जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील शनिपेठ आणि आसोदा रोड परिसरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, पोलिसांच्या गस्ती पथकाला गुंगारा देत एका रात्रीत दोन दुकाने फोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा सर्व प्रकार नजीकच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकारामुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास एका लाल रंगाच्या कारमधून आलेल्या चोरट्यांच्या टोळीने हे धाडस केले. विशेष म्हणजे, शहरातील भिलपुरा पोलिस चौकीपासून अवघ्या ५० फुटांच्या अंतरावर असलेले ‘पद्मालया मेडिकल’ चोरट्यांनी लक्ष्य केले. गस्तीवर असलेले पोलिस पथक तेथून पुढे जाताच, चोरट्यांनी दुकानाच्या शटरचे लॉक तोडून आत प्रवेश केला. दुकानातील ५ ते ८ हजार रुपयांची रोकड लंपास…
Author: Nilesh Ajmera
धरणगाव प्रतिनिधी | नुकताच विवाह सोहळा पार पडल्यानंतर मोठ्या उत्साहात माहेरी परतणाऱ्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. धरणगाव तालुक्यातील वराड गावाजवळ बुधवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास क्रूझर गाडीचे चाक चालत्या प्रवासात निखळल्याने भीषण अपघात झाला. या हृदयद्रावक घटनेत २२ वर्षीय नववधूसह तिघांचा जागीच मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. लग्नाच्या आनंदावर विरजण :मिळालेल्या माहितीनुसार, अकोला येथील रहिवासी पूजा रवी वागडकर (वय २२) हिचा विवाह नुकताच गुजरात राज्यातील वापी येथे झाला होता. लग्नानंतर पहिल्यांदाच पूजा आपल्या नातेवाईकांसह माहेरी अकोल्याला परतत होती. सर्वजण क्रूझर गाडीने (क्रमांक MH 30 AZ 4710) प्रवास करत होते. वापीहून अकोल्याकडे जात असताना वराड…
अकोला प्रतिक्रिया | येथील ख्यातनाम सामाजिक कार्यकर्त्या नीता यशवंत वायकोळे यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल अत्यंत मानाचा ‘पद्मश्री डॉ. मणीभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार २०२६’ देऊन गौरविण्यात आले. पुण्याच्या सावित्रीबाई फुले स्मारक सभागृहात २७ एप्रिल २०२६ रोजी पार पडलेल्या एका भव्य समारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. मणीभाई देसाई प्रतिष्ठान, भारत सरकारचा नीती आयोग, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्यम मंत्रालय (MSME) संलग्न राष्ट्रसेवा समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हा गौरव करण्यात आला. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रविंद्र भोळे आणि खादी व ग्रामोद्योग मंत्री रविंद्र साठे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. सौ. नीता वायकोळे या महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाच्या…
अमळनेर प्रतिनिधी | शासकीय कामासाठी किंवा अवैध कामांना परवानगी देण्यासाठी अधिकाऱ्यांच्या नावाने लाच मागणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अमळनेर तालुक्यातील लोणपंचम आणि झाडी येथील दोन खाजगी व्यक्तींविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. तहसिलदारांच्या नावाने ५० हजार रुपयांची लाच मागून त्यापैकी २५ हजार रुपये स्वीकारताना जितेंद्र राजेंद्र पाटील याला रंगेहात पकडण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील तक्रारदार यांचा गौण खनिज (वाळू) वाहतुकीचा व्यवसाय आहे. त्यांच्या दोन ट्रॅक्टरने मौजे मांडळ येथील पांझरा नदीतून वाळूची वाहतूक करू देण्यासाठी खाजगी इसम रामराव हरचंद पाटील (वय ६४, रा. लोणपंचम) आणि जितेंद्र राजेंद्र पाटील (वय २६, रा. झाडी) यांनी तक्रारदाराकडे तहसिलदारांच्या नावाने पैशांची मागणी…
जळगाव प्रतिनिधी । गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात तापमानाने कहर केला आहे. त्यात आज मंगळवारी जळगावचे तापमान तब्बल ४२ अंश सेल्सिअसवर पोहोचले असताना शिरसोली नाका परिसरात धावत्या अॅक्टिव्हाने अचानक पेट घेतल्याने खळबळ उडाली. सुदैवाने दुचाकीवरील दोघांनी प्रसंगावधान राखत उडी मारल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेत दुचाकी जळून खाक झाल्याचे समोर आले आहे. सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील शिरसोली नाका परिसरातून योगेश महाजन (वय ४६) व हितेन महाजन (वय १८) हे दोघेजण मोपेड गाडी ॲक्टीव्हाने जात होते. त्यावेळी त्यांच्या अॅक्टिव्हामधून अचानक ठिणग्या निघाल्या आणि काही क्षणातच वाहनाने पेट घेतला. आग लागल्याचे लक्षात येताच दोघांनी तत्काळ वाहन सोडून जीव वाचवला.…
