जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरात आकाशवाणी चौकात बसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या सामानाची चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, परिसरात खळबळ उडाली आहे. दुर्गा रवींद्र राठोड (वय ३०, रा. देवजारी कॉलनी, सेंधवा, जि. बडवाणी, मध्य प्रदेश) या २७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील आकाशवाणी चौक परिसरातून प्रवास करत होत्या. या प्रवासादरम्यान, अज्ञात चोरट्याने फिर्यादीची कोणतीही संमती नसताना बसच्या डिक्कीमध्ये ठेवलेल्या सामानाला लक्ष्य केले. संधी साधून चोरट्याने डिक्की उघडली आणि त्यातील मौल्यवान ऐवज लंपास केला. त्यात सोन्याचे पेंडल, सोन्याचे मणी आणि रोकड असा एकुण १२ हजार…
Author: Nilesh Ajmera
जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहराच्या मुख्य मार्गांवर वाहतुकीचा खोळंबा करणाऱ्या अनधिकृत बांधकामे आणि हातगाड्यांविरुद्ध जळगाव महानगरपालिकेने पुन्हा एकदा कठोर पवित्रा घेतला आहे. मंगळवारी, २८ एप्रिल रोजी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने शहराच्या मध्यवर्ती भागातील ‘अजिंठा चौक ते कालिंका माता मंदिर’ या मार्गावर धडक कारवाई केली. गेल्या अनेक दिवसांपासून या मार्गावर मोठ्या प्रमाणावर हातगाड्या, टपऱ्या आणि अनधिकृत दुकानांचा विळखा पडला होता. राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या या परिसरामुळे नागरिकांना वाहतुकीच्या मोठ्या कोंडीचा सामना करावा लागत होता. आज सकाळी महापालिकेचे पथक जेसीबी आणि क्रेनसह या परिसरात दाखल झाले. पथकाने अत्यंत वेगाने कारवाई करत रस्ता अडवणाऱ्या सर्व टपऱ्या आणि हातगाड्या जप्त केल्या. या कारवाईमुळे रस्ता…
जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक ९ मध्ये महावितरणच्या अत्यंत अनियमित आणि वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रात्रीच्या वेळी वीज गुल राहत असल्यामुळे स्थानिक रहिवासी प्रचंड त्रस्त असून, प्रशासनाच्या या गलथान कारभाराविरोधात आता संतप्त नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या गंभीर समस्येबाबत ‘प्रभाग क्रमांक ९ समस्या ग्रुप’च्या नेतृत्वाखाली सुमारे ४० नागरिकांनी निमखेडी सबस्टेशनमध्ये लेखी तक्रार केली होती. मात्र, प्रशासनाने या तक्रारींकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. विशेषतः २२ एप्रिल रोजी रात्री २ वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित होता. धक्कादायक बाब म्हणजे, या काळात सबस्टेशनवर अधिकारी उपस्थित नव्हते आणि नागरिकांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न…
जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील चौघुले प्लॉट परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद असल्याने संतप्त झालेल्या स्थानिक महिलांनी सोमवारी महानगरपालिकेत धडक देत मुख्य प्रवेशद्वाराजवळ आंदोलन केले. ‘पाणी द्या, पाणी द्या, महापौर ताई पाणी द्या’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांना पाण्यासाठी वनवण भटकंती करावी लागत असून महिलांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. वारंवार तक्रारी करूनही प्रश्न सुटत नसल्याने अखेर महिलांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला. आंदोलनादरम्यान महापालिका प्रशासनाने आंदोलक महिलांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रशासनाकडून सांगण्यात आले की, कांचन नगर भागात सुरू असलेल्या अमृत योजनेच्या कामामुळे या परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. त्यामुळे काही…
भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ बसस्थानकात प्रवाशांच्या गर्दीचा गैरफायदा घेऊन त्यांच्या मौल्यवान दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या एका महिला चोरट्याला भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ३ लाख २० हजार रुपये किमतीची २२ ग्रॅम सोन्याची पोत जप्त केली असून, या कारवाईमुळे बसस्थानकात सक्रिय असलेल्या चोरट्यांच्या टोळीला मोठा चाप बसला आहे. नेमकी घटना अशी की, मुक्ताईनगर येथील शिवराय नगरमध्ये राहणाऱ्या कुसुम देविदास चौधरी (वय ६२) या २३ एप्रिल २०२६ रोजी भुसावळ बसस्थानकात चोपडा बसमध्ये चढत होत्या. याच वेळी गर्दीचा फायदा घेत एका अज्ञात महिलेने त्यांच्या पर्समधून ३ लाख २० हजार रुपये किमतीची २२ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत लबाडीने चोरून नेली.…
जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरात अवैध गौण खनिजाची तस्करी करणाऱ्यांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी धडक मोहीम उघडली आहे. शहराच्या सीमावर्ती भागात आणि रात्रीच्या वेळी सर्रासपणे सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीला लगाम घालण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून, २५ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास पोलिसांनी एक अवैध वाळू भरलेला डम्पर पकडून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे गस्ती पथक शिरसोली रोड परिसरात २५ एप्रिल रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास पेट्रोलिंग करत होते. दरम्यान, जैन इरिगेशन जवळ असलेल्या एचपी पेट्रोल पंपाजवळील सार्वजनिक रस्त्यावरून एक डम्पर (क्रमांक एमएच १९ वाय ६१६१) संशयास्पद रित्या वेगाने जाताना…
जळगाव प्रतिनिधी । जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर तीन दिवसांपूर्वी घडलेल्या भीषण ‘हिट अँड रन’ अपघाताने शहरात खळबळ उडाली आहे. तंबापुरा भागातील रहिवासी ५० वर्षीय मोहम्मद मूसा शेख यांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला असून, तीन दिवस उलटूनही एमआयडीसी पोलिसांच्या हाती अद्याप आरोपी वाहन किंवा चालक लागलेला नाही. पोलिसांच्या या संथ तपासाबाबत मृताचे नातेवाईक आणि स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. घटनेच्या दिवशी मोहम्मद मूसा शेख हे शनीवारी २५ एप्रिल रोजी रस्ता ओलांडत असताना, जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील मनराज मोटर्स जवळ एका अज्ञात भरधाव वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, ते गंभीर जखमी झाले आणि उपचारादरम्यान त्यांचा…
जळगाव प्रतिनिधी । जळगाव पोलीस मुख्यालय परिसरात सोमवारी २७ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास मशिदीजवळ असलेल्या पोलीस मालकीच्या पत्र्याच्या शेडला अचानक भीषण आग लागली. या दुर्घटनेत पोलीस विभागाचे महत्त्वाचे दस्तऐवज, जुने रेकॉर्ड आणि अनेक मौल्यवान साहित्य जळून खाक झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी १० वाजताच्या सुमारास या शेडमधून धूर निघत असल्याचे दिसून आले. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. सदर शेडमध्ये पोलीस विभागाचे जुने रेकॉर्ड, पंचनामा बुक्स, झेरॉक्स मशीन, संगणक, तसेच दंगल नियंत्रणासाठी लागणारे बॅरिकेट्स, हेल्मेट्स, लाठ्या आणि अन्य फर्निचर साठवून ठेवण्यात आले होते. हे सर्व साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच अपर…
जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्यात सूर्याचा प्रकोप वाढत असून, वाढत्या तापमानाचा पहिला बळी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील तुकाराम वाडी परिसरात राहणाऱ्या लोधू नामदेव पाटील (वय ६०) या वृद्धाचा उन्हाच्या तीव्र फटक्यामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. सोमवारी २७ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास एसटी वर्कशॉपच्या भिंतीजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला. मूळचे हिंगणे (ता. बोदवड) येथील रहिवासी असलेले लोधू पाटील सध्या जळगावमधील नेरी नाका परिसरातील तुकाराम वाडीत पत्नीसह राहत होते. ते एमआयडीसीतील एका दालमिलमध्ये कामाला होते. शनिवारी २५ एप्रिल रोजी गावात लग्नसमारंभ असल्याने ते हिंगणे येथे गेले होते. रविवारी सायंकाळी लग्न आटोपून ते…
जळगाव प्रतिनिधी | शहरात रस्ते अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, आज मानराज पार्क चौफुलीवर एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. एका भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ओम सुनील गिरी असे या मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ओम सुनील गिरी हा आपल्या दुचाकीने मानराज पार्क चौफुलीवरून जात असताना, पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव ट्रकने त्याला भीषण धडक दिली. धडक इतकी जोरात होती की ओम थेट ट्रकच्या चाकाखाली आला आणि त्याला काही अंतर फरपटत नेण्यात आले. या भीषण अपघातात ओमचा जागीच मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने…

