘मोबिलायझेशन’ आणि ‘मटेरियल ॲडव्हान्स’ म्हणून दिले होते. यापैकी १९.५५ कोटींची वसुली…
चोपडा प्रतिनिधी | चोपडा तालुक्यातील एका गावातील माध्यमिक विद्यालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेचे मुख्याध्यापक संजय पंडीतराव शंखपाळ यांनी एका महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करून तिला मानसिक त्रास दिल्याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ४३ वर्षीय पीडित महिला या शाळेत कार्यरत आहेत. शाळेतील सर्व कामे वेळेवर पूर्ण करूनही मुख्याध्यापक संजय शंखपाळ हे त्यांना वारंवार विनाकारण मानसिक त्रास देत होते. “तुझे काम अपूर्ण आहे” असे खोटे आरोप लावून चेअरमनकडे तक्रार करण्याची आणि लांब बदली करण्याची धमकी ते देत असत. ३० एप्रिल रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास हा प्रकार पुन्हा घडला. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, मुख्याध्यापकाने…
पाचोरा प्रतिनिधी | पाचोरा तालुक्यातील कोकडी तांडा येथे एका बंद घरातून अज्ञात चोरट्यांनी १ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देवकाबाई किसन राठोड (वय ५५, रा. कोकडी तांडा) या लग्नाला जाण्यासाठी तयारी करत होत्या. त्यांनी दागिने काढण्यासाठी घरातील पेटीचे कुलूप उघडून पाहिले असता, त्यांना पेटीतील साहित्य अस्ताव्यस्त दिसले. पेटीत ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. पेटीची बारकाईने पाहणी केली असता, ती एका बाजूने उचकटलेली दिसून आली. चोरट्यांनी या घरफोडीत १५ हजार रुपये…
जळगाव प्रतिनिधी | शहरातील खोटे नगर परिसरातील हॉटेल आशीर्वाद जवळ एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न करून तिला बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी ही खासगी नोकरी करते. १० एप्रिल रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास संशयित आरोपी भागवत गोविंद चव्हाण (रा. वाघ नगर, जळगाव) याने पीडितेस खोटे नगर परिसरातील एका निर्जन स्थळी असलेल्या काटेरी झुडपात नेले. “तू मला खूप आवडतेस” असे म्हणत आरोपीने पीडितेला मिठी मारून अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. पीडितेने या कृत्यास विरोध केला असता,…
जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यातील यावल पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीचे बालविवाह लावून देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुख्य आरोपीसह त्याच्या आई-वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या कृत्यामुळे पीडित अल्पवयीन मुलगी गर्भवती राहून तिने एका बालकाला जन्म दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे यावल तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या एका तरुणाशी लग्न झाले आहे. पीडिता अल्पवयीन असल्याचे माहित असूनही, तिला ‘तू आता माझी पत्नी आहेस’ असे सांगून तिच्यावर वारंवार अत्याचार केला. या अत्याचारामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिली. २८ एप्रिल रोजी पीडितेची प्रसूती होऊन तिने एका मुलाला जन्म दिला. हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर…
पारोळा प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील कानोश्री पेट्रोल पंपाजवळ दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना २८ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, समाधान सुकदेव पाटोळे (वय ३८) आणि संतोष आत्माराम पाटील (वय ७०, दोन्ही रा. मोंढाळे, ता. अमळनेर) हे आपल्या ‘हिरो फॅशन प्रो’ दुचाकीने (क्रमांक MH 19 BR 8748) मोंढाळेकडून करंजीकडे जात होते. त्याचवेळी रस्त्याच्या विरुद्ध बाजूने येणाऱ्या ‘हिरो होंडा स्लेंडर’ दुचाकीने (क्रमांक MH 39 B 4788) त्यांना जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, समाधान पाटोळे आणि संतोष…

