Author: Nilesh Ajmera

परिस्थितीबाबत जिल्हा प्रशासनाकडून स्पष्टीकरण.. जळगाव । एकीकडे युद्धामुळे गॅस सिलींडरचा तुटवडा जाणवत असताना त्यातच जळगाव शहरात काही पेट्रोल पंपांवर पेट्रोल संपल्याच्या अफवा पसरल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाने महत्त्वाचे आवाहन करत परिस्थितीबाबत स्पष्टीकरण दिले आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, जळगाव शहर तसेच जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणताही तुटवडा नाही. इंधन पुरवठा साखळी सुरळीत सुरू आहे आणि संबंधित यंत्रणांकडून सातत्याने देखरेख केली जात आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता घाबरून इंधनाचा साठा करू नये किंवा एकाच वेळी मोठ्या प्रमाणात खरेदी टाळावी, असे आवाहन करण्यात आले…

Read More

उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो जळगाव । मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात उन्हाळ्याची तीव्रता मोठ्या प्रमाणात जाणवत असून, पुढील काही दिवसांमध्ये तापमानवाढ कायम राहण्याचे संकेत मिळत आहेत. उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. उष्माघात, निर्जलीकरण आणि इतर उष्णताजन्य आजार टाळण्यासाठी नागरिकांनी दिवसभरात पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. तहान लागली नसली तरी नियमित पाणी प्यावे, तसेच प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. ओरल रीहायड्रेशन सोल्यूशन (ORS), लिंबूपाणी, ताक, लस्सी व फळांचे रस यांसारख्या पेयांचा वापर करावा. टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी यांसारखी पाण्याचे प्रमाण…

Read More

जळगाव येथील श्रेयस प्रकाशनातर्फे महत्वपूर्ण बालसाहित्याचे प्रकाशन करण्यात आले. वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात संपन्न झालेल्या ‘बाल मराठी संमेलना’च्या मुख्य रंगमंचावर जळगाव येथील श्रेयस प्रकाशनातर्फे महत्वपूर्ण बालसाहित्याचे प्रकाशन करण्यात आले. या सोहळ्यात पुणे आणि अहिल्यानगर येथील साहित्यिकांच्या बालनाटकांना हक्काचे व्यासपीठ मिळाले. हा प्रकाशन सोहळा बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा ॲड. निलम शिर्के सामंत यांच्या हस्ते पार पडला. यावेळी श्रेयस प्रकाशनाचे प्रकाशक योगेश शुक्ल उपस्थित होते. याप्रसंगी बालरंगभूमी परिषदेची मध्यवर्ती कार्यकारिणी आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रामुख्याने ज्ञानेश्वर गायकवाड (पुणे): यांच्या ‘गाऱ्हाणं’ आणि फुलपाखराची गोष्ट या बालनाट्य पुस्तकांचे प्रकाशन झाले. त्यांच्या अनुपस्थितीत पुण्याच्या प्रसिद्ध अभिनेत्री अंजली धारू यांनी…

Read More

१४६ रुग्णांची तपासणी, ४५ जणांची मोफत शस्त्रक्रियेसाठी निवड यावल प्रतिनिधी :ग्रामीण भागातील नागरिकांना डोळ्यांच्या आजारांवर वेळेत व दर्जेदार उपचार मिळावेत, या सामाजिक जाणिवेतून आमदार अमोल जावळे यांच्या माध्यमातून यावल येथे भव्य मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला असून एकूण १४६ रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. यात ४५ रुग्णांवर मोफत नेत्र शस्त्रक्रिया होणार आहे. तपासणीदरम्यान मोतीबिंदूचा त्रास आढळलेल्या ४५ पात्र रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली आहे. या सर्व रुग्णांना जळगाव येथे ने-आण करण्याची तसेच प्रवासासह इतर अनुषंगिक खर्चाची जबाबदारी आमदार अमोल जावळे यांनी घेतली आहे. निवड झालेल्या रुग्णांवर दि. २६ मार्च रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय…

Read More

खडका परिसरातील गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्याचा संशय निर्माण करणारी गंभीर घटना घडली फेकरी ता.भुसावळ तालुक्यातील साकरी गावात खडका परिसरातील गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्याचा संशय निर्माण करणारी गंभीर घटना घडली आहे. एका संशयित अल्पवयीन मुलास जिवंत ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, काही व्यक्तींनी संबंधित हेमराज तायडे रा . कठोरा या युवकावर हल्ला करत त्याला गंभीर जखमी केले. घटनेची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत असताना काही स्थानिकांनी त्यांच्याशी हुज्जत घालत धक्काबुक्की केली. तसेच अरेरावीची भाषा वापरत सरकारी कामात अडथळा निर्माण केला.या प्रकारामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला…

