उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. जळगाव प्रतिनिधी । शहरातील पिंप्राळा परिसरातील स्मशानभूमीत आवश्यक सोयीसुविधांचा अभाव असल्याच्या तक्रारीनंतर उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. या पाहणीदरम्यान स्मशानभूमीत शेड, सुरक्षा रक्षक कक्ष (वॉचमन रूम) तसेच अन्य मूलभूत सुविधांची उभारणी करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. पिंप्राळा उपनगर तसेच परिसरातील अनेक वसाहती आणि कॉलनींसाठी अंत्यसंस्कारासाठी पिंप्राळा स्मशानभूमी ही सर्वात जवळची आणि सोयीची जागा मानली जाते. मात्र गेल्या काही काळापासून या ठिकाणी देखभालीचा अभाव असल्याने विविध समस्या निर्माण झाल्या असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात आल्या होत्या. ही बाब जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निदर्शनास…
Author: Nilesh Ajmera
श्री जैन श्वेतांबर मूर्तीपूजक मंदिरासमोरील अतिक्रमणावर अखेर महापालिकेने कारवाई करत ते हटवले. जळगाव प्रतिनिधी । शहराच्या मध्यवर्ती भागातील टॉवर चौक परिसरात असलेल्या श्री जैन श्वेतांबर मूर्तीपूजक मंदिरासमोरील अतिक्रमणावर अखेर महापालिकेने कारवाई करत ते हटवले. महापौर दीपमाला काळे यांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत अतिक्रमण विभागाला तात्काळ कारवाईचे आदेश दिल्यानंतर शुक्रवारी ही धडक मोहीम राबवण्यात आली. या कारवाईमुळे मंदिर परिसरातील रस्ता मोकळा झाला असून मंदिर बांधकामासाठी होणारा अडथळा दूर झाला आहे. टॉवर चौक परिसरातील श्री जैन श्वेतांबर मूर्तीपूजक मंदिराचे नूतनीकरण आणि बांधकामाचे काम सध्या सुरू आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ काही व्यक्तींनी अनधिकृतपणे मोठ्या लोखंडी पेट्या आणि इतर साहित्य ठेवून अतिक्रमण केले…
ओबीसी मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाचा पहिला टप्पा सुरू करत अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम आणि राष्ट्रीय पिछडा ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी विकास पटेल यांच्या नेतृत्वाखाली देशभर चार टप्प्यांत आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात विविध जिल्ह्यांमध्ये प्रशासनाला निवेदन देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून जळगाव जिल्ह्यातही त्याची अंमलबजावणी करण्यात आली.या निवेदन आंदोलनाचे नेतृत्व भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष देवानंद निकम आणि राष्ट्रीय पिछडा ओबीसी मोर्चाचे राज्य सदस्य घनश्याम चौधरी यांनी केले. त्यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून केंद्र शासनाच्या धोरणांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. निवेदनात नमूद करण्यात आले की, केंद्र शासनाने ओबीसींची…
भीषण अपघातात चार वर्षांच्या चिमुकल्यासह एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला मालेगावजवळील राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात चार वर्षांच्या चिमुकल्यासह एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला, तर अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. मृत आणि जखमी सर्वजण जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील सातोड गावचे रहिवासी आहेत. या घटनेमुळे सातोड गावावर शोककळा पसरली आहे. या अपघातात चालक दीपक किशोर नाफडे (३५), त्यांचा मुलगा प्रथमेश दीपक नाफडे (४) आणि अंकिता संजय नाफडे (१९) यांचा जागीच मृत्यू झाला. तर संजय पांडुरंग नाफडे (५०), चारुलता संजय नाफडे आणि पूजा दीपक नाफडे (३०) हे गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या…
देशातील प्रतिष्ठित नागरी सेवा (UPSC) परीक्षेत देशपातळीवर ७३ वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले एरंडोल येथील ॲड. ओम त्रिवेदी व रेखा त्रिवेदी यांचा थोरला पुत्र आकाश त्रिवेदी (वय २३) याने देशातील प्रतिष्ठित नागरी सेवा (UPSC) परीक्षेत देशपातळीवर ७३ वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामुळे एरंडोलसह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आकाशने IIT कानपूर येथून कॉम्प्युटर सायन्स शाखेत B.Tech पदवी प्राप्त केली आहे. त्याची निवड देशातील अग्रगण्य व्यवस्थापन संस्था IIM अहमदाबाद येथेही झाली होती. अत्यंत कमी वयात UPSC परीक्षा उत्तीर्ण होत त्याने आपल्या जिद्द, परिश्रम आणि अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडविले आहे. आकाश आणि त्याचा…
