शिवसेना जिल्हा प्रमुख माजी महापौर, तथा नगरसेवक विष्णु भंगाळे यांनी व्यक्त केले. अनेक वर्षांपासून कलावंतांना भेडसावत असणारी प्रश्न सोडवण्यासाठी आपण कलावंत सोबत खंभिरपणे उभे असून लवकरच सर्व समस्या कायमच्या दूर करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मत शिवसेना जिल्हा प्रमुख माजी महापौर, तथा नगरसेवक विष्णु भंगाळे यांनी व्यक्त केले. भंगाळे यांच्या निवासस्थानी असलेल्या कार्यालयात शहरातील कलावंतांनी आपल्या समस्यांबाबत त्यांची भेट घेतली. यावेळी ते बोलेत होते. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी रमेश भोळे तसेच ऋषिकेश सोनवणे, आकाश बाविस्कर यांच्या विष्णू भंगाळे यांनी चर्चा झाली. बैठकीत कलावंतांना ज्या काही समस्या असतील त्या त्यांनी जाणून घेतल्या. दरम्यान नव्या जोमाने नव्या पिढीला नाट्य चळवळ सुरू राहील अशी कायमस्वरूपी उपाययोजना…
Author: Nilesh Ajmera
एक हादरवून टाकणारी २० लाखांच्या खंडणीसाठी अपहरणाची थरारक घटना जळगावात एक हादरवून टाकणारी २० लाखांच्या खंडणीसाठी अपहरणाची थरारक घटना अवघ्या काही तासांत उघडकीस आली आहे. शनिपेठ पोलिसांनी अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने विजेच्या वेगाने कारवाई करत दोन प्रौढ आरोपींसह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत पीडितांची सुखरूप सुटका केली. ही माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली. मिळालेल्या माहितीनुसार, मोबाईल साहित्य विक्रेते कृष्णकुमार डुंगराराम चौधरी (वय ३२) यांना आरोपी यश जितेंद्र माकोडे (वय २२, रा. जळगाव) याने १५ फेब्रुवारी रोजी चलाखीने जाळ्यात ओढले. त्याने प्रथम फिर्यादींचा भाचा गणपतलाल माली (वय १९) याला ममुराबाद रोडवरील एका घरात डांबून ठेवले. त्यानंतर…
108 दिवसात पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्यामुळे, रावेर पाल प्रतिनिधी : अखिल भारतीय चैतन्य साधक परिवाराचे संस्थापक सदगुरु संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांचे कृपापात्र शिष्य अखिल भारतीय संत समिती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा विद्यमान पदस्थ श्रधेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज यांनी 108 चैतन्य साधक परिवारासह फक्त 108 दिवसातच 3500 की. मी अंतराची पैदल माँ नर्मदा परिक्रमा पुर्ण केल्याने देशभरातील भाविकामध्ये त्यांचे कौतुक करण्यात येत असून ही परिक्रमा निर्विघ्न पार पाडून दि :-17 फेब्रुवारी रोजी पाल येथील त्यांच्या श्री वृंदावन धाम आश्रमात आले असता त्यांचे चैतन्य युवा उत्सव समिती पाल तर्फे भव्य स्वागत करण्यात आले. या वेळी श्रधेय बाबाजीचे…
बारावी परीक्षा केंद्रावर तोडफोड; अफसर खानसह १० ते १५ जणांवर गुन्हा दाखल मुक्ताईनगर प्रतिनिधी – मुक्ताईनगर येथील जे. ई. स्कूलमध्ये सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षेदरम्यान सोमवारी दुपारी अज्ञात व्यक्तींनी परीक्षा केंद्रात अनधिकृत प्रवेश करून तोडफोड केल्याची घटना घडली. या प्रकरणी शिंदे शिवसेना पक्षाचा राज्यस्तरीय प्रदेश अध्यक्ष पद भूषवणारा अफसर खान याच्यासह दहा ते पंधरा जणांवर मुक्ताईनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास परीक्षा केंद्राच्या मागील बाजूने दहा ते पंधरा जणांनी प्रवेश करत खिडक्यांच्या जाळ्या तोडल्या तसेच लोखंडी गेटची तोडफोड केली. या माध्यमातून विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्याचा प्रयत्न झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे परीक्षा केंद्राच्या…
तालुक्यातील २१ कोटी ४८ लाखांच्या भरपाईचा अहवाल सादर मुक्ताईनगर प्रतिनिधी : तालुक्यातील मुक्ताई सहकारी उपसा सिंचन योजना मनूर या योजनेच्या कोट्यवधी रुपयांच्या मुक्ताईनगर येथील पंप हाउस मध्ये शासकीय साहित्याची बेकायदेशीर तोडफोड आणि चोरी झाल्याच्या प्रकरणाला आता मोठे वळण मिळाले आहे. आमदार एकनाथराव खडसे यांनी या संदर्भात केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या मुख्य अभियंत्यांनी सविस्तर चौकशी अहवाल सादर केला असून, या संपूर्ण नुकसानीची आणि योजनेच्या पुनरुज्जीवनाची किंमत २१ कोटी ४८ लाख रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. या अहवालामुळे या प्रकरणातील संशयास्पद भूमिका घेणारे अधिकारी आणि कंत्राटदारांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, खामखेडा पुलाजवळ असलेल्या या योजनेच्या पंप…
