Author: Nilesh Ajmera

मृत्यू अपघात दाखवून ५० लाखांचा विमा लाटण्याचा प्रयत्न; चार पोलिसांसह आठ जण अटकेत चाळीसगाव प्रतिनिधी – नैसर्गिक मृत्यू झालेल्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू दाखवून सुमारे ५० लाख रुपयांचा विमा मिळवण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे. या प्रकरणात मृताच्या कुटुंबीयांसह खोटा मृत्यू दाखला देणारे वैद्यकीय अधिकारी आणि सहकार्य करणारे चार पोलिस कर्मचारी अशा एकूण आठ संशयितांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे पोलिस विभागात मोठी खळबळ उडाली असून चाळीसगाव परिसरात विमा फसवणुकीचे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. चाळीसगाव तालुक्यातील दहिवद फाट्यावर राजेंद्र शालिंदर जाधव (रा. मालेगाव) यांचा १९ एप्रिल २०२५ रोजी अपघातात मृत्यू झाल्याची तक्रार मेहुणबारे पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. जाधव…

Read More

वेगवान वाहनांवर कारवाईची प्राणीमित्रांची मागणी भुसावळ प्रतिनिधी : साकेगाव परिसरात एक दुर्दैवी घटना घडली असून पाण्याच्या शोधात आलेल्या एका बलाढ्य नर निलगायचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरातील प्राणीमित्रांमध्ये हळहळ व्यक्त होत असून वेगवान वाहनांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साकेगावजवळील नदीकाठी पाण्याच्या शोधात आलेल्या नर निलगायला एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत निलगाय दूर फेकला गेला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती शहरातील गोसेवक बल्लू धायडे आणि रोहित महाले यांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व वनविभागाला याबाबत कळविले. या घटनेनंतर प्राणीमित्रांनी शासनाकडे गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे. गोसेवक रोहित महाले…

Read More

ठेकेदाराची मनमानी अन् अभियंत्यांचा आदेश धाब्यावर? जळगाव: जळगाव जिल्हा प्रशासनाकडून एकीकडे वृक्ष लागवडीचे दावे केले जात असताना, दुसरीकडे प्रत्यक्ष जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातच वृक्षांची पद्धतशीरपणे ‘नासाडी’ करण्याचा घाट घातला जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. येथील ऐतिहासिक ‘हेरिटेज’ इमारतीच्या अवतीभवती असलेल्या ३० ते ४० वर्षे जुन्या वृक्षांच्या मुळांभोवती चक्क सिमेंट काँक्रीटचे थर टाकले जात असून, यामुळे भविष्यात हे वृक्ष मोडून पडून मोठी जीवित वा वित्तहानी होण्याची भीती निर्माण झाली आहे. झाडे जगवण्यासाठी नाही, तर मारण्यासाठीच खटाटोप? जिल्हाधिकारी कार्यालयातील हेरिटेज इमारतीचे सौंदर्य वाढवणारी ही जुनी झाडे आता प्रशासकीय अनास्थेचे बळी ठरत आहेत. नियमानुसार झाडाच्या बुंध्याभोवती ठराविक जागा मोकळी ठेवणे बंधनकारक असते. मात्र, संबंधित ठेकेदाराने या झाडांच्या…

Read More

याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला जळगाव प्रतिनिधी । नशिराबाद येथील परकोट मोहल्ला येथे लहान मुलांच्या खेळण्याच्या कारणावरून कुटुंबातील चौघांना शिवीगाळ करत लाकडी काठीने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याबाबत शनिवारी ७ मार्च रोजी रात्री ११ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शेख अन्वरउल्ला शेख रूउल्ला वय ४५ रा. मनियार वाडा, नशिराबाद हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. सोमवारी २ मार्च रोजी रात्री ८ वाजता गावात लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून शेख अन्वरउल्ला व त्यांच्या पत्नी, मुलगा आणि पुतण्या यांना शरीनबी अफसर खान, अफसर खॉन शेर खॉन दोन्ही…

Read More

महाराष्ट्र शासनाने सादर केलेला यंदाचा अर्थसंकल्प हा सर्वसामान्य, शेतकरी आणि विकासाभिमुख असल्याची प्रतिक्रिया राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली. जळगांव : महाराष्ट्र शासनाने सादर केलेला यंदाचा अर्थसंकल्प हा सर्वसामान्य, शेतकरी आणि विकासाभिमुख असल्याची प्रतिक्रिया राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प सादर केला आहे. विशेषतः अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने जाहीर करण्यात आलेली शेतकऱ्यांसाठीची कर्जमाफी योजना हा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.यासोबतच सिंचन, जलसंपदा, पायाभूत सुविधा, शेती, उद्योग आणि ग्रामीण विकासासाठी…