आर्थसंकल्पाची दिवंगत अर्थमंत्री अजित पवारांनी बहुतांश तयारी केलेली होती. आर्थिक वर्ष 2026-27 साठी राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 6 मार्च 2026 रोजी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला. या आर्थसंकल्पाची दिवंगत अर्थमंत्री अजित पवारांनी बहुतांश तयारी केलेली होती. मात्र त्यांच्या अपघाती मृत्यूनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडला. हा अर्थसंकल्प अनेक बाबींनी खास आहे. यात महात्मा फुले यांच्या जन्माला 200 वर्षे पुर्ण होत आहे. यासाठी एक समिती स्थापन करुन विविध कार्यक्रम आयोजन करण्यासाठी निधी दिला जाईल. तर राज्यात नवीन काही योजना सुरु केल्या जातील, अशी मोठी घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली. यासह विविध घोषणा या यावेळी करण्यात आल्या. दरम्यान, या अर्थसंकल्पानुसार,…
जळगाव महापालिकेकडून मालमत्ता कर थकबाकीदार नागरिकांना मोठा दिलासा देणारा निर्णय जळगाव । जळगाव महापालिकेकडून मालमत्ता कर थकबाकीदार नागरिकांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांकडून सातत्याने होत असलेल्या मागणीची दखल घेत महापालिकेने मर्यादित कालावधीसाठी ‘अभय योजना’ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत ५ ते १९ मार्च या कालावधीत थकबाकीदारांना मालमत्ता करावरील शास्ती (दंड) माफ करून घेण्याची संधी मिळणार आहे. महापौर दीपमाला काळे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, या योजनेमुळे नागरिकांना थकीत मालमत्ता कर भरताना दंडाची रक्कम भरण्याची गरज राहणार नाही. नागरिकांनी केवळ मूळ कर भरून आपली थकबाकी पूर्णपणे निकाली काढता येणार आहे. या निर्णयामुळे महानगरपालिकेच्या उत्पन्नातही वाढ होण्यास…
नदीपात्राची स्थिती तसेच रेती वाहतुकीचे मार्ग यांचा आढावा घेण्यात आला. चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील पीपरी, जेना आणि पारोधी येथील लिलाव झालेल्या रेती घाटांची उपविभागीय अधिकारी (वरोरा) संदीप भस्के यांनी नुकतीच प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. पाहणीदरम्यान संबंधित घाटांवरील उत्खननाबाबत माहिती घेत त्यांनी पुढील आदेश मिळेपर्यंत उत्खनन थांबविण्याचे निर्देश दिल्याची माहिती प्रशासनाच्या सूत्रांकडून मिळाली आहे. या वेळी घाट परिसरातील परिस्थिती, उत्खननाची पद्धत, नदीपात्राची स्थिती तसेच रेती वाहतुकीचे मार्ग यांचा आढावा घेण्यात आला. संबंधित ठेकेदार व कामगारांना पुढील आदेश मिळेपर्यंत कामकाज बंद ठेवावे, अशा सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच अनधिकृत वाहतूक रोखण्यासाठी काही संवेदनशील मार्गांवर रस्त्यांवर नाले खोदण्याबाबतही निर्देश देण्यात…
एकात्मतेचे दर्शन : पदयात्रेत पायी चालणे एक प्रकारचे तप धानोरा ता. चोपडा ; येथून प्रेरणापीठ पिराणा (अहमदाबाद, गुजरात) येथे जाणाऱ्या पारंपरिक पदयात्रेला यंदा मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. धानोरा येथून सुरू झालेली ही पदयात्रा यंदा 17 व्या वर्षात प्रवेश करत असून 5 मार्च ते 19 मार्च या कालावधीत चालणार आहे.पदयात्रेचा शुभारंभ परमपूज्य महामंडलेश्वर श्री स्वामी जनार्दन हरिजी महाराज यांच्या हस्ते पालखी पूजन व धर्मध्वज पूजन करून करण्यात आला. परमात्म्याकडे स्वतः पायी चालत जाणे ही श्रद्धेची भावना मनात ठेवून धानोरा तसेच परिसरातील विविध गावांमधून आलेल्या भाविकांनी या पदयात्रेत उत्साहाने सहभाग नोंदवला. सर्व समाजातील स्त्री-पुरुष, तरुण-तरुणी तसेच अबालवृद्ध अशा सुमारे 60 भाविकांचा या…
कृषी उत्पन्न बाजार समिती ही तशी सुदृढ कृषी उत्पन्न बाजार समिती होय. “दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिये” ही म्हण खरी आहे. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही तशी सुदृढ कृषी उत्पन्न बाजार समिती होय. येथे आहे ती उत्पन्नाची साधने भरपूर असल्याने नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्स तयार करण्याची गरज नव्हती. परंतु ‘शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या बांधकामातून कमिशन खाता येते,’ या धर्तीवर कृषी उत्पन्न बाजार समितीची व्यापाऱ्यांची जागा कमी करून त्या जागेवर शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याचा घाट घालण्यात आला. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने ठराव करण्यात आला. पराग कन्स्ट्रक्शन कंपनीला टेंडर देण्यात आले. त्या कृषी उत्पन्न बाजार समितीला 5 कोटी 76 लाख रुपये पराग कन्स्ट्रक्शन कडून…

