महापौरांनी राबविली स्वच्छता मोहीम ; नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई जळगाव प्रतिनिधी : शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता मोहिमेला रविवारी नवे बळ मिळाले. शहरातील गजबजलेल्या गोलाणी मार्केट परिसरात महापौर दीपमाला काळे यांच्या उपस्थितीत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. विशेष म्हणजे, महापौरांनी स्वतः रस्त्यावर उतरून पाहणी करत स्वच्छतेच्या कामाचा प्रत्यक्ष आढावा घेतला. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती निर्माण झाली. प्रलंबित प्रश्नाला दिला हात गोलाणी मार्केटमधील गाळेधारक न्यायालयात गेल्यामुळे या परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित होता. स्थानिक नागरिकांच्या सातत्यपूर्ण तक्रारींची दखल घेत महापौरांनी विशेष मोहिम राबवली. यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांना स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारण्याचे स्पष्ट निर्देश दिले. २२ टन कचऱ्याची…
Author: Nilesh Ajmera
एनमुक्टो प्राध्यापक संघटनेने विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून आपले प्रस्तावित आंदोलन मागे घेतले आहे. फैजपूर प्रतिनिधी :कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील परीक्षा वेळापत्रकाच्या संदर्भात निर्माण झालेल्या वादावर अखेर तोडगा निघाला असून एनमुक्टो प्राध्यापक संघटनेने विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून आपले प्रस्तावित आंदोलन मागे घेतले आहे.दिनांक 29 मार्च 2026 रोजी एनमुक्टो संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मा. कुलगुरूंना निवेदन सादर करून तब्बल दोन तास सविस्तर चर्चा केली. यावेळी कुलगुरूंनी परीक्षा 30 मे 2026 पर्यंत लांबण्यामागे परीक्षा विभागाची मोठी चूक असल्याचे मान्य केले. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे तातडीने वेळापत्रकात मोठे बदल करणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, परीक्षा पुढे ढकलल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक…
जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात तालुका निहाय केळीच्या पिकात भ्रष्टाचार केला गेला आहे. जळगाव जिल्ह्यात केळी पिक विमा योजनेत कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला. ज्याचे शेतात केळी नाही अशा शेतकऱ्यांच्या केळीच्या पिक विमा उतरवून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला गेला. जळगाव जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात तालुका निहाय केळीच्या पिकात भ्रष्टाचार केला गेला आहे. मंडळ निहाय क्षेत्रात केळीच्या पिकाचा विमा काढला गेला आणि पीक नसताना सुद्धा त्याचा विमा उकळला गेला. त्यामुळे असे एकूण 250 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केळी पिक विम्यात झालेला आहे. विमा प्रतिनिधी त्या मध्ये गब्बर झाले आहेत. विमा प्रतिनिधीकडून विमा काढायचा आणि त्यात केळीचे पीक नसताना केळी होती असे दाखवून केळीचा विमा काढून तेथे…
गैरसोय लक्षात घेता केंद्र सरकारने पुरवठा व्यवस्थापनासाठी तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. जळगाव । देशात एलपीजी सिलेंडरच्या तुटवड्यामुळे नागरिकांची होत असलेली गैरसोय लक्षात घेता केंद्र सरकारने पुरवठा व्यवस्थापनासाठी तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. आखाती देशांतून नैसर्गिक वायू घेऊन आलेली जहाजे भारतीय किनाऱ्यावर पोहोचली असून, पुढील दोन महिन्यांसाठी पुरेसा गॅस साठा उपलब्ध असल्याचा सरकारचा दावा आहे. दरम्यान, गॅस वितरणात पारदर्शकता राखण्यासाठी आणि काळाबाजार रोखण्यासाठी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) ने बुकिंग प्रक्रियेत काही महत्त्वाचे बदल केले आहेत. नव्या नियमांनुसार, एका ग्राहकाला महिन्यात जास्तीत जास्त दोनच घरगुती सिलेंडर बुक करता येणार आहेत. तसेच दोन बुकिंगमध्ये किमान २५ दिवसांचे अंतर ठेवणे बंधनकारक करण्यात आले…
जळगावसह खान्देशातील रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जळगाव । जळगावसह खान्देशातील रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून विशेष गाडी म्हणून धावणारी दादर–भुसावळ एक्सप्रेस आता कायमस्वरूपी करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ही गाडी आता नव्या १९०४७/४८ या क्रमांकाने नियमितपणे धावणार आहे. याबाबतची माहिती खासदार स्मिता वाघ यांनी दिली आहे. विशेष गाडी असल्यामुळे प्रवाशांना आतापर्यंत अतिरिक्त भाडे मोजावे लागत होते. मात्र, आता नियमित गाडीचा दर्जा मिळाल्यामुळे तिकिट दरात तब्बल २० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात होण्याची शक्यता व्यक्त होत असून सामान्य प्रवाशांचा आर्थिक भार कमी होऊ शकतो. प्राप्त माहितीनुसार, या गाडीला प्रवाशांचा सातत्याने चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळेच…