Read More

सुनील दैवे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने शहरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. बोदवड प्रतिनिधी – शहरात काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून उफाळलेल्या मारहाणीच्या घटनेत गंभीर जखमी झालेल्या सुनील शामराव दैवे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने शहरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिक, नातेवाईक आणि विविध सामाजिक घटकांकडून होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साध्या वादातून सुरू झालेल्या या घटनेने अचानक हिंसक वळण घेतले. आरोपींकडून झालेल्या बेदम मारहाणीत सुनील दैवे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने उपचार सुरू असतानाच काल रात्री त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाची वार्ता…

Read More

आंदोलनाचा तीसरा दिवस असतानाही शासनाकडून कोणतीही ठोस दखल घेण्यात आलेली नाही. जळगाव । पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील शेतकऱ्यांनी अत्यावश्यक रस्त्याच्या मागणीसाठी 21 मार्चपासून आंदोलन सुरू केले असून आज आंदोलनाचा तीसरा दिवस असतानाही शासनाकडून कोणतीही ठोस दखल घेण्यात आलेली नाही.पिंपळगाव हरेश्वर ते जरंडी दरम्यानचा सुमारे ५ किलोमीटरचा ‘जुना जरंडी रस्ता’ अत्यंत दयनीय अवस्थेत असून प्रत्यक्षात रस्ता अस्तित्वात नसल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. या मार्गावरून पायी चालणेही कठीण झाले असून शेतीपर्यंत पोहोचणे शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले की, रस्त्याच्या बिकट अवस्थेमुळे अनेकांनी बैलगाड्या विकल्या आहेत. पावसाळ्यात तर परिस्थिती आणखी गंभीर बनते. शेतात जाणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे असून दररोज…

Read More

युद्धाच्या छायेत वाहनधारकांना दिलासा ! जळगाव । २३ मार्च रोजी देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये मोठे चढ-उतार पाहायला मिळाले आहेत. मध्य पूर्वेतील वाढता भू-राजकीय तणाव आणि अमेरिका-इराणमधील संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. याचा थेट परिणाम भारतीय इंधन दरांवर झाला आहे.आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल ११२ डॉलरच्या पुढे गेली असून, अमेरिकन WTI क्रूडही १०० डॉलरच्या जवळ पोहोचले आहे. काही आठवड्यांपूर्वीच हे दर ७० डॉलरच्या आसपास होते, त्यामुळे झालेली ही झपाट्याची वाढ चिंताजनक मानली जाते. मात्र, या वाढीच्या पार्श्वभूमीवरही काही राज्यांमध्ये ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रात पेट्रोल ७ पैसे आणि डिझेल ९ पैशांनी स्वस्त झाले…

Read More

उत्तर प्रदेशातील ऐन परीक्षा काळात वर्गाबाहेर रक्ताचा सडा उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील नामांकित उदय प्रताप कॉलेजच्या कॅम्पसमध्ये शुक्रवारी भरदिवसा सदर घटना घडली. नेहमीप्रमाणे सर्व विद्यार्थी कॉलेजमध्ये आले होते. त्यानंतर, एका वर्गाबाहेर एका विद्यार्थ्यावर गोळीबार झाल्याचा आवाज ऐकू आला. यामुळे कॅम्पसमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. कॉलेजमधील पदव्युत्तर विद्यार्थी सूर्य प्रताप सिंग याचा मनजीत कुमार नावाच्या दुसऱ्या विद्यार्थ्यासोबत एका क्षुल्लक मुद्द्यावरून वाद झाला होता.…

Read More

टेक्सटाईल पार्क कुठे का होईना जिल्ह्यातच होत आहे, याचेही समाधान त्यांनी व्यक्त केले. कापूस उत्पादनात आघाडीवर असलेल्या जळगाव जिल्ह्यात प्रक्रिया उद्योगांचा अभाव ही दीर्घकालीन समस्या ठरत असताना, भुसावळ येथे प्रस्तावित असलेला टेक्सटाईल पार्क नंतरच्या काळात जामनेर येथे हलविण्यात आल्याबद्दल राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी खंत व्यक्त केली. मात्र, टेक्सटाईल पार्क कुठे का होईना जिल्ह्यातच होत आहे, याचेही समाधान त्यांनी व्यक्त केले. अर्थसंकल्पात राज्य शासनाने ग्रामीण व शहरी भागाच्या विकासासाठी तसेच विविध घटकांच्या कल्याणाकरीता केलेल्या आर्थिक तरतुदींची माहिती देण्यासाठी वस्त्रोद्योग मंत्री सावकारे यांनी जळगावमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे, मनपाच्या स्थायी समितीचे सभापती डॉ.चंद्रशेखर पाटील,…

Read More