माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना येत्या २ मेपासून उन्हाळी सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. जळगाव । उन्हाळी सुट्ट्यांची आतुरतेने वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसह पालकांसाठी महत्वाची बातमी आहे. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना येत्या २ मेपासून उन्हाळी सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. तसेच नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात १५ जूनपासून होणार असल्याचे शिक्षण विभागाच्या परिपत्रकातून स्पष्ट करण्यात आले आहे. यंदा दहावी व बारावीच्या परीक्षा नेहमीपेक्षा लवकर घेण्यात आल्याने निकाल प्रक्रियेसाठी पुरेसा वेळ मिळावा आणि इतर वर्गांचे शैक्षणिक नियोजन सुरळीत पार पडावे, यासाठी वेळापत्रकात बदल करण्यात आल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात नव्या शैक्षणिक सत्राची तयारी मार्च महिन्यापासूनच सुरू करण्यात…
Author: Nilesh Ajmera
युद्ध भडकलं! डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला पुन्हा कठोर इशारा, म्हणाले… जळगाव । पश्चिम-आशियातील सुरू असलेल्या युद्धाचा भारतासह अनेक देशांना फटका बसत आहे. अमेरिका-इस्त्राईल आणि इराण यांच्यातील युद्ध कधी संपणार याकडे अख्या जगाचं लक्ष लागून आहे. मात्र या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा कठोर इशारा दिला आहे. यामुळे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे. करारासाठी इराणने सहमती दर्शवली नाही, तर त्यांच्या सर्व वीज निर्मिती प्रकल्पांवर एकाच वेळी मोठा हल्ला केला जाईल, अशी स्पष्ट धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. गुरुवारी अमेरिकन नागरिकांना संबोधित करताना ट्रम्प यांनी सांगितले की, ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ ही मोहीम अजून सुरू असून पुढील दोन…
जिवंत काडतुसे, मोटारसायकल व मोबाईल असा एकूण १ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जळगाव । जळगाव शहरात बेकायदेशीर शस्त्रांची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून देशी बनावटीचा कट्टा, जिवंत काडतुसे, मोटारसायकल व मोबाईल असा एकूण १ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर रोड परिसरात काही व्यक्ती कट्टा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तातडीने नियोजन करून संबंधित ठिकाणी सापळा रचला. संशयित इसम घटनास्थळी आल्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन तपासणी करण्यात आली असता त्यांच्या जवळून एक गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे आढळून आली.…
५०० लिटर क्षमतेच्या प्लास्टिक टाक्यांमध्ये पेट्रोल भरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. जळगाव । मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा फाटा परिसरातील एका पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात इंधन साठवणुकीचा संशय निर्माण करणारा प्रकार समोर आला आहे. पेट्रोल-डिझेल टंचाईच्या अफवांमुळे नागरिक इंधन भरण्यासाठी रांगा लावत असतानाच एका व्यक्तीने तब्बल ५०० लिटर क्षमतेच्या प्लास्टिक टाक्यांमध्ये पेट्रोल भरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेचा व्हिडिओ उपस्थित नागरिकांनी मोबाईलमध्ये चित्रित केला असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे संबंधित व्यक्ती इंधनाची साठवणूक करून भविष्यात काळाबाजार करण्याच्या उद्देशाने हा प्रकार करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, पेट्रोल पंप प्रशासनाने शासनाने घालून दिलेल्या नियमांचे…
घटनेमुळे वारीत सहभागी झालेल्या भाविकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. जळगाव । वणी येथील सप्तशृंगी गडाकडे पायी वारी करत असताना जिल्ह्यातील दोन भाविकांचा वेगवेगळ्या ठिकाणी भोवळ येऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.परेश धर्मा पवार (वय १७, रा. चौगाव, ता. चोपडा) आणि राजेंद्र रामराव पाटील (४५, रा. जुवार्डी, ता. भडगाव) अशी या मृत भाविकांची नावे आहेत. या घटनेमुळे वारीत सहभागी झालेल्या भाविकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील चौगाव येथून २६ मार्च रोजी पायी दिंडी सप्तशृंगी गडाच्या दिशेने रवाना झाली होती. ही दिंडी २९ मार्च रोजी कळवण तालुक्यातील भेंडी येथे पोहोचली असता भंडारा कार्यक्रमादरम्यान जेवणाच्या रांगेत उभा…