दिव्यांग बांधवांना स्वावलंबी बनवण्याची संधी द्या – संजय सावकारे राज्य शासनाच्या उपक्रमांतर्गत वरणगाव येथे दिव्यांग बांधवांसाठी विशेष साहित्य वितरण कार्यक्रमात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उद्योगमंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांसाठी बॅटरीवर चालणाऱ्या तीनचाकी सायकल व व्हिल चेअर वितरण करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश दिव्यांग व्यक्तींना दैनंदिन जीवनात स्वावलंबी बनवणे आणि समाजातील सक्रिय सहभाग सुनिश्चित करणे हा आहे. कार्यक्रमात बोलताना मंत्री सावकारे म्हणाले, “प्रत्येक व्यक्तीकडे काही ना काही अद्वितीय देणगी असते. चालता येत नसल्यामुळे किंवा शरीरदृष्ट्या अडचणी असल्या तरी दिव्यांग व्यक्तींची बुद्धी, कौशल्ये आणि क्षमता इतरांपेक्षा कमी नाहीत. शासनाकडून दिल्या जाणाऱ्या या साधनांमुळे त्यांचे शिक्षण, रोजगार आणि सामाजिक…
२४ वर्षांच्या गौरवशाली राष्ट्रसेवेचा सन्मान; जळगाव प्रतिनिधी | देशसेवेसाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे, शिस्त, निष्ठा व कर्तव्यनिष्ठेचे प्रतीक असलेले भारतीय सैनिक मा. श्री. छोटूसिंग मानसिंग पाटील (रा. खर्ची) यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा दि. 19 फेब्रुवारी 2026 रोजी जळगाव येथे अत्यंत उत्साही व गौरवशाली वातावरणात पार पडणार आहे. भारतीय सैन्यात Hon. NB Sub या पदावर कार्यरत असलेल्या मा. श्री. पाटील यांनी तब्बल २४ वर्षे अखंड राष्ट्रसेवा बजावत देशाच्या संरक्षणासाठी मोलाचे योगदान दिले आहे. सीमावर्ती भागात कठीण परिस्थितीत सेवा बजावताना त्यांनी दाखवलेले धैर्य, शिस्त व निष्ठा ही तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.शिस्त, निष्ठा आणि देशभक्तीचा आदर्श सेवाकालात मा. श्री. छोटूसिंग पाटील…
यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ते सध्या फरार आहेत. जिल्हा पोलिस दलाच्या वेल्फेअर विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या दक्षता पेट्रोलपंपावरील तब्बल १ कोटी ३३ लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी व्यवस्थापक असलेले पोलीस उपनिरीक्षक वाल्मीक मधुकर वाघ (५७, रा. साईनगर, निमखेडी शिवार) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ते सध्या फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. जिल्हा पोलिस दलाच्या मानव संसाधन विभागामार्फत भास्कर मार्केटसमोरील दक्षता पेट्रोलपंप चालविला जातो. या पंपावरील दैनंदिन आर्थिक व्यवहारांची जबाबदारी वाल्मीक वाघ यांच्याकडे व्यवस्थापक म्हणून सोपविण्यात आली होती. दररोज पेट्रोल व डिझेल विक्रीतून जमा होणारी रोख रक्कम बँकेत भरणा करणे, त्याची अचूक नोंद ठेवणे तसेच रोखवही…
होळीनिमित्त मध्य रेल्वेकडून १८६ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय.. भुसावळ, जळगावकरांनाही फायदा जळगाव। शिमग्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. होळीनिमित्त गावी जाणाऱ्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने तब्बल १८६ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष सेवांमध्ये ९४ होळी विशेष गाड्या तर ९२ अतिरिक्त विशेष गाड्यांचा समावेश आहे.या विशेष गाड्या मुंबई–नागपूर, सावंतवाडी रोड, बनारस, गोरखपूर, समस्तीपूर, दानापूर तसेच पुणे–नागपूर, हजरत निजामुद्दीन आणि दानापूर या मार्गांदरम्यान धावणार आहेत. त्यामुळे उत्तर भारतासह विदर्भ, कोकण आणि इतर भागात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेष यातील अनेक गाड्या जळगाव आणि भुसावळ मार्गे धावणार असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा मिळेल. कोणत्या गाड्या कोणत्या वेळेत…
जळगाव महापालिकेची अतिक्रमणाविरोधात जोरदार कारवाई, साहित्य जप्त जळगाव । जळगाव शहरात वाढत्या अतिक्रमणाच्या पार्श्वभूमीवर जळगाव महापालिकेने जोरदार कारवाई केली. शहरातील नवी पेठ परिसरासह टॉवर चौक परिसरातील जैन मंदिरासमोरील अतिक्रमण हटवून मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त करण्यात आले. महानगरपालिकेच्या या कारवाईमुळे अतिक्रमण करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधीक्षक संजय ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळपासूनच नवी पेठ परिसरात कारवाईला सुरुवात केली. विशेषतः टॉवर चौक परिसरात रस्त्याच्या कडेला आणि सार्वजनिक जागेत अनधिकृतपणे ठेवण्यात आलेल्या लोखंडी पेट्या, हातगाड्या आणि इतर साहित्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. या पार्श्वभूमीवर अतिक्रमण विभागाने कठोर पावले उचलत जैन मंदिरासमोरील परिसरातील अतिक्रमण हटवले. लोखंडी पेट्या आणि हातगाड्या जप्त या कारवाईदरम्यान…

