संविधान चषकाचे उद्घाटन संपन्न… भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – दीपनगर येथील राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजनिक संयुक्त जयंती उत्सवानिमित्त दिनांक 01/04/ 2026 रोजी सायंकाळी 6:30 वाजता प्रभारी मुख्य अभियंता राजेश कुंभार साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कुंभार साहेबांनी उपस्थित सर्व खेळाडूना शुभेछा दिल्या व जयंती निमित्त सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण केले… कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणुन उपमुख्य अभियंता वैशाली पाटील मॅडम अधिक्षक अभियंता संजय पखान , विजय पांढरपट्टे उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मुकेश मेश्राम वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत जाधव कार्यकारी अभियंता महेश तांबे , गोविंद मुंडे,…
Author: Nilesh Ajmera
मदरसा नूरुल इस्लाम येथे साधेपणात निकाह; साखरपुड्यातच उरकला विवाह सोहळा चाळीसगाव प्रतिनिधी : शहरातील मदरसा नूरुल इस्लाम येथे दिनांक ४ एप्रिल रोजी पार पडलेल्या साखरपुडा कार्यक्रमातच निकाह विधी पूर्ण करून एक आदर्श विवाह सोहळा पार पडला. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर दोन्ही कुटुंबीयांनी परस्पर चर्चेतून साधेपणाने विवाह करण्याचा निर्णय घेतला. या सोहळ्यात अकदस अफरोज खान (कालू खान) व मुब्बशिरा शेख (मुश्ताक शेख गफ्फार यांची कन्या) यांचा निकाह संपन्न झाला. धार्मिक विधी हाफिज जावेद साहेब इशाती (इमाम, मस्जिद अबू हनीफा) व हाफिज अब्दुल अजीज साहेब (इमाम, मक्का मस्जिद) यांच्या उपस्थितीत पार पडले.विशेष म्हणजे, साखरपुड्याच्या कार्यक्रमातच शरबत देऊन विवाह सोहळा उरकण्यात आला, ज्यामुळे हा…
बाजाराच्या वार्षिक लिलावावेळी मोठा गोंधळ उडाला भुसावळ प्रतिनिधी : भुसावळ तालुक्यातील कुऱ्हा पानाचे गावात ग्रामपंचायतीच्या आठवडा बाजाराच्या वार्षिक लिलावावेळी मोठा गोंधळ उडाला असून, दारूच्या नशेत आलेल्या काही इसमांनी थेट लिलाव प्रक्रियेत हस्तक्षेप करत अधिकाऱ्यांसमोरच मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ग्रामपंचायत अधिकारी राहुल अरुण चौधरी यांच्या आदेशानुसार १ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता ग्रामपंचायत आवारात लिलाव प्रक्रिया सुरू होती. यावेळी प्रशासक दुर्गाबाई सुरेश शिंदे, सदस्य जीवन प्रल्हाद पाटील, दत्तू जानकीराम बाविस्कर आणि किशोर अरुण कोळी उपस्थित होते. दरम्यान, सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास स्वानंद त्र्यंबक पालोदे, सागर रामचंद काकडे व एक अनोळखी इसम दारूच्या नशेत लिलावस्थळी दाखल झाले. “अतिक्रमण का…
‘जातीभेद गाडून हिंदू म्हणून संघटित व्हा!’ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून पाचोरा तालुक्यातील लोहारा येथे ‘विराट हिंदू धर्म संमेलना’चे भव्य आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात उपस्थित हजारो हिंदू बांधवांना संबोधित करताना संतांनी हिंदू धर्माची श्रेष्ठता आणि भविष्यातील आव्हानांवर परखड विचार मांडले. यावेळी ‘जातीभेद दूर करून एकसंध हिंदू म्हणून जगणे हीच काळाची गरज आहे’, असा सूर उमटला. कार्यक्रमाची सुरुवात संतांच्या भव्य स्वागताने आणि ‘वंदे मातरम्’च्या जयघोषाने झाली. या संमेलनाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून पूजनीय महामंडलेश्वर जनार्दनहरी महाराज (निष्कलंक धाम, फैजपूर मठाधिपती) उपस्थित होते. मंचावर पूजनीय येळमकर बाबा (महानुभाव अंबेवडगाव), पूजनीय आत्मारानंदजी महाराज (वृंदावन धाम), हभप योगेश महाराज, पूजनीय श्री…
वादळाने झाड कोसळले; महिला थोडक्यात बचावली येथे गेल्या दोन दिवसापासून वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस पडतो आहे. या दरम्यान दि. २ रोजी रोजी सायंकाळी झालेल्या वादळामुळे साकळी येथील चावडी परिसरातील दत्त मंदिराजवळील भले मोठे उंबराचे झाड अचानक मुळासकट उन्मळून जमिनीवर पडले. या घटनेत मंदिरात देवाचे दर्शन घेत असलेल्या महिला सौ. रोहिणी योगेश नेवे (वय ४५) या सुदैवाने थोडक्यात बचावल्या आहे. त्या मंदिर ठिकाणी एकट्याच भाविक उपस्थित होत्या. सदर घटना सायंकाळी ७ वाजेदरम्यान घडली आहे. ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रचिती या घटनेवरून आला आहे. सौ. रोहीणी नेवे या पशुवैद्यकिय कर्मचारी वाय. जी. नेवे यांच्या पत्नी आहे. ज्या मंदिर…
