Author: Nilesh Ajmera

गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर मेहुणबारे पोलिसांनी गस्ती दरम्यान जप्त केला. चाळीसगाव प्रतिनिधी : गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर मेहुणबारे पोलिसांनी गस्ती दरम्यान जप्त केला. या कारवाईत सुमारे ३ लाख ५७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहुणबारे पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विकास शिरोळे, चालक हवालदार संजय पाटील व पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील यांचे पथक २१ मार्च रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास दहिवद शिवारात गस्त घालत होते. यावेळी दहिवद बसस्थानकाजवळ एक विना क्रमांकाचे ट्रॅक्टर उभे असल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळी नागरिकांची गर्दी होती.पोलिसांनी तपासणी केली असता ट्रॅक्टरमध्ये वाळू…

Read More

राष्ट्रीय स्तरावरील GATE परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत अखिल भारतीय स्तरावर 4053 वा क्रमांक पटकावला आहे. मुक्ताईनगर प्रतिनिधी : येथील गौरव गोपाल भंडारे यांनी राष्ट्रीय स्तरावरील GATE परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत अखिल भारतीय स्तरावर 4053 वा क्रमांक पटकावला आहे. अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतही जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवले आहे. गौरव यांचे वडील मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असून, मुलाच्या शिक्षणासाठी त्यांनी मोठे कष्ट घेतले आहेत. आईनेही वडिलांना खांद्याला खांदा लावून साथ दिली. अशा बिकट परिस्थितीतही गौरव यांनी हार न मानता सातत्याने अभ्यास करत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. त्यांच्या या यशामुळे त्यांच्या पालकांच्या कष्टाचे चीज झाले…

Read More

जिल्ह्यात तापमान दिवसेंदिवस वाढत असून यामुळे जंगल परिसरातील जलस्रोत आटून राहिलेली आहे. रावेर पाल प्रतिनिधी : पशुपक्ष्यांना मिळणार दिलासा:-वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी सरसावले पाल वन्यजीव वनविभाग पाल ता रावेर दि २५/३/२०२६ सध्या जिल्ह्यात तापमान दिवसेंदिवस वाढत असून यामुळे जंगल परिसरातील जलस्रोत आटून राहिलेली आहे. यात एप्रिल आणि मे महिन्यात जंगल परिसरातील नदी, झरे , नैसर्गिक पानवटे पूर्णतः सुकलेले असतात यामुळे जंगलातील पशुपक्षी व वन्यप्राणी यांची पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होते. पिण्याच्या पाण्याची समस्येमुळे वन्य प्राण्यांची भटकंती होते. या समस्येमुळे वन्यप्राणी लोकवस्तीकडे वळण्याची भीती निर्माण होते. याची खबरदारी म्हणून जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ अंतर्गत वन्य प्राण्यांना पाणी पिण्यासाठी कृत्रिम पानवटे द्वारे पिण्याच्या पाण्याची पाल…

Read More

जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांना सध्या अत्यंत कमी दर मिळत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले यावल प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांना सध्या अत्यंत कमी दर मिळत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार अमोलभाऊ जावळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे तात्काळ चौकशी करून कार्यवाहीची मागणी केली आहे.पत्रात नमूद केल्याप्रमाणे, जळगाव जिल्ह्यातील केळीचे दर हे परंपरेने बऱ्हाणपूर मंडीतील दरांवर आधारित ठरवले जातात. सध्या बऱ्हाणपूर मंडीमध्ये केळीचा दर सुमारे रु. १६०० ते १७०० प्रति क्विंटल इतका असताना, जळगाव जिल्ह्यातील काही व्यापारी शेतकऱ्यांकडून केवळ रु. ५०० ते ६०० प्रति क्विंटल या अत्यल्प दराने खरेदी करत आहेत.हा दर अत्यंत अन्यायकारक असून, यामुळे…

Read More

भारत मुक्ती मोर्चा व राष्ट्रीय पिछडा ओबीसी वर्ग मोर्चा या सामाजिक संघटनांच्यावतीने निघालेला मोर्चा जळगाव प्रतिनिधी : शहरात भारत मुक्ती मोर्चा व राष्ट्रीय पिछडा ओबीसी वर्ग मोर्चा या सामाजिक संघटनांच्यावतीने निघालेला मोर्चा सोमवार, २३ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला. हा मोर्चा शहरातील जी.एस.ग्राऊंड येथुन दु. १२ वाजता भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष देवानंद निकम व राष्ट्रीय पिछडा ओबीसी वर्ग मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुभाष नावडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली नवीन बसस्थानक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जिल्ह्यातील बहुजन समाजातील विविध सामाजिक,धार्मिक संघटना व राजकीय पक्ष मोर्चात सहभागी झाले होते. ओबीसींची जनगणना,युजीसी कायदा व शिक्षक पात्रता परिक्षेच्या मुद्द्यांवर विविध मागण्या मान्य करण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. विविध…

