पहाटे ३ वाजता श्री सिद्धेश्वर हनुमानाचे दर्शन; हजारो भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग जळगाव : जय भद्रा बहुउद्देशीय संस्था (पैलवान हुप ग्रुप) यांच्या वतीने आयोजित जळगाव ते श्री सिद्धेश्वर हनुमान शिरसाळा पदयात्रा आज पहाटे ३ वाजता यशस्वीरीत्या पूर्ण झाली. संपूर्ण पदयात्रा अत्यंत नियोजनबद्ध, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. चैत्र शुद्ध १३, दिनांक ३१ मार्च २०२६ रोजी सकाळी जळगाव येथून प्रारंभ झालेली ही पदयात्रा विविध गावांमधून मार्गक्रमण करत अखेर श्री क्षेत्र शिरसाळा येथे पोहोचली. यात्रेदरम्यान भाविकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. ही पदयात्रा केवळ धार्मिक उपक्रम न राहता सामाजिक जनजागृतीचा संदेश देणारी ठरली. यावर्षी ऊर्जा व इंधन बचतीबाबत जनजागृती, अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन,…
Author: Nilesh Ajmera
कंपनीविरोधात कारवाईची मागणी; सहकाऱ्यांकडून अश्रुपूर्ण श्रद्धांजली जळगाव – महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन जळगाव युनिटच्या वतीने स्वर्गीय अजितेश यांच्या दुर्दैवी निधनाच्या निषेधार्थ कँडल मार्च काढण्यात आला.शहरातील काव्य रत्नावली चौक येथे आयोजित या कँडल मार्चमध्ये मोठ्या संख्येने मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. हातात मेणबत्त्या घेऊन शांततेत निषेध व्यक्त करत सर्वांनी स्व. अजितेश यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी उपस्थितांनी औषध कंपन्यांमधील वाढता टार्गेटचा ताण, मानसिक दबाव आणि कामाच्या कठीण अटी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी संबंधित कंपनीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. MSMRA च्या वतीने…
सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात तब्बल ८३४ कोटी ६१ लाख ८९ हजार रुपयांचा निधी शंभर टक्के खर्च करून जिल्ह्याने सलग चौथ्या वर्षी हा विक्रम कायम ठेवला आहे. जळगाव प्रतिनिधी । जिल्हा वार्षिक योजना निधीच्या प्रभावी नियोजन आणि काटेकोर अंमलबजावणीमुळे जळगाव जिल्ह्याने पुन्हा एकदा राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात तब्बल ८३४ कोटी ६१ लाख ८९ हजार रुपयांचा निधी शंभर टक्के खर्च करून जिल्ह्याने सलग चौथ्या वर्षी हा विक्रम कायम ठेवला आहे. जिल्हा नियोजन समिती अंतर्गत सर्वसाधारण, अनुसूचित जाती आणि आदिवासी घटक योजनेतील निधीचा शंभर टक्के वापर करण्यात प्रशासनाला यश आले आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली…
घनकचरा डंपिंग ग्राऊंडच्या समस्यांवर अखेर निर्णायक हालचाल सुरू झाली आहे. जळगाव प्रतिनिधी । शहराच्या स्वच्छता आणि आरोग्याशी थेट संबंध असलेल्या आव्हाणे शिवारातील घनकचरा डंपिंग ग्राऊंडच्या समस्यांवर अखेर निर्णायक हालचाल सुरू झाली आहे. महापौर दीपमाला काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत रखडलेली कामे तात्काळ मार्गी लावण्याचे आदेश देण्यात आले असून, कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या बैठकीत कचरा डेपोतील कंपाऊंड वॉल, रॅम्प आणि अंतर्गत रस्त्यांच्या कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रशासकीय दिरंगाई आणि तांत्रिक अडचणींमुळे ही कामे दीर्घकाळ रखडली होती. शहरात उघड्यावर साचणाऱ्या कचऱ्यामुळे दुर्गंधी आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होत असल्याने नागरिकांकडून तक्रारी वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर ही…
‘कलासंगम’ या बहुप्रतिक्षित सांस्कृतिक महोत्सवांचा दिमाखदार समारोप उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. जळगाव प्रतिनिधी । शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथे आयोजित ‘कारवां-२०२६’ आणि ‘कलासंगम’ या बहुप्रतिक्षित सांस्कृतिक महोत्सवांचा दिमाखदार समारोप उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सात दिवस चाललेल्या या भव्य सोहळ्यात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत कला, सर्जनशीलता आणि सामाजिक जाणीवेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. १९ ते २५ मार्च २०२६ दरम्यान आयोजित या महोत्सवाचे उद्घाटन प्रभारी प्राचार्य डॉ. एस. टी. वग्गे यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख अतिथी दीपक चांदोरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. सुरुवातीपासूनच कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. पहिल्या दिवशी Open Mic, Poetry, Fishpond आणि Dance या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांनी आपली कला सादर…
कार्यालयाबाहेर झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चंदीगडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सेक्टर 37 परिसरातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाबाहेर झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दुपारनंतर सुमारे साडे चारच्या सुमारास हा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज इतका जोरदार होता की तो दूरपर्यंत ऐकू आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्फोटामुळे कार्यालयाबाहेरील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या अनेक वाहनांचे नुकसान झाले असून काही गाड्यांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संपूर्ण परिसर ताब्यात…
जळगावकरांनो सावध रहा! जिल्ह्यात पुढील दोन दिवस ‘ऑरेंज अलर्ट’ जळगाव : जिल्ह्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली असून गेल्या तीन दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण, वादळी वारे आणि अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. एप्रिलच्या सुरुवातीलाच पावसामुळे नागरिकांना उन्हाळा आणि पावसाचा दुहेरी अनुभव येत आहे. दरम्यान, हवामान खात्याने जळगाव जिल्ह्यासाठी पुढील तीन दिवस पावसाचा इशारा दिला असून ३ आणि ४ एप्रिल रोजी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या काळात ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असून मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून…
याविरोधात लवकरच मुख्यमंत्री व ऊर्जामंत्र्यांकडे तक्रार करण्यात येणार असल्याची माहिती संतोष सोनवणे यांनी दिली आहे. भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राने वीज निर्मितीत नवनवीन विक्रम प्रस्थापित केले असले तरी प्रदूषण नियंत्रणाकडे मात्र पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. केंद्रातील 210 मेगावॅट, 2×500 मेगावॅट आणि 1×660 मेगावॅट असे तीनही प्रकल्प सध्या पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. मात्र, कोळशापासून निर्माण होणारी राख योग्य पद्धतीने व्यवस्थापित न करता पाईपलाईनद्वारे वेल्हाळे परिसरातील राख साठवण बंधाऱ्यात सोडली जाते. या राखेची पाईपलाईन वारंवार फुटणे तसेच राख साठवण बंधाऱ्यातून निचऱ्याच्या पाण्यासोबत मोठ्या प्रमाणावर राख बाहेर पडून भवानी नदीमार्गे वेल्हाळे तलावात मिसळत असल्याने गंभीर जलप्रदूषण निर्माण झाले आहे.वेल्हाळे तलावावर…
चाळीसगाव नगरपरिषद मुख्यद्वारासमोर ठिय्या आंदोलन केले. दुपारी १२ ते २.३० या वेळेत झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते. चाळीसगाव प्रतिनिधी : शहरातील घाट रोड, नारद चौफुली येथे संत सेवालाल महाराज चौक उभारणीच्या मागणीसाठी सकल बंजारा समाजाने बुधवार (दि. १ एप्रिल २०२६) रोजी चाळीसगाव नगरपरिषद मुख्यद्वारासमोर ठिय्या आंदोलन केले. दुपारी १२ ते २.३० या वेळेत झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते. समाजाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी संत सेवालाल महाराजांचे चौक/स्मारक उभारण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. यासंदर्भात १९ सप्टेंबर २००४ रोजी आंदोलन व उपोषण करण्यात…
सेल्फ डिफेन्स स्पोर्ट्स असोसिएशनच्या खेळाडूंना “खेलो इंडिया” नॅशनल किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये घवघवीत यश ! भुसावळ प्रतिनिधी : शहरातील सेल्फ डिफेन्स स्पोर्ट्स असोसिएशनच्या खेळाडूंनी चेन्नई येथे ३० मार्च रोजी झालेल्या खेलो इंडिया नॅशनल किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन करून शहराचे नाव लौकिक केले आहे. किक बाॅक्सिंग स्पर्धेत आरुषी सावकारे हिने सिल्वर मेडल तर ममता कंवर हिने ब्रांझ मेडल पटकावले आहे.सेल्फ डिफेन्स स्पोर्ट्स असोसिएशन चे प्रशिक्षक भिमज्योत शेजवळ सुमेध शेजवळ व राकेश सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली किक बाॅक्सिंग ज्युडो कराटे आदी प्रशिक्षण मुलामुलींना दिले जात आहे. भिमज्योत शेजवळ हे गेल्या ३८ वर्षापासून विनामूल्य मुलामुलींना किक बाॅक्सिंगचे प्रशिक्षण देत आहेत. चेन्नई येथे नुकत्याच…