अश्लील व्हिडिओ, फोटो व्हायरल करण्याची धमकी नाशिक येथील सातपूर परिसरात अश्लील व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत 12 लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या टोळीचा सातपूर पोलिसांनी अवघ्या पाच तासांत पर्दाफाश करत चार पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहे. ज्येष्ठ नागरिक असलेल्या फिर्यादीच्या तक्रारीनुसार संशयित आरोपींनी फिर्यादीचा एक टॅब चोरी करून त्यामधील मैत्रीणीसोबतचे वैयक्तिक आणि संवेदनशील अश्लील व्हिडिओ आणि फोटो मिळवले. त्यानंतर हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत 12 लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यातील दहा हजार रुपये नुकतेच देण्यात आले होते. तर गुरुवारी (दि.2) सायंकाळी 50 हजार रुपये देण्याचे ठरले होते. मात्र संशयित टोळी पैसे स्वीकारतानच पोलिसांच्या हाती…
जळगावसह खान्देशातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. जळगाव । जळगावसह खान्देशातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. पश्चिम रेल्वेच्या सुरात रेल्वे स्टेशनवर सुरू असलेल्या मोठ्या पायाभूत सुविधांच्या कामांमुळे काही महत्त्वाच्या मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. यामध्ये जळगाव, भुसावळ मार्गे धावणाऱ्या अप/डाऊन सुरत-अमरावती एक्स्प्रेसचा समावेश आहे. रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 20925 सुरत–अमरावती सुपरफास्ट एक्स्प्रेस ही 2 ते 26 एप्रिल 2026 दरम्यान सुरतऐवजी उधना स्थानकावरूनच सुटणार आहे. तसेच गाडी क्रमांक 20926 अमरावती–सुरत सुपरफास्ट एक्स्प्रेस ही 30 मार्च ते 27 एप्रिल 2026 या कालावधीत सुरतपर्यंत न जाता उधना येथेच प्रवास समाप्त करणार आहे. यामुळे खान्देश आणि विदर्भाकडे…
पोलीस वर्दीतली गुंडगिरी आणि असंवेदनशील सरकारवर डागली तोफ; शिंदेंचे आमदार भाजपच्या वाटेवर असल्याचा खळबळजनक दावा जळगाव: लोकसभेच्या रणधुमाळीसाठी संघटनात्मक बांधणीच्या निमित्ताने जळगावात आलेल्या खासदार संजय राऊत यांनी आज राज्य सरकार आणि जळगावच्या पालकमंत्र्यांवर जोरदार हल्ला चढवला.”जिल्ह्यात अवकाळीने शेती उद्ध्वस्त झाली असताना ‘संकटमोचक’ म्हणवून घेणारे नेते कुठे आहेत? हे फक्त राजकीय संकटे सोडवणारे आणि पक्ष फोडणारे संकटमोचक आहेत का?” असा बोचरा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. जळगाव जिल्ह्यात सध्या ‘पोलीस वर्दीतली गुंडगिरी’ सुरू असून सत्ताधारी विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी पोलिसांचा गैरवापर करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार ‘ठार’ असंवेदनशील जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र,…
११ तालुक्यांतील ४३० गावांत अवकाळीचा ‘धुमाकूळ’; १३ हजार शेतकऱ्यांची स्वप्ने मातीमोल जळगाव प्रतिनिधी :जळगाव जिल्ह्यावर पुन्हा एकदा अस्मानी संकट धावून आले असून, २ एप्रिल रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जिल्ह्याच्या शेतीचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. जिल्ह्यातील ११ तालुक्यांमधील ४३० गावांमध्ये निसर्गाचा हाहाकार पाहायला मिळाला असून, तब्बल १३,४६६ शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. प्राथमिक अंदाजानुसार, ८,४९०.४१ हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, बळीराजा पुन्हा एकदा संकटाच्या खाईत लोटला गेला आहे. २ एप्रिल रोजी झालेल्या वादळी पावसादरम्यान. अवकाळी पाऊस आणि वेगवान वादळी वारा. जळगाव जिल्ह्यातील १३,४६६ शेतकरीचे ८,४९० हेक्टरवरील विविध पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून जळगाव भुसावळ यावल…
आधी मालवाहू वाहन चोरले, मग दोरखंडाच्या साहाय्याने ६ मिनिटांत एटीएम उपटले; पोलन पेठ परिसरातील घटना. जळगाव : शहराच्या मध्यवर्ती आणि गजबजलेल्या पोलन पेठ परिसरात गुरुवारी मध्यरात्रीनंतर घडलेल्या धाडसी चोरीच्या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. अज्ञात चोरट्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने एका बँकेचे एटीएम मशीन उखडून नेऊन त्यातील सुमारे सात लाख रुपयांची रोकड लंपास केली. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धाडसी चोरीमागे चोरट्यांचा पूर्वनियोजित कट असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. गुरुवारी मध्यरात्रीनंतर साधारण एक वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी प्रथम जोशी पेठ परिसरातून एक मालवाहू वाहनाची चोरी केली. हे वाहन चोरी करून त्यांनी थेट पोलन…

