Author: Nilesh Ajmera

बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील मघडा गावातील शीतला माता मंदिरात मंगळवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली. बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील मघडा गावातील शीतला माता मंदिरात मंगळवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली. दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये चेंगराचेंगरी झाली, ज्यात ९ लोकांचा मृत्यू झाला. गर्दीत दबल्यामुळे ८ महिलांचा घटनास्थळी मृत्यू झाला, तर एका पुरुषाचा रुग्णालयात मृत्यू झाला. मंदिरात मंगळवारी शीतला अष्टमीच्या निमित्ताने भाविकांची प्रचंड गर्दी होती. स्थानिकांच्या मते, गर्दी नियंत्रणासाठी पुरेशी व्यवस्था नव्हती. दर्शनाच्या घाईत लोक एकमेकांना ढकलत पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली. दुर्घटनेत मृत पावलेल्या ६ लोकांची ओळख पटली आहे. यात रीता देवी (५०), कांती देवी (५०), आशा देवी (६५), देवंती देवी (३५), अनुष्का…

Read More

पूर्व वन विभागाला मार्च एंडिंगचा जोरदार दणका. यावल : लोकसेवक भैय्यासाहेब भिमराव गायकवाड, व्यवसाय वनरक्षक, आगार रक्षक यावल ,नेम – वनपरिक्षेत्र,अधि. कार्यालय, यावल पुर्व, ह. रा. फॉरेस्ट क्वॉर्टर, यावल यांचेवर लाच मागणी प्रकरणी कारवाई केले बाबत.यातील मुळ तक्रारदार त्यांचेकडील दोन बोलेरो पिकअप वाहनाद्वारे यावल तालुक्यात अंजाळे,पाडळसे व आजुबाजुच्या परिसरामध्ये ट्रिपप्रमाणे लाकुड वाहतुकीचा व्यवसाय करतात.तक्रारदार यांच्या दोन बोलेरो पिकअप गाडयाने लाकुड वाहतुक सुरळीत चालु देवुन कोणतीही कारवाई न करण्याकरीता तक्रारदार यांच्याकडे लोकसेवक भैय्यासाहेब भिमराव गायकवाड, वनरक्षक, आगार रक्षक यावल , वाजवीपेक्षा जास्त आत्मविश्वास ( ओव्हर कॉन्फिडन्स ) असलेल्या यावल पूर्व वन क्षेत्रपालाच्या कार्यक्षेत्रातील आगर रक्षक गायकवाड लाच लुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव यांच्या…

Read More

चाळीसगाव तालुक्यात जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावत नागरिकांना मोठा धक्का दिला चाळीसगाव – मार्च महिन्यात अनपेक्षितपणे चाळीसगाव तालुक्यात जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावत नागरिकांना मोठा धक्का दिला. दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होऊन काळ्या ढगांसह विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि मुसळधार पावसाने अनेक भागांना तडाखा दिला. या पावसामुळे शहरासह ग्रामीण भागात झाडे कोसळणे, वीजपुरवठा खंडित होणे तसेच घरांच्या छपरांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. काही ठिकाणी शेतपिकांनाही फटका बसल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली असून, वारा वादळ, विजांच्या कडकडाटामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.प्रशासनाकडून नुकसानीचा आढावा घेतला जात असून, नागरिकांनी अनावश्यक…

Read More

जवळ असलेले गौताळा घाटात रविवारी (दि. २९) सकाळी भीषण अपघात घडला. चाळीसगाव – जवळ असलेले गौताळा घाटात रविवारी (दि. २९) सकाळी भीषण अपघात घडला. ऊसतोडणीसाठी गेलेले मजूर बारामतीहून दस्तापूर (ता. सोयगाव) गावाकडे परतत असताना आयशर वाहनाचा ब्रेक फेल होऊन वाहन १०० फूट खोल दरीत कोसळले. या दुर्घटनेत ७ जण गंभीर जखमी झाले असून ६ जण किरकोळ जखमी झाले आहेत. याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, दस्तापूर येथील मजूर बारामती साखर कारखान्यात ऊसतोडणीसाठी गेले होते. कामाचा पट्टा संपल्याने ते (एमएच २१ बीएच ०४४२) या आयशरने गावाकडे परतत होते. गौताळा अभयारण्यातील कन्नड-नागद मार्गावरील म्हैसघाटात वाहन पोहोचताच अचानक ब्रेक फेल झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने…

Read More

दहशत पसरविणाऱ्यासाठी गावठी कट्टे घेऊन फिरणाऱ्या चौघांवर जिल्हापेठ व एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केली. जळगाव – दहशत पसरविणाऱ्यासाठी गावठी कट्टे घेऊन फिरणाऱ्या चौघांवर जिल्हापेठ व एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केली. त्यातील दोन जणांना अटक करण्यात आले असून त्यांच्याकडून दोन कट्टे, ८ जिवंत काडतूस, दोन दुचाकी व मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे. नाशिक येथे राहणारा अक्षय आनंदा सैंदाणे (वय २९) हा काही दिवसांपुर्वी जळगावत राहणाऱ्या नातेवाईकांकडे आला होता. त्याने मध्यप्रदेशातून गावठी कट्टा खरेदी केला आणि तो दि. २८ मार्च रोजी शासकीय आयटीआयच्या मागे कट्टा घेऊन दुचाकीने रेल्वे स्टेशन येथे जात होता. मात्र त्यापुर्वीच जिल्हापेठ पोलिसांनी त्याच्या मुसक्या अवळल्या. त्याची कसून चौकशी केली…

