Author: Nilesh Ajmera

गोपाला गोपाला देवकीनंदन गोपालाच्या गजरात संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी ! जळगाव | निष्काम कर्मचारी संत गाडगेबाबा यांचा जयंती उत्सव दिनांक २३ फेब्रुवारी सोमवार रोजी जळगाव जिल्हा परीट धोबी सेवा मंडळ व समाजातील सर्व समाज संस्था, संघटना व मंडळे यांचे संयुक्त विद्यमाने उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी संत गाडगेबाबा उद्यान येथून संत गाडगेबाबा यांच्या पुतळ्याचे पूजन महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, जिल्हा परीट धोबी सेवा मंडळाचे अध्यक्ष अरुण शिरसाळे, नगरसेवक सर्वश्री नितीन लढ्ढा,अरविंद देशमुख,कल्पेश सोनवणे, गणेश सोनवणे, दिपक सूर्यवंशी, अमर जैन, विशाल भोळे, विष्णू भंगाळे, निलेश तायडे, डॉ. विरेन खडके, उज्वला बेंडाळे, वैशाली पाटील व चेतन शिरसाळे, भूषण सोनवणे,…

Read More

महिनाभराच्या दहशतीनंतर ग्रामस्थांचा सुटकेचा निश्वास…! भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव खुर्द येथे गेल्या महिनाभरापासून एका बिथरलेल्या माकडाने उच्छाद मांडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या माकडाच्या हल्ल्यात सुमारे ३५ हून अधिक नागरिक जखमी झाले होते. अखेर वनविभागाच्या पथकाने तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर संबंधित माकडाला जेरबंद करून जंगलात सोडले. माहितीनुसार, सुमारे महिनाभरापूर्वी माकडांची एक टोळी गावात आली होती. त्यातील इतर माकडे निघून गेली; मात्र एक माकड गावातच थांबले. हे माकड आक्रमक बनून घरांच्या किचनमध्ये शिरणे, अन्नसामग्रीची नासधूस करणे तसेच एकट्या व्यक्तींवर हल्ला करणे असे प्रकार करत होते. या हल्ल्यांमध्ये अनेक नागरिक जखमी झाले असून एका व्यक्तीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती…

Read More

शेतात एका बिबट्याचा जाळ्यात अडकून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली सावदा, ता रावेर प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील मौजे सुदगाव शिवारात तापी नदीच्या काठालगत असलेल्या शेतात एका बिबट्याचा जाळ्यात अडकून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली असून घटनेची माहिती मिळताच वन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सहाय्यक वनसंरक्षक यावल समाधान पाटील वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर श्रीकांत काळे, मानद वन्यजीव रक्षक जळगाव रविंद्र फालक पशुधन विकास अधिकारी डॉ रणजीत पाटील डॉ स्नेहल मोटेगावकर डॉ प्रदीप काळे डॉ राधा रासवे तसेच वन्यजीव अभ्यासकअमन गुजर व वन कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी संबंधित बिबट मृत अवस्थेत असल्याचे पशुधन विकास अधिकाऱ्यांनी घोषित केले.…

Read More

महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. सत्ताधारी पक्षातर्फे आयोजित केलेल्या चहापाणीच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. सत्ताधाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन अधिवेशनात संदर्भात माहिती दिली. विरोधकांतर्फे कोंढवा जमीन प्रकरण, शेतकऱ्यांची कर्जमाफी हे प्रकरण गाजणार आहे. कोंढवा जमीन प्रकरणात खरगे समितीने पार्थ पवार यांना क्लीन चीट दिली आहे. त्यामुळे हे प्रकरण गाजणार आहे. सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. की खरगे समितीने पार्थ पवार यांना क्लीन चीट देऊ शकत नाही. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच तापले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बहुचर्चित शेतकरी कर्जमाफी हा मुद्दा या अधिवेशनात उचलला जाणार आहे. त्याला सत्ताधाऱ्यांकडून काय उत्तर…

Read More

इंटर्नशिपसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांच्या गटावर समुद्राने घाला घातला. जळगाव | करिअरची स्वप्ने डोळ्यांत साठवून महाराष्ट्रातून चेन्नई येथे नामांकित आयटी कंपनी Cognizant मध्ये इंटर्नशिपसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांच्या गटावर समुद्राने घाला घातला. शनिवारी (दि. २१) सुट्टीचा आनंद घेण्यासाठी समुद्रकिनारी गेलेल्या विद्यार्थ्यांपैकी एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक विद्यार्थी अद्याप बेपत्ता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना चेन्नईतील पाँडिचेरी रोडवरील गोल्डन बीच परिसरात घडली. महाराष्ट्रातील सुमारे १५ विद्यार्थ्यांचा गट येथे फिरण्यासाठी गेला होता. समुद्रकिनारी उसळणाऱ्या लाटांसोबत सेल्फी घेण्याच्या नादात असताना १० ते १५ फुटांची प्रचंड लाट उसळली आणि तिघांना खोल समुद्रात ओढून नेले. या दुर्घटनेत भंडारा जिल्ह्यातील मयुरी हरिश्चंद्र चौधरी (रा. वरठी, ता. मोहाडी, जि. भंडारा) हिचा मृत्यू झाला.…