Read More

अधिकारी विजय गंगाराम बारेला यांनी पोलीस निरीक्षक यावल आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे दिली. यावल प्रतिनिधी :तालुक्यातील मालोद ग्रामपंचायत सरपंच यांचे पती भारसिंग बारेला यांनी ग्रामपंचायत कार्यालयात शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार ग्राम.अधिकारी विजय गंगाराम बारेला यांनी पोलीस निरीक्षक यावल आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे दिली. यावल पोलीस निरीक्षक आणि पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे दि.२४ मार्च २०२६ रोजी दिलेल्या निवेदनात विजय बारेला यांनी नमूद केले आहे की मी ग्रा.पं.कार्यालय मालोद येथे चार्ज हस्तांतरणासाठी गेलो असता त्या ठिकाणी सरपंच यांचे पती भारसिंग बारेला हे सुध्दा कार्यलयात आलेले होते.मी मागील ग्रा.प.अधिकारी विजय नारायण साळंके यांना त्यांनी मला चार्ज दिल्याप्रमाणे मी त्यांना परत…

Read More

पठाणकोट एक्स्प्रेसमधून तब्बल २ लाख ५३ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला जळगाव । भुसावळ रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांनी संयुक्त कारवाई करत प्रतिबंधित गुटखा तस्करीचा मोठा प्रकार उघडकीस आणला आहे. पठाणकोट एक्स्प्रेसमधून तब्बल २ लाख ५३ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी बऱ्हाणपूर येथील एका संशयिताला अटक करण्यात आली. सुनील शिवनारायण मालाकार (वय ४२, शिवाजीनगर, लालबाग, बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) असं त्याचं नाव असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत असे की, अप ११०५८ पठाणकोट एक्स्प्रेसमधून मोठ्या प्रमाणावर गुटखा भुसावळहून मनमाड-मुंबईदरम्यान तस्करीसाठी नेला जात असल्याची गोपनीय माहिती रेल्वे सुरक्षा बलाला मिळाली होती. त्यानुसार लोहमार्ग पोलिसांना…

Read More

२ खत विक्रेत्यांचे परवाने कायमचे रद्द, १० निलंबित जळगाव । जळगाव जिल्ह्यात खत विक्रीतील अनियमितता आणि जास्त दराने विक्रीच्या तक्रारींवरून कृषी विभागाने मोठी कारवाई करत २ विक्रेत्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द केले आहे. त्यासोबत कासोदा (एरंडोल) येथील सोसायटीसह अन्य १० व्यावसायिकांचे परवाने निलंबित केले आहेत, तर एका परवानाधारकाला ताकीद दिली आहे. अचानक तपासणीदरम्यान अनेक ठिकाणी खताचा साठा नोंदीत नसणे, दरपत्रक न लावणे आणि शेतकऱ्यांना योग्य माहिती न देणे अशा त्रुटी आढळून आल्या.या कारवाईमुळे जिल्ह्यातील इतर खत विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली. युरिया टंचाईच्या तक्रारीनंतर कृषी विभाग व गुणवत्ता नियंत्रण पथकाने जळगाव जिल्ह्याच्या कासोदा (ता. एरंडोल) येथे धाड टाकून सहा दुकानांत तब्बल ३४१८ गोण्यांचा युरिया…

Read More

जागतिक चिमणी दिनानिमित्त विद्यार्थ्याना पक्षी संवर्धनाचे धडे पक्ष्यांचा आवाज हा निसर्गातील सर्वांत मधुर संगीत आहे. पहाटेच्या वेळी जेव्हा पक्ष्यांचा किलबिलाट कानी पडतो, तेव्हा मनात एक वेगळेच चैतन्य आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. मात्र वाढत्या शहरीकरणामुळे हा आवाज हरवत चालला आहे. त्यासाठी पक्षी संवर्धनाची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असे प्रतिपादन चातक निसर्ग संवर्धनाचे पक्षी अभ्यासक अनिल महाजन यांनी केले. जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून शहरातील सिद्धेश्वर नगरमधील जिल्हा परिषद शाळेत ‘पक्षी वाचवा, निसर्ग वाचवा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना विविध पक्षी व त्यांच्या जीवनाबद्दल सविस्तर माहिती दिली. हतनूर जलाशय परिसरात सुमारे तीनशे प्रकारच्या चिमण्या आढळतात, तर…

Read More

मोहिते यांनी दिलेल्या तक्रारीवरून जळगाव तालुका पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल जळगाव । जळगावमध्ये चोरट्यांना खाकीचा धाकच शिल्लक नसल्याचं दिसत असून दिवसेंदिवस घरफोडीच्या घटना वाढताना दिसत आहे. याच दरम्यान, चोरट्यांनी चक्क निवृत्त पोलीस अधिकऱ्याच्या घरात डल्ला मारला आहे. जळगाव शहरातील निमखेडीरोड भागातील स्वामी समर्थ पार्क परिसर येथील निवृत्त वरिष्ठ पोलिस निरीक्षक मगन वनाजी मोहिते यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी रोख ७३ हजार रुपयांसह सोने-चांदीचे दागिने असा एकूण २ लाख ४० हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मगन मोहिते हे २२ मार्च रोजी…

Read More