दोन्ही गटांनी एकमेकांवर लोखंडी पाईपने प्राणघातक हल्ला केला. जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको, न्यू ख्वाजा नगरपरिसरात किरकोळ वादातून दोन गट एकमेकांना भिडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लहान मुलांचे भांडण आणि दारूच्या नशेत झालेल्या वादाचे रूपांतर मोठ्या हाणामारीत झाले असून, दोन्ही गटांनी एकमेकांवर लोखंडी पाईपने प्राणघातक हल्ला केला. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूंच्या फिर्यादीवरून परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्या गटाचा आरोप: मुलांच्या भांडणात मध्यस्थी पडली महागात :पहिल्या घटनेत फिर्यादी उस्मान शहा इब्राहिम शहा वय ५५ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २९ मार्च रोजी रात्री ८ ते ११:३० च्या दरम्यान त्यांच्या मुलाचे आणि आरोपींच्या मुलाचे भांडण झाले होते. हे…
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) चे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांनी पत्रकार परिषदेत केली. मानपुर येथील महार वतन जमिनीच्या बनावट व्यवहार प्रकरणाला नवे वळण लागले असून या प्रकरणाची एसआयटीमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी,आणि आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) चे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांनी पत्रकार परिषदेत केली. दि. 31 मार्च 2026 रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, मानपुर ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव येथील रहिवासी चमेलीबाई तुकाराम तायडे यांच्या मालकीची महार वतन जमीन 2002 साली खरेदी करण्यात आली होती. मात्र ही जमीन माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या मुली शारदा खडसे यांच्या नावावर करण्यात आल्याचा…
प्रशासकीय कारणास्तव महाजेनकोत सहा अधिकारी यांच्या बदली भुसावळ प्रतिनिधी – राज्यातील वीज निर्मिती क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी लिमिटेड (महाजेनको) मध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा मोठा फेरबदल करण्यात आला आहे. प्रशासकीय कारणास्तव जारी आदेश क्रमांक २८२४नुसार मुख्य अभियंता व उपमुख्य अभियंता स्तरावरील अधिकाऱ्यांची विविध प्रकल्पांमध्ये पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे.या बदल्यांमुळे कोराडी, खापरखेडा, भुसावळ तसेच मुंबई मुख्यालयातील महत्त्वाच्या पदांवर नवी जबाबदारी देण्यात आली असून, प्रकल्प व्यवस्थापनात गतिमानता येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. महत्त्वाच्या बदल्या राजेश मोराळे : टीपीएस भुसावळ कोराडी ट्रेनिंग सेंटरविराज चौधरी : मुंबई मुख्यालय टि पी एस भुसावळ (मुख्य अभियंता)विलास मोतघरे : टिपीएस कोराडी -कोराडी प्रोजेक्टविवेक रोकडे :…
प्रलंबित योजना आणि निधीचा मुद्दा मांडला गेला. भुसावळसाठी विशेष निधी देण्याची मागणी देखील करण्यात आली. भुसावळ प्रतिनीधी – भुसावळ शहराच्या राजकारणात अचानक नवा वळण दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांनी आपल्या नगरसेवकांसह थेट सत्ताधारी मंत्री गिरीश महाजन यांची जामनेर येथे भेट घेतल्याने भुसावळमधील राजकीय चर्चांना नवे उधाण आले आहे.या भेटीत शहरातील विकासकामे, प्रलंबित योजना आणि निधीचा मुद्दा मांडला गेला. भुसावळसाठी विशेष निधी देण्याची मागणी देखील करण्यात आली. मात्र, या भेटीमागे फक्त विकासाचा अजेंडा आहे की राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची चाहूल आहे, हे शहरात चर्चा घेऊन फिरत आहे. राजकीय वर्तुळात यावेळी विशेष लक्ष लागले आहे. विरोधकांचे मत आहे की, नगराध्यक्ष…
गारपिटीचाही तडाखा बसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. जळगाव । महाराष्ट्रावर अवकाळीचे पावसाचे असलेलं सावट एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला देखील कायम आहे. मागच्या काही दिवसापासून जळगावसह राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यासोबतच गारपिटीचाही तडाखा बसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, आगामी काही दिवस जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाची स्थिती राहणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, आगामी ५ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज असून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे बळीराजाची चिंता वाढली आहे. हवामान विभागाने १ ते ३ एप्रिल दरम्यान ‘यलो अलर्ट’ जारी केला असून या कालावधीत पावसाची तीव्रता अधिक राहू शकते. त्यानंतर ४ आणि ५ एप्रिल रोजीही विजांच्या…