Read More

वाशी तालुक्यातील तरुण जोडप्याचे लग्नाचे स्वप्न साकार होण्यापूर्वीच हादरवून टाकणारी घटना घडली जळगाव | वाशी तालुक्यातील तरुण जोडप्याचे लग्नाचे स्वप्न साकार होण्यापूर्वीच हादरवून टाकणारी घटना घडली आहे. आठ दिवसांपूर्वी साखरपुडा झालेल्या नववधू अक्षया सुनील चव्हाण (२३) आणि नवरा अक्षय रामभाऊ शिनगारे (२५) यांचा दुर्दैवी मृत्यू सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गावर, रत्नापूर पाटीजवळील वळणावर टोलवेच्या कमानीला कार धडकल्याने झाला. घटना रविवारी सकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, वाशी तालुक्यातील पारा येथील नामदेव शिनगारे यांचा मुलगा अक्षय आणि इजोरा (हालमुक्काम वाशी) येथील सुनील चव्हाण यांची मुलगी अक्षया यांचा गत रविवारी मांजरसुंबा येथील कन्हेया मंगल कार्यालयात साखरपुडा संपन्न झाला होता. त्यानंतर दोन्ही कुटुंबीयांनी उत्साहात…

Read More

महाराष्ट्रातील पाच खेळाडूंनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत राज्याचा आणि देशाचा मान उंचावला. जळगाव | जपान येथे आयोजित आंतरराष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेत भारतीय संघाने उल्लेखनीय सहभाग नोंदवला. या स्पर्धेत महाराष्ट्रातील पाच खेळाडूंनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत राज्याचा आणि देशाचा मान उंचावला. या खेळाडूंचा केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री ना. रक्षाताई खडसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्कारप्रसंगी खडसे यांनी खेळाडूंशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या अनुभवांची माहिती घेतली. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे प्रतिनिधित्व करणे ही अभिमानाची बाब असल्याचे सांगून त्यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. ग्रामीण भागातून पुढे येत आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचणे ही मोठी कामगिरी असल्याचेही त्यांनी नमूद केले. जपानमध्ये झालेल्या या स्पर्धेत भारतीय संघात महाराष्ट्रातील आशिष जगताप…

Read More

वरणगाव शहरातील समस्यांकडे महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष .मागण्या मान्य न झाल्यास शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा. वरणगाव प्रतिनिधी : वरणगाव शहर आणि परिसरातील महामार्गाशी संबंधित प्रलंबित प्रश्नांकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (NHAI) लक्ष वेधण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन, राजेंद्र चौधरी, विधानसभा प्रमुख संतोष माळी यांच्या सह सर्वच नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. महामार्गावरील त्रुटींमुळे नागरिकांना होणारा त्रास त्वरित दूर न झाल्यास ‘शिवसेना स्टाईल’ने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा त्यांनी एका निवेदनाद्वारे NHAI जळगाव कार्यालयाला दिला आहे. दिलेल्या निवेदनात समाधान महाजन आणि पदाधिकाऱ्यांनी वरणगाव परिसरातील पाच मुख्य मुद्द्यांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. मागण्या पुढील प्रमाणे आहेत. वरणगाव हे ५० हजार लोकसंख्येचे…

Read More

जळगाव येथे सामूहिक विवाह सोहळा उत्साहात आयोजित करण्यात आला होता. अखिल भारतीय लेवा पाटील संघाच्यावतीने लेवा पाटीदार समाजाच्या रविवार, २२ फेब्रुवारी रोजी मिराई लॉन, जळगाव येथे सामूहिक विवाह सोहळा उत्साहात आयोजित करण्यात आला होता. सामूहिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात व पारंपरिक वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यात एकूण १९ वधू-वरांनी विवाहबंधनात अडकत नव्या आयुष्याची सुरुवात केली. कार्यक्रमाची सुरुवात मंगलाष्टक व वेदघोषाने झाली. सर्व विवाहविधी पारंपरिक पद्धतीने सजवलेल्या १० बैलगाड्यांनी दिमाखात आणि शिस्तबद्धरित्या पार पाडण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील नवनिर्वाचित महापौर, नगरसेवक यांचा सत्कार देखील करण्यात आला. समाजबांधव, नातेवाईक व मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत भव्य स्वरूपात पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख स्वागत…

Read More

पंढरपूर तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. पंढरपूर तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने सासूला विष पाजण्याचा कट रचला, मात्र या घटनेत तिचा पती समोनाथ लोहार दुर्दैवी मृत्युमुखी पडला. पोलिसांनी मृत समोनाथ लोहार यांची पत्नी सारिका लोहार आणि तिचा प्रियकर शेखर चंदनशिवे यांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेने संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिस तपासानुसार, सारिका आणि शेखर यांच्यात अनैतिक प्रेमसंबंध होते, ज्याला समोनाथ लोहार यांची सासू विरोध करत होती. यामुळे पत्नीने शेखरच्या सूचनेनुसार १० जानेवारी २०२६ रोजी सकाळी सातच्या सुमारास शेतात भेट घेऊन पांढऱ्या रंगाचे विषारी औषध अर्धवट भरलेल्या बिस्लरीच्या बाटलीत घेतले. रात्री आठच्या सुमारास घरात कोणीही…

Read More