जळगाव प्रतिनिधी | जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत आज एक अत्यंत महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या (४ जून) शेवटच्या दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत तब्बल १२ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता निवडणुकीचे चित्र पूर्णपणे स्पष्ट झाले असून, रिंगणात केवळ ४ उमेदवार आमनेसामने ठाकले आहेत. या लक्षवेधी निवडणुकीसाठी एकूण १६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. पक्षांतर्गत बंडखोरी आणि रणनीतीचा भाग म्हणून आज विविध राजकीय पक्षांच्या अधिकृत व डमी उमेदवारांनी माघार घेतली. यामध्ये अजित पवार गटाचे आसिफ मोहम्मद, सुनील जंगले आणि प्रवीण पाटील; ठाकरे गटाचे निलेश चौधरी; तसेच शिंदे गटाचे दीपक धांडे…
Author: Editorial Desk
जळगाव प्रतिनिधी | शहरातील अत्यंत वर्दळीचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामानंदनगर भागातील गिरणा टाकी ते चर्च दरम्यान रात्रीच्या सुमारास एक ‘हिट अँड रन’चा थरारक प्रकार समोर आला आहे. एका अवघ्या १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने चालवलेल्या भरधाव कारने रस्त्यावरील तब्बल ९ जणांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोन दाम्पत्यांसह एक तरुण, असे एकूण पाच जण गंभीर जखमी झाले असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित अल्पवयीन कारचालकाचे कारवरील नियंत्रण अचानक सुटले. नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव वेगाने जाणाऱ्या या कारने रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना आणि वाहनांना एकापाठोपाठ एक अशी जोरदार धडक दिली. यामध्ये एका इलेक्ट्रिक दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणालाही कारने उडवले, ज्याच्या…
भुसावळ प्रतिनिधी | भुसावळ शहर परिसरात घडलेल्या एका गंभीर खुनाच्या प्रकरणातील ०३ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अवघ्या २४ तासांच्या आत अटक केली आहे. या धडक कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये चांगलीच धडकी भरली आहे. भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादीला कोणत्याही कारणाशिवाय बेकायदेशीर जमाव जमवून लोखंडी रॉड आणि चॉपरने वार करून गंभीर दुखापत करण्यात आली होती. तसेच फिर्यादीच्या पत्नीला गावठी कट्टा दाखवून, “कोणाला फोन केला तर गोळी घालीन,” अशी धमकीही देण्यात आली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून जळगावचे पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल…
जळगाव प्रतिनिधी | भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेली मोठी घरफोडी अवघ्या १२ तासांच्या आत उघडकीस आणण्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी नागपूर येथून परराज्यातील ३ अट्टल आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीला गेलेला १६ लाख ३४ हजार रुपये किमतीचा सोन्या-चांदीचा ऐवज आणि रोख रक्कम हस्तगत केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ येथील फिर्यादी ३१ मे रोजी कामानिमित्त बाहेर गेले असताना, अज्ञात चोरांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास करून चोरटे पसार झाले होते. १ जून रोजी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, घटनेचे गांभीर्य ओळखून…
जळगाव प्रतिनिधी | तरुण पिढीला तंबाखू आणि निकोटीनच्या फसव्या आकर्षणापासून दूर ठेवण्याच्या उद्देशाने येथील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय येथे एक विशेष पाऊल उचलण्यात आले. महाविद्यालयाचे आदरणीय अधिष्ठाता डॉ. जगदीशचंद्र वाथर यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली ०३ जून रोजी महाविद्यालयात एका विशेष घोषवाक्य स्पर्धेचे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी “आकर्षणामागचे सत्य: निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनाचा प्रतिकार” हा अत्यंत महत्त्वपूर्ण विषय ठेवण्यात आला होता. आजच्या धावपळीच्या आणि आधुनिक जीवनशैलीत तरुण पिढी नकळतपणे विविध व्यसनांच्या आहारी जात आहे. या पार्श्वभूमीवर, तंबाखू आणि निकोटीनच्या सेवनाने आरोग्यावर होणारे गंभीर व जीवघेणे दुष्परिणाम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू होता. या स्पर्धेत महाविद्यालयातील…
जळगाव प्रतिनिधी | राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागामार्फत ग्रामीण भागाचा कायापालट करण्यासाठी आणि गावांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी गेल्या वर्षभरापासून ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ प्रभावीपणे राबविले जात आहे. या अभियानांतर्गत ग्रामीण भागात निर्माण करण्यात आलेल्या पायाभूत सुविधा, राबविण्यात आलेले विविध नावीन्यपूर्ण उपक्रम आणि झालेल्या एकूणच विकासकामांच्या मूल्यमापनासाठी एक उच्चस्तरीय तपासणी पथक जळगाव जिल्ह्यात दाखल झाले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी एम यांच्या अध्यक्षतेखालील या पथकात उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. हे पथक जळगाव जिल्ह्यात चार दिवस मुक्कामी असून, विविध तालुक्यांमधील गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन कामांची कसून पाहणी करत आहे. या दौऱ्याच्या सुरुवातीला,…
जळगाव प्रतिनिधी | धुळे-सुरत महामार्गावर एसटी महामंडळाच्या दोन बसेसचा अत्यंत भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण अपघातात ७ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला असून, एसटी बसचे चालकही यात दगावले आहेत. याशिवाय ३३ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जामनेर बस स्थानकातून सकाळी साडेसात वाजता निघालेली जामनेर-सुरत एसटी बस दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास गुजरात मधील बारडोली जवळ आली असता हा अपघात झाला. अपघातानंतर एसटी बसने अचानक पेट घेतला, ज्यामुळे ही दुर्घटना अधिक भीषण झाली.या दुर्घटनेनंतर जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी तातडीने सूत्रे हलवली आहेत. जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातामध्ये कुऱ्ह (ता. भुसावळ) येथील रहिवासी असलेल्या एसटी बस चालकाचा मृत्यू झाला आहे.…
जळगाव प्रतिनिधी | जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तसेच त्यांच्या सुरक्षितता व कल्याणासाठी जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत आज एसपी कार्यालयात एक विशेष संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती. जिल्ह्यात प्रथमच अशा स्वरूपाचा अभिनव उपक्रम राबवण्यात आल्याने, उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी या उपक्रमाचे उत्स्फूर्त स्वागत केले. या बैठकीदरम्यान पोलीस अधीक्षकांनी ज्येष्ठ नागरिकांशी थेट संवाद साधला. यामध्ये प्रामुख्याने एकटे राहणाऱ्या ज्येष्ठांची सुरक्षा, मालमत्तेचे वाद, कौटुंबिक समस्या, आरोग्याची आपत्कालीन परिस्थिती आणि परिसरातील सुरक्षा व्यवस्था यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सध्या वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांतर्फे विशेष मार्गदर्शन करण्यात आले. बँक अधिकारी किंवा सरकारी अधिकारी असल्याचे भासवून होणारी फसवणूक, केवायसी (KYC) अपडेट,…
जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यातील एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या आवारात गेल्या अनेक वर्षांपासून बेवारस स्थितीत पडून असलेल्या १० दुचाकी वाहनांची विल्हेवाट लावण्यासाठी पोलीस प्रशासनाने पावले उचलली आहेत. या वाहनांचा जाहीर लिलाव करण्यापूर्वी मूळ मालकांना शोधण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी २ जून रोजी एक अधिकृत जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. संबंधित वाहनधारकांनी पुढील ६० दिवसांच्या (२ महिने) आत योग्य पुराव्यांसह आपल्या वाहनांवर मालकी हक्क सिद्ध करावा, असे आवाहन याद्वारे करण्यात आले आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडलेल्या या बेवारस वाहनांच्या मूळ मालकांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आतापर्यंत सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र, अद्याप कोणीही या वाहनांवर आपला हक्क सांगण्यासाठी किंवा दावा दाखल करण्यासाठी पुढे…
जळगाव प्रतिनिधी |:व अमळनेर येथील अवघ्या तीन महिन्यांच्या एका बालिकेवर जळगावच्या डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील तज्ज्ञांनी यशस्वी उपचार करून तिला नवजीवन दिले आहे. गंभीर अवस्थेत व्हेंटीलेटरवर दाखल झालेल्या या चिमुरडीची प्रकृती १० दिवसांच्या अथक उपचारांनंतर आता पूर्णपणे धोक्याबाहेर आहे. अमळनेर येथील मोनीस हारून शेख यांच्या तीन महिन्यांच्या बालिकेला तीव्र ताप आणि वारंवार झटके येत असल्याने धुळे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तिची स्थिती चिंताजनक बनल्याने तिला कृत्रिम श्वासोच्छ्वास यंत्रणेवर (व्हेंटीलेटर) ठेवून पुढील उपचारांसाठी डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात हलविण्यात आले. रुग्णालयातील एनआयसीयू व पीआयसीयू विभागाचे तज्ज्ञ डॉ. सुयोग तन्नीरवार आणि डॉ. उमाकांत अणेकर यांनी तात्काळ बालिकेची…