बोदवड प्रतिनिधी । बोदवड तालुक्यातील येवती येथे सिमेंट काँक्रीटच्या कामावरून झालेल्या वादातून एका शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी बोदवड पोलीस स्टेशनमध्ये सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोदवड तालुक्यातील येवती गावात २४ एप्रिल रोजी दुपारी १२:३० च्या सुमारास सिमेंट काँक्रीटचे काम सुरू होते. तक्रारदार योगेश युवराज माळी (वय २५, रा. येवती) यांनी या कामाबाबत संबंधित व्यक्तींकडे विचारणा केली होती. याच कारणावरून आरोपींना राग अनावर झाला आणि त्यांनी संगनमत करून योगेश माळी यांना लोखंडी रॉड आणि काठ्यांच्या साहाय्याने बेदम मारहाण केली. यावेळी आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत ‘जीव मारून टाकण्याची’ धमकीही दिली. या घटनेची माहिती…
जळगाव प्रतिनिधी । गुंतवणुकीच्या नावाखाली ५ लाख २० हजार रुपयांची फसवणूक आणि अपहरण करून दरोडा टाकणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात तीन संशयित आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले असून, विशेष म्हणजे यात वाशिम पोलीस मुख्यालयातील एका कर्मचाऱ्याचाही समावेश असल्याने खळबळ उडाली आहे. चोपडा तालुक्यातील धानोरा येथील रहिवासी जगदीश व्यास यांना सोमवारी २७ एप्रिल रोजी १२.३० वाजेच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने मोबाईलवरून संपर्क साधून, १ लाखाच्या गुंतवणुकीवर ५ लाखांचा परतावा देण्याचे आमिष दाखवले. या आमिषाला बळी पडत फिर्यादी यांचा मुलगा पंकज व्यास हे ५ लाख २० हजार रुपये घेऊन हॉटेल कमल पॅराडाईज येथे पोहोचले. तिथे…
मुक्ताईनगर प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावात माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरून एका महिलेचा विनयभंग करून तिला, तसेच तिच्या पती आणि मुलाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, पीडित कुटुंबाने दिलेल्या तक्रारीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दोन संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित कुटुंब शेती करून आपला उदरनिर्वाह करते. रविवारी, २६ एप्रिल रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. गावातीलच संशयित आरोपी राजेश संभाजी मोंढे आणि किरण संभाजी मोंढे या दोघांनी पीडित महिलेला गाठले. कोणत्याही ठोस कारणाशिवाय या आरोपींनी महिलेला शिवीगाळ करत…
जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. केवळ दारू पिण्यासाठी ५०० रुपयांची मागणी केली आणि पैसे देण्यास नकार दिला म्हणून एका महिलेच्या डोक्यात दगड घालून तिला गंभीर जखमी करण्यात आले आहे. या घटनेने तांबापुरा मच्छी बाजार परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जळगाव शहरातील तांबापुरा भागात राहणारे युसूफ मुसा खटीक (वय ६४) यांची पत्नी सलमाबी या २६ एप्रिल रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास आपल्या घराबाहेर पाणी भरत होत्या. यावेळी संशयित आरोपी मोहम्मद शेख मेहमुद याने तिथे येऊन त्यांच्याकडे दारू पिण्यासाठी ५०० रुपयांची मागणी केली. सलमाबी यांनी या पैशांना स्पष्ट नकार…
जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरात आकाशवाणी चौकात बसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या सामानाची चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, परिसरात खळबळ उडाली आहे. दुर्गा रवींद्र राठोड (वय ३०, रा. देवजारी कॉलनी, सेंधवा, जि. बडवाणी, मध्य प्रदेश) या २७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील आकाशवाणी चौक परिसरातून प्रवास करत होत्या. या प्रवासादरम्यान, अज्ञात चोरट्याने फिर्यादीची कोणतीही संमती नसताना बसच्या डिक्कीमध्ये ठेवलेल्या सामानाला लक्ष्य केले. संधी साधून चोरट्याने डिक्की उघडली आणि त्यातील मौल्यवान ऐवज लंपास केला. त्यात सोन्याचे पेंडल, सोन्याचे मणी आणि रोकड असा एकुण १२ हजार…