जिल्ह्यात पुन्हा एकदा निसर्गाचा कोप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जळगाव । जळगाव शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जाणवणाऱ्या उन्हाच्या तडाख्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण जिल्ह्यात पुन्हा एकदा निसर्गाचा कोप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान खात्याने ३० आणि ३१ मार्च दरम्यान जिल्ह्यात जोरदार वादळ, पावसासह गारपिटीचा इशारा देत ‘ऑरेंज अलर्ट’ जाहीर केला आहे. या अचानक बदलणाऱ्या हवामानामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. यंदा मार्च मध्ये हवामानात अनपेक्षित बदल पाहायला मिळत आहेत. एकीकडे मार्चमध्येच उष्णतेच्या तीव्रतेनं अंगाची लाहीलाही होत असताना त्यातच अवकाळी पावसाचे सावटही घोंगावत आहे. जळगावचे तापमान ४० अंशावर पोहोचल्याने उष्णतेचा तडाखा जळगावकरांना जाणवत आहे. दिवसासह रात्रीच्या उकाड्यातही…
आमदार एकनाथराव खडसे आणि त्यांची कन्या शारदा खडसे यांच्या विरोधात बोदवड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली बोदवड : भुसावळ तालुक्यातील मानपूर येथील जमीन गैरप्रकाराने खरेदी करून फसवणूक करण्यासह अनुसुचीत जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत आमदार एकनाथराव खडसे आणि त्यांची कन्या शारदा खडसे यांच्या विरोधात बोदवड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.या संदर्भातील माहिती अशी की, २००२ साली भुसावळ तालुक्यातील मानपूर शिवारातील जमीनी साखर कारखाना उभारण्याच्या नावाखाली विकत घेण्यात आल्या होत्या. यात गट क्रमांक १२२ ही महार वतनाची जमीन मानपूर येथील चमेलाबाई तुकाराम तायडे आणि त्यांच्या वारसदारांच्या मालकीची होती. खरेदी करतांना तायडे कुटुंबाला…
सदर बैठकी ला संस्थापक अध्यक्ष तथा दिव्यांग नेते.अनिस शेख पत्रकार यांच्या अध्यक्षते खाली. सदर बैठकी ला संस्थापक अध्यक्ष तथा दिव्यांग नेते.अनिस शेख पत्रकार यांच्या अध्यक्षते खाली. व अपंग जनता दल. सामाजिक संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यश यांच्या नैतृत्वाखाली घेण्यात आली.सदर बैठकीत संस्थापक अध्यक्ष शेख अनिस पत्रकार राज्य अध्यक्ष जाकीर शेख,यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले तसेच राज्य कार्याध्यक्ष भाऊसाहेब दसपुते, राज्य सम्पर्क प्रमुख लक्ष्मण राज्य उपाध्यक्ष कुणाल झाल्टे, राज्य उपाध्यक्ष गणेश मगर,जालना जिल्हाध्यक्ष नूर चौधरी, वाघे, राज्य महिला अध्यक्षा मीनाताई धोत्रे, राज्य महिला उपाध्यक्ष सरला लुले.यांनी सर्वानी आ प आपले विचार व्यक्त केले तसेच संघटनेत काम करणारे व इच्छुक असलेले नवनियुक्त पदाधिकारी पण…
चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी छापा टाकत एकास ताब्यात घेतले. चाळीसगाव प्रतिनिधी : तालुक्यातील जुनोने शिवारात गावठी हातभट्टी दारू निर्मितीवर चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी छापा टाकत एकास ताब्यात घेतले. ही कारवाई करण्यात आली.मिळालेल्या माहितीनुसार, जुनोने येथील कुंडाच्या नाल्यात रूखमाबाई रतन मोरे यांच्या शेताजवळ एका इसमाकडून बेकायदेशीररित्या गावठी दारू तयार करण्यासाठी कच्चे रसायन भिजत घातल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक राहुल राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पंचांसह घटनास्थळी छापा टाकला.या कारवाईत दगडू सदाशिव गायकवाड (वय 50, रा. जुनोने, ता. चाळीसगाव) यास जागीच पकडण्यात आले. त्याच्या ताब्यातून सुमारे 350 लिटर कच्चे रसायन (गुळ, नवसागर, एरंडी मिश्रित) जप्त करण्यात आले असून त्याची किंमत अंदाजे 12,250 रुपये…
शिवापुर तांड्यात दांपत्याचा संशयास्पद मृत्यू चाळीसगावात खळबळ चाळीसगाव प्रतिनिधी : तालुक्यातील शिवापुर तांडा येथे पती-पत्नीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, भगवान पोपट जाधव (वय 38) व त्यांची पत्नी आशाबाई भगवान जाधव (वय 27, दोघेही रा. शिवापुर तांडा, ता. चाळीसगाव) यांना मृत अवस्थेत चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना 28 मार्च रोजी सकाळी 9.45 वाजण्यापूर्वी घडल्याचे समोर आले आहे.दोघांचाही मृत्यू गळफास घेतल्यामुळे झाल्याची प्राथमिक माहिती असून, याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संबंधित प्रकरणे अनुक्रमे अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक 19/2026 व…