Read More

चोरट्यांनी रोख २० हजार रुपयांसह सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ३३ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. जळगाव – घराला कुलूप लावून ड्युटीवर गेलेल्या तृषा चंद्रकांत संन्याशी रा. कोल्हे हिल्स परिसर) यांच्या घरातून चोरट्यांनी रोख २० हजार रुपयांसह सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ३३ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना २८ मार्च रोजी भरदिवसा कोल्हे हिल्स परिसरात घडली. दरम्यान, चोरटे कडीकोयंडा तोडत असताना त्यांना दरवाजाच्या बाजूलाच चावी ठेवलेली दिसली व त्यांनी कुलूप उघडून ही चोरी केली. तृषा संन्याशी या रुस्तमजी स्कूलमध्ये शिक्षिका आहेत. २८ मार्च रोजी सकाळी १० वाजता त्या घराला कुलूप लावून शाळेत गेल्या. त्यानंतर…

Read More

मनवेल ता. यावल विविध कार्यक्रमांचे आयोजन : भाविकांमध्ये उत्साह मनवेल ता. यावल : जवळच असलेल्या शिरागड येथील निवासिनी श्री सप्तशृंगी देवीच्या यात्रा उत्सवाला ३१ मार्चपासून सुरुवात होत असून २ एप्रिलपर्यंत तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेनिमित्त होमहवन, पूजा-अर्चा, धार्मिक विधी तसेच विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. कोळन्हावी व शिरागड या दोन्ही गावांच्या मध्यभागी, तापी नदीलगत उंच टेकडीवर वसलेले श्री सप्तशृंगी देवीचे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. जळगाव जिल्ह्यात या ठिकाणाला “लहान गड” म्हणून ओळखले जाते. नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी गड “मोठा गड” म्हणून प्रसिद्ध असून, शिरागड येथील मंदिराला त्याच्याशी निगडित मानले जाते. भाविकांच्या मते,…

Read More

चाकणकर अन् चौधरींचे व्यावसायिक कनेक्शन उघड अशोक खरात प्रकरण रूपाली चाकणकर यांना चांगलेच भोवले असून त्यांना राज्य महिला आयोगपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरून देखील त्यांची हकालपट्टी केली गेली. तसेच राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांना देखील लक्ष केले जात आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत चाकणकर आणि चौधरी यांचे व्यावसायिक कनेक्शन उघड करीत सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. याबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुनील तटकरे यांचा मतदारसंघ असलेल्या रायगडमधील रोहयात निलेश चाकणकर आणि आकाश चौधरी हे बांधकाम व्यवसायात एकत्र असल्याची माहिती उघड झाली आहे. आकाश चौधरी आणि निलेश…

Read More

जिल्ह्यात घरफोडीच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नसून दिवसेंदिवस याच्यामध्ये वाढ होताना दिसत आहे. जळगाव जिल्ह्यात घरफोडीच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नसून दिवसेंदिवस याच्यामध्ये वाढ होताना दिसत आहे. चोरट्यांना खाकीचा धाकच नसल्याचं दिसतेय. अशातच भुसावळ शहरातील फातेमा कॉलनीत घरफोडी झाली. चोरट्यांनी बंद असलेले घर फोडून सव्वादोन लाखांची रोकड व ५३ ग्रॅम सोने व चांदीचे दागिने असा एकूण ६ लाखांचा ऐवज लांबवला. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला. फातेमा कॉलनी, प्लॉट क्र.४३ मधील रहिवासी तथा जळगावच्या जैन एरिगेशनमध्ये अभियंता असलेले वसीम शेख हे २८ मार्च रोजी नातेवाइकांच्या लग्नासाठी बाहेरगावी गेले होते. यामुळे घर बंद होते. ही संधी…

Read More

जळगाव प्रिंट मिडिया संघ उपविजेता तर प्रेस एडिटर संघ तृतीय,मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण जळगाव – पत्रकारांनी पत्रकारांसाठी आयोजित केलेली महाराष्ट्रातील एकमेव स्पर्धा ‘पत्रकार प्रिमियर लीग’ पर्व-२ चा समारोप दि.२९ मार्च रोजी दिमाखात पार पडला. जळगाव प्रिंट मीडिया विरुद्ध जळगाव प्रेस फोटोग्राफर संघात खेळल्या गेलेल्या उपांत्य सामन्यात प्रेस फोटोग्राफर संघाने बाजी मारली. तृतीय क्रमांक प्रेस एडिटर संघाने पटकावला. सर्व संघांना आणि खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. समाजाचा चौथा आधारस्तंभ असलेले पत्रकार नेहमीच जीवाची बाजी लावत, ऊन, वारा, पाऊस, थंडी सहन करीत दिवसरात्र धावपळ करीत असतात. राज्यात विविध धर्म, जात, शासकीय, निम शासकीय कार्यालयातर्फे क्रिकेटसह इतर स्पर्धा आयोजित केल्या जातात. सर्वच…

Read More