Read More

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला. जळगाव प्रतिनिधी : जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चार महत्त्वाच्या संचालकांनी रविवारी नाशिक येथे राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला. या प्रवेशामुळे बाजार समितीमधील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून भाजपचे आता स्पष्ट बहुमत झाले आहे. या चार संचालकांच्या प्रवेशामुळे बाजार समितीमधील भाजपच्या संचालकांची संख्या आता १० वर पोहोचली आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये माजी सभापती लक्ष्मण गंगाराम पाटील, तथा (लकी टेलर) माजी उपसभापती राजू पाटील, संदीप पाटील आणि दिलीप पाटील यांचा समावेश आहे. या पक्षप्रवेशावेळी बाजार समितीचे विद्यमान सभापती सुनील…

Read More

एकलव्य क्रीडा संकुल येथे ८ मार्च रोजी सकाळी ८ वाजता या स्पर्धांना सुरुवात झाली. जळगाव प्रतिनिधी । आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जळगावात महिलांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येऊन उत्साहपूर्ण वातावरणात हा उपक्रम पार पडला. युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत भारतीय क्रीडा प्राधिकरण, मेरा युवा भारत केंद्र जळगाव तसेच जिल्हा क्रीडा कार्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ASMITA Khelo India’ उपक्रमांतर्गत या स्पर्धा घेण्यात आल्या. एम. जे. महाविद्यालयातील एकलव्य क्रीडा संकुल येथे ८ मार्च रोजी सकाळी ८ वाजता या स्पर्धांना सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या प्रारंभी गुरुवर्य प. वि. माध्यमिक शाळेच्या लेझीम पथकाने पारंपरिक पद्धतीने मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी खासदार स्मिता…

Read More

भुसावळ प्रतिनिधी । आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त भुसावळ नगरपालिकेत विविध सामाजिक आणि प्रेरणादायी उपक्रमांसह महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शहरातील कष्टकरी आणि कर्तृत्ववान महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला. महिलांच्या आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी सुमारे ५० लाख रुपयांचा निधी खर्चून अद्ययावत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची घोषणा नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांनी यावेळी केली. भुसावळ नगरपरिषदेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात शहरातील उपेक्षित आणि कष्टकरी अशा सुमारे तीनशे महिलांचा तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या निवडक महिलांचा सन्मान करण्यात आला. या सन्मानित महिलांमध्ये जयश्री काळवीट, चारूलता भालेराव, ॲड. भंडारी यांच्यासह अनेक महिलांचा समावेश होता. त्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना…

Read More

विकासकामे रखडली; नागरिकांचा आमदार सुरेश भोळेंना ‘अंत्ययात्रा आंदोलन’चा अल्टिमेटम जळगाव प्रतिनिधी । शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील विविध मूलभूत समस्यांवर अद्याप तोडगा न निघाल्याने स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. परिसरातील त्रस्त नागरिकांनी आमदार सुरेश दामु भोळे यांना निवेदन देत निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनांची आठवण करून दिली असून, 23 मार्च 2026 पर्यंत समस्यांचे निराकरण न झाल्यास अनोख्या पद्धतीने ‘अंत्ययात्रा आंदोलन’ करण्याचा इशारा दिला आहे. नुकत्याच पार पडलेल्या जळगाव महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकांच्या काळात आमदार सुरेश दामु भोळे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत रामेश्वर कॉलनी परिसरातील अनेक प्रलंबित प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्यापही या समस्यांवर ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप स्थानिक…

Read More

बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी घडली. भडगाव शहरालगतच्या गिरणा नदीपात्रात मुलांना वाचवण्याचा प्रयत्न करताना दोन जणांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी घडली. या घटनेमुळे भडगाव शहरासह परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये नदीम खान नसीम खान (वय 27) आणि काफिया शरीफ पिंजारी (वय 16) यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गिरणा नदीपात्रात काही मुले अडकल्याचे लक्षात येताच नदीम खान आणि काफिया पिंजारी यांनी धाडसाने नदीत उडी घेत मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. यावेळी जिहान आसिफ शेख (वय 8) आणि शगुफ्ता जब्बार शेख (वय 35) यांना नदीम खान यांनी सुरक्षित बाहेर काढले. मात्र काफिया पिंजारी याला…

Read More