मोराळे यांच्याकडे कोराडी प्रशिक्षण केंद्राच्या मुख्य अभियंता पदाची सूत्रे देण्यात आली आहेत. दीपनगर प्रकल्पातील मुख्य अभियंता राजेश मोराळे हे अवघ्या दहा महिन्यांपूर्वीच रूजू झाल्यानंतर त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी मुंबई मुख्यालयातून विराज चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर मोराळे यांच्याकडे कोराडी प्रशिक्षण केंद्राच्या मुख्य अभियंता पदाची सूत्रे देण्यात आली आहेत. दरम्यान, पंकज सपाटे यांच्याकडून कार्यकारी संचालक एक हा पदभार काढून घेण्यात आला असून त्यांच्याकडे आता केवळ कार्यकारी संचालक (इंधन) हा एकमेव पदभार आहे. दहा महिन्यातच मोराळे यांची बदलीमुख्य अभियंता राजेश मोराळे यांनी 31 मे 2025 रोजी भुसावळ (दीपनगर केंद्र) मुख्य अभियंता म्हणून पदभार घेतला होता व…
Author: Nilesh Ajmera
अपघात घडून एका तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. चाळीसगाव प्रतिनिधी : तालुक्यातील दसेगाव फाट्याजवळ दि. २ एप्रिल रोजी दुपारी भीषण अपघात घडून एका तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. भरधाव वाळूने भरलेल्या डंपरने ऍक्टिव्हा दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात डी. फार्मसीचे शिक्षण घेत असलेली चंचल नामदेव लांडगे अंदाजे वय( १९ )हिचा जागीच मृत्यू झाला. तिच्यासोबत असलेली मैत्रीण वैष्णवी वैभव चौधरी अंदाजे वय (१९) गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.घटनेनंतर परिसरात मोठी…
वारंवार तक्रार करूनही वाकलेला पोल हटवला नाही; पाडळसेच्या सहाय्यक अभियंत्यांची उद्धट उत्तरे, आमदार अमोल जावळेंचा हस्तक्षेप भुसावळ प्रतिनिधी : भोरटेक (ता. यावल) येथील शेळीपालक अनिल अर्जुन कोळी यांच्या गोठ्यात महावितरणच्या झुकलेल्या पोलमुळे वीज प्रवाह उतरून ५ शेळ्या जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना २ एप्रिल रोजी सकाळी घडली. या दुर्घटनेत कोळी यांचे अंदाजे २ लाख रुपयांचे नुकसान झाले असून, अवघ्या १५ मिनिटांच्या फरकाने त्यांचा भाचा थोडक्यात बचावला आहे. विशेष म्हणजे, संबंधित पोल हटवण्यासाठी वर्षभरापासून मागणी करूनही महावितरणने त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही जीवितहानी ओढवली आहे. नेमकी घटना काय?दिनांक १ एप्रिल रोजी रात्री पाडळसे-भोरटेक शिवारात वादळी पाऊस झाला. या वादळात अनिल कोळी यांच्या घराशेजारील महावितरणचा…
वार्षिक पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. भुसावळ प्रतिनिधी :येथील बियाणी मिलिटरी स्कूल मध्ये वार्षिक पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बियाणी एज्युकेशन ग्रुपचे अध्यक्ष मनोज बियाणी तर प्रमुख अतिथी म्हणून भुसावळ येथील जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर आर खंडारे,बियाणी एज्युकेशन ग्रुपच्या सचिव डॉ.संगीता बियाणी,कार्यकारी संचालिका स्मिता बियाणी,प्रवीण भराडीया उपस्थित होते. दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी प्रथम स्वागत गीत सादर केले. मान्यवरांच्या हस्ते विविध शैक्षणिक व शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये गुणवंत प्राप्त अशा पाचशे विद्यार्थ्यांना प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षीस व सर्टीफिकेट वितरण करण्यातआले.याप्रसंगी बियाणी एज्युकेशनच्या विविध संस्थांचे प्राचार्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे…
वायर चोरीप्रकरणी साक्री येथील भंगार दुकानदाराला पोलिसांनी अटक केली आहे. चाळीसगाव प्रतिनिधी : तालुक्यातील बोढरे शिवारातील जेबीएम सोलर प्लांटमधून सुमारे ३ लाख २० हजार रुपये किमतीची केबल वायर चोरीप्रकरणी साक्री येथील भंगार दुकानदाराला पोलिसांनी अटक केली आहे.या प्रकरणात यापूर्वी धुळे जिल्ह्यातील दोन संशयितांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीत चोरीची केबल वायर साक्री येथील भंगार विक्रेत्यास विक्री केल्याची कबुली मिळाल्यानंतर पोलिसांनी सुलतान नुरा शाह (रा. नुरानी मस्जिदजवळ, साक्री, जि. धुळे) याला ताब्यात घेतले. माहितीनुसार, १९ मार्च रोजी सायंकाळी ७ ते २० मार्च रोजी सकाळी ८ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी जेबीएम सोलर प्लांटमधून सुमारे ८ हजार मीटर लांबीची पॉलीकॅब कंपनीची काळ्या रंगाची केबल…
रावेरमध्ये आधुनिक केळी शेती व मूल्यवर्धन प्रक्रियेची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी भुसावळ प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्याची ओळख असलेल्या केळी पिकाच्या आधुनिक लागवड पद्धती तसेच निर्याताभिमुख मूल्यसाखळी प्रक्रियेची माहिती घेण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी रावेर तालुक्यातील अटवाडे येथे प्रगतशील शेतकरी वरुण अग्रवाल यांच्या केळी बागेला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. या क्षेत्रभेटीद्वारे केळी शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, उत्पादनाची गुणवत्ता वाढविण्यासाठी केलेले प्रयोग तसेच कापणीपश्चात व्यवस्थापनाची प्रक्रिया यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी केळी लागवडीमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक मल्चिंग, गादीवाफा (Raised Bed) पद्धत, योग्य लागवड अंतर, तसेच दर्जेदार आणि निर्यातक्षम उत्पादन मिळण्यासाठी वापरले जाणारे ‘बड इंजेक्शन’ तंत्रज्ञान याविषयी सविस्तर माहिती घेतली. आधुनिक मशागत तंत्रज्ञानाचा…
१३ एप्रिलला धरणे आंदोलनाचा इशारा. यावल प्रतिनिधी : यावल तालुक्यातील भुसावळ–न्हावी रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामात परवानगीशिवाय मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वनविभागाकडे तक्रार अर्ज दाखल झाल्यानंतर चौकशी करण्यात आली असून संबंधितावर कारवाई करत एकूण २० झाडांच्या तोडीबाबत २० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी, यावल पूर्व कार्यालयाच्या वतीने करण्यात आली आहे.भीम आर्मी जळगाव जिल्हा अध्यक्ष गणेश सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली,भीम आर्मी चे जिल्हाप्रसिद्धी प्रमुख राहुल मंगलाबाई लक्ष्मण जयकर यांनी दि. ६ जानेवारी २०२६ रोजी तक्रार अर्ज सादर केला होता. वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार चौकशी अधिकारी व वनपाल यांनी प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर केला. अहवालात…
दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन जळगाव । दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अल्पबचत सभागृहात आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांनी दिली आहे. तरी नागरिकांनी यापूर्वी तालुका लोकशाही दिनात अर्ज केलेला असेल आणि सदरहू अर्जासंबंधी एका महिन्याच्या आत तालुकास्तरावरुन कोणतेही उत्तर मिळालेले नसेल अशाच वैयक्तिक हितसंबधाबाबतच्या तक्रारी घेऊन या लोकशाही दिनी उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. नागरिकांचा वेळ, प्रवासाचा खर्च व श्रम वाचावेत यासाठी जिल्हा प्रशासनाने अर्ज नोंदणी प्रक्रिया अधिक…
कचरा टाकणाऱ्यांवर थेट दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. जळगाव । शहर स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी महापालिकेने नियम अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला असून रस्त्यावर अनधिकृत कचरा टाकणाऱ्यांवर थेट दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. यासाठी किमान २ हजार रुपयांचा दंड आकारण्याची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. तसेच शहरातील पाळीव कुत्र्यांच्या नोंदणीसाठी परवाना घेणे बंधनकारक करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. जळगाव महापालिकेची पहिली सभा पार पडली. यादरम्यान, महापौर दीपमाला काळे यांनी १० महत्त्वाच्या सुधारणांचा प्रस्ताव सादर केला असून, यात अनधिकृत कचरा फेकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईपासून ते पाळीव प्राण्यांच्या परवान्यापर्यंतच्या धोरणात्मक निर्णयांचा समावेश आहे. शहरातील रस्ते आणि महामार्गाच्या कडेला ‘वेस्ट मटेरिअल’ किंवा कचरा…
चालक ठार : अन्य दोघे किरकोळ जखमी जळगाव ते पाचोरा रस्त्यावरील नांद्रा गावाजवळील एका वळणावर चारचाकी वाहनाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात कार चालकाचा मृत्यू झाल्याची घटना ३१ मार्च रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे तालुकाप्रमुख विनोद तावडे यांचेसह ग्रामस्थांनी मदत कार्य करुन जखमी असलेल्या चालकास नांद्रा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता त्यास मृत घोषित केले. अमित तायडे (वय – २५ वर्ष) रा. छत्रपती संभाजी नगर हे पत्नी व त्यांची १० वर्षाची भाची यांचेसह चारचाकी (क्रं. एम. एच. २० सी. एन. ९३३३) ने जळगावच्या दिशेने पाचोऱ्याकडे येत होते. दरम्यान पाचोरा तालुक्यातील नांद्रा गावानजीक बंधुराज हाॅटेल समोरील